शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या पक्षातील नेत्याची भारताला धमकी; "जर रशियाची मदत केली तर अमेरिका भारतावर..."
2
दबावापुढे झुकणार नाही, विद्यार्थ्यांचेच हित बघणार; आम्ही इगो न ठेवता जीआर रद्द केले; फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं
3
LPG Cylinder Price Cut: स्वस्त झाला LPG सिलिंडर... आजपासून कमी झाली किंमत; दिल्ली ते मुंबईपर्यंतचे हे आहेत नवे दर
4
सव्वा लाखाची चप्पल? अहो, ही तर आमची कोल्हापुरी!
5
आजचे राशीभविष्य : सरकारी कामात होईल फायदा, प्रमोशनचा योग; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
6
वेटिंग रेल्वे तिकीट कन्फर्म झाले का? आरक्षणाचा तक्ता आता चार नव्हे आठ तास आधी होणार तयार
7
आता पोटाच्या प्रश्नांकडे वळा!
8
एसटीच्या तिकिटाचे आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना आजपासून मिळेल १५ टक्के सूट
9
मुंबई विमानतळाजवळील निर्धारित उंचीपेक्षा अधिक उंचीच्या इमारतींवर काय कारवाई केली?
10
रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्षपदी, आज अधिवेशनात सूत्रे स्वीकारणार
11
उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या कार्यालयाला जागा मिळेना, विधानभवनात दालन आहे, पण कार्यालय मात्र नाही
12
एकनाथ शिंदे यांच्यावर पुन्हा विश्वास; पक्षनेतेपदी फेरनिवड, आगामी निवडणुकीचे सर्वाधिकार शिंदेंकडेच
13
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले हीच सर्वांत मोठी उपलब्धी, महायुतीची सत्ता आली: चंद्रशेखर बावनकुळे
14
जून महिन्यात मुंबईने दिला १ हजार कोटींचा महसूल; मुंबईत एक महिन्यात झाली ११,५२१ मालमत्तांची नोंदणी
15
शेफाली जरीवाला मृत्यू प्रकरणी पोलिसांकडून १४ जणांचे जबाब
16
कल्याण आरटीओचा अजब कारभार, स्टॅंडऐवजी दरपत्रक साेशल मीडियावर
17
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
18
राजा रघुवंशीच्या हत्येनंतर, पर्यटकांसाठी नवा नियम; मेघालयात जाणाऱ्यांसाठी आता 'ही' एक गोष्ट असणार अनिवार्य!
19
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
20
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल

राजकारण्यांनी यावे; मात्र साहित्यिकांची आब राखूनच

By admin | Updated: December 18, 2014 00:41 IST

औरंगाबाद : साहित्यिक मंचांवर राजकीय वावर असण्यात काही गैर नाही. साहित्यिकांनी राजकारण्यांना अस्पृश्य मानू नये. मात्र, त्यांचे लांगुलचालन करणेही योग्य नाही.

औरंगाबाद : साहित्यिक मंचांवर राजकीय वावर असण्यात काही गैर नाही. साहित्यिकांनी राजकारण्यांना अस्पृश्य मानू नये. मात्र, त्यांचे लांगुलचालन करणेही योग्य नाही. कारण संमेलनाध्यक्ष हीच संमेलनातील सर्वाधिक सन्माननीय व्यक्ती असते, असे मत ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी मांडले. बुधवारी शहरात आल्यावर त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. प्रशासनातील उच्चपदांवर काम करून निवृत्त झालेले देशमुख लेखन क्षेत्रातही दीर्घकाळापासून कार्यरत आहेत. विविध सामाजिक, राजकीय विषयांवर त्यांनी कथा, कविता, कादंबरी व स्तंभलेखनाच्या माध्यमातून प्रभावीपणे प्रकाश टाकला आहे. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनापासून समारोपापर्यंत राजकारण्यांचा वावर नेहमीच चर्चेत असतो. याबाबत देशमुख म्हणाले की, प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना नेहमीच राजकारण्यांची बरी-वाईट रूपे मी अनुभवलीत. समाजव्यवस्था चालविण्यासाठी प्रशासन व राजकारण या दोन बाबींना पर्याय नाही. साहित्यसुद्धा समाजाचेच प्रतिरूप असते. त्यामुळे राजकारण्यांवर फुली मारणे चुकीचेच आहे. साहित्य संमेलने झाली पाहिजेत या मताचा मी आहे. कारण त्या निमित्ताने वर्षभर लेखकांचा वाचकांशी संवाद होत राहतो. मात्र, संमेलनातील सवंग, उत्सवी बाबी वगळल्या पाहिजेत. मुन्शी प्रेमचंद यांनी प्रोग्रेसिव्ह रायटर असोसिएशन स्थापन केली होती. मराठीत अशी संघटना स्थापन करण्यास साहित्य परिषदेने पुढाकार घ्यावा. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी नुकतेच इंग्रजी शाळा बंदच कराव्यात, असे वक्तव्य केले. त्याबाबत देशमुख म्हणाले की, इंग्रजी शाळा बंद करण्याऐवजी त्या शाळांमध्ये मराठी सक्तीची करणे हा मध्यममार्ग असू शकतो. कारण आज इंग्रजी ही जगातच काय; देशातही ज्ञानभाषा बनली आहे, हे वास्तव आपण मान्य केले पाहिजे.