शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
2
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
3
अस्तनीतले निखारे! पहलगाम मुद्द्यावर काही भारतीयांचा पाकिस्तानला पाठिंबा! आतापर्यंत ३७ जणांना अटक
4
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
5
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
6
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
7
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
8
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
9
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
10
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
11
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
12
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
13
Alka Kubal: अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
14
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
15
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
16
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
18
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
19
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
20
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार

राजकारण्यांची लुडबुड हाणून पाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:02 IST

योगेश पायघन औरंगाबाद : सर्व शिक्षा अभियानातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना दरवर्षी दोन गणवेश दिले जातात. यावर्षी प्रत्यक्ष शाळा ...

योगेश पायघन

औरंगाबाद : सर्व शिक्षा अभियानातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना दरवर्षी दोन गणवेश दिले जातात. यावर्षी प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्या तरी १ लाख ४६ हजार ३१७ विद्यार्थ्यांना दोनऐवजी प्रत्येकी एक गणवेश शिवून दिला जाणार आहे. त्यापैकी पाचवी ते आठवीपर्यंतच्या ५८ हजार ४०२ विद्यार्थ्यांचे ३०० प्रमाणे १ कोटी ७५ लाख २० हजार ६०० रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. यात राजकारण्यांचा लुडबुड करण्याचा प्रयत्न होता. मात्र, तो हाणून पाडत नियमानुसार निधी शाळा व्यवस्थापन समितीमार्फतच गणवेश खरेदी होणार असून, लवकरच मापे घेण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुसूचित जाती, जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थी व सर्व विद्यार्थिनींना सर्व शिक्षा अभियानातून दरवर्षी गणवेश वाटप केले जातात. यावर्षी जिल्ह्याला ८ कोटी ७७ लाख ९० हजार २०० रुपयांचा निधी गणवेशासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून मंजूर आहे. मात्र, कोरोनामुळे शाळा बंद असल्याने २० नोव्हेंबरला राज्य शासनाने दोनऐवजी एकच गणवेश वाटपाच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी शासनाकडून सर्व शिक्षा अभियानाकडे ३ कोटी ४२ लाख ६ हजारांचा निधी प्राप्त झाला. आणखी लागणाऱ्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. १ लाख ४६ हजार ३१७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश वाटपासाठी ४ कोटी ३८ लाख ९५ हजारांचा निधी खर्चासाठी लागणार आहे. एका ड्रेससाठी सुमारे तीनशे रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आतापर्यंत पाचवी ते आठवीपर्यंतच्या ५८ हजार ४०२ विद्यार्थ्यांचे ३०० प्रमाणे १ कोटी ७५ लाख २० हजार ६०० रुपये निधी वितरित करण्यात आला आहे, असे सोज्वल जैन यांनी सांगितले.

---

शाळा व्यवस्थापन समितीमार्फतच गणवेश

शाळा व्यवस्थापन समितीला कापड व शिलाईसाठी निधी दिला जातो. त्यामुळे वितरणाची जबाबदारी शाळा प्रशासनातील संबंधित जबाबदारी असलेले शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती निधी वितरित झाल्यावर कापड खरेदी करेल. पाचवी ते आठवीपर्यंतच्या गणवेशाचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना माप देण्यासाठी शाळेत यावे लागते. सध्या शाळा सुरू नसल्याने विद्यार्थी शाळेत येत नाहीत. लवकरच कापड खरेदी व विद्यार्थ्यांचे कपडे शिवण्यासाठी माप घेण्याची प्रक्रिया सुरू होईल.

-सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग, जि. प. औरंगाबाद

जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी

मुलेः ४१,४५७

मुली: १,०४,८६०

---

१,४६,३१७

गणवेश लागणार

---

पाचवी ते आठवीसाठी निधी वितरित--

सर्व मुली - ४२,१६१

अनुसूचित जाती मुले - ६,१९९

अनुसूचित जमाती मुले - ३,८५८

दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले - ६,१८४

पाचवी ते आठवी लाभार्थी विद्यार्थी - ५८,४०२

वितरित निधी - १,७५,२०,६००