शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
3
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
4
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
5
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
6
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
7
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
8
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
9
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
10
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
11
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."
12
मिस्त्री, प्लंबर, फिटरपासून कनिष्ठ अभियंतापर्यंत; मिरा-भाईंदर महानगरपालिकेत विविध पदांसाठी भरती
13
आता त्या गोष्टीवर मी काहीच बोलणार नाही; सचिन-द्रविड अन् MS धोनीचं नाव घेत पुजारा म्हणाला की,..
14
आईस्क्रीम विक्रेत्याला कॉलेज प्लेसमेंटमधून १.८ कोटींचं पॅकेज? व्हायरल Video मागचं 'सत्य'
15
सासू केस ओढून मारायची, पती हुंडा घेऊन...; निक्कीच्या आईने जावयाबद्दल केला धक्कादायक खुलासा!
16
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
17
दुसरे घर घेण्याचा विचार करताय? आधी ‘या’ महत्त्वाच्या गोष्टी तपासा, अन्यथा होईल मोठं नुकसान!
18
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
19
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
20
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?

राजकारण्यांची लुडबुड हाणून पाडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:02 IST

योगेश पायघन औरंगाबाद : सर्व शिक्षा अभियानातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना दरवर्षी दोन गणवेश दिले जातात. यावर्षी प्रत्यक्ष शाळा ...

योगेश पायघन

औरंगाबाद : सर्व शिक्षा अभियानातून पहिली ते आठवीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना दरवर्षी दोन गणवेश दिले जातात. यावर्षी प्रत्यक्ष शाळा सुरू नसल्या तरी १ लाख ४६ हजार ३१७ विद्यार्थ्यांना दोनऐवजी प्रत्येकी एक गणवेश शिवून दिला जाणार आहे. त्यापैकी पाचवी ते आठवीपर्यंतच्या ५८ हजार ४०२ विद्यार्थ्यांचे ३०० प्रमाणे १ कोटी ७५ लाख २० हजार ६०० रुपये निधी वितरित करण्यात आला आहे. यात राजकारण्यांचा लुडबुड करण्याचा प्रयत्न होता. मात्र, तो हाणून पाडत नियमानुसार निधी शाळा व्यवस्थापन समितीमार्फतच गणवेश खरेदी होणार असून, लवकरच मापे घेण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

पहिली ते आठवीपर्यंतच्या अनुसूचित जाती, जमाती आणि दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थी व सर्व विद्यार्थिनींना सर्व शिक्षा अभियानातून दरवर्षी गणवेश वाटप केले जातात. यावर्षी जिल्ह्याला ८ कोटी ७७ लाख ९० हजार २०० रुपयांचा निधी गणवेशासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेकडून मंजूर आहे. मात्र, कोरोनामुळे शाळा बंद असल्याने २० नोव्हेंबरला राज्य शासनाने दोनऐवजी एकच गणवेश वाटपाच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी शासनाकडून सर्व शिक्षा अभियानाकडे ३ कोटी ४२ लाख ६ हजारांचा निधी प्राप्त झाला. आणखी लागणाऱ्या निधीची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. १ लाख ४६ हजार ३१७ विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक गणवेश वाटपासाठी ४ कोटी ३८ लाख ९५ हजारांचा निधी खर्चासाठी लागणार आहे. एका ड्रेससाठी सुमारे तीनशे रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आतापर्यंत पाचवी ते आठवीपर्यंतच्या ५८ हजार ४०२ विद्यार्थ्यांचे ३०० प्रमाणे १ कोटी ७५ लाख २० हजार ६०० रुपये निधी वितरित करण्यात आला आहे, असे सोज्वल जैन यांनी सांगितले.

---

शाळा व्यवस्थापन समितीमार्फतच गणवेश

शाळा व्यवस्थापन समितीला कापड व शिलाईसाठी निधी दिला जातो. त्यामुळे वितरणाची जबाबदारी शाळा प्रशासनातील संबंधित जबाबदारी असलेले शिक्षक व शाळा व्यवस्थापन समिती निधी वितरित झाल्यावर कापड खरेदी करेल. पाचवी ते आठवीपर्यंतच्या गणवेशाचा निधी वितरित करण्यात आला आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना माप देण्यासाठी शाळेत यावे लागते. सध्या शाळा सुरू नसल्याने विद्यार्थी शाळेत येत नाहीत. लवकरच कापड खरेदी व विद्यार्थ्यांचे कपडे शिवण्यासाठी माप घेण्याची प्रक्रिया सुरू होईल.

-सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी प्राथमिक विभाग, जि. प. औरंगाबाद

जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतचे विद्यार्थी

मुलेः ४१,४५७

मुली: १,०४,८६०

---

१,४६,३१७

गणवेश लागणार

---

पाचवी ते आठवीसाठी निधी वितरित--

सर्व मुली - ४२,१६१

अनुसूचित जाती मुले - ६,१९९

अनुसूचित जमाती मुले - ३,८५८

दारिद्र्यरेषेखालील पालकांची मुले - ६,१८४

पाचवी ते आठवी लाभार्थी विद्यार्थी - ५८,४०२

वितरित निधी - १,७५,२०,६००