शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल
2
जे भारतात तयार होते तेच खरेदी करा; दिवाळीत ‘डबल बोनस’ मिळणार आहे : पंतप्रधान मोदी
3
पुन्हा निसर्ग कोपला, ढगफुटीने हाहाकार! जम्मू-काश्मिरातील कठुआमध्ये ७ मृत्युमुखी; अनेक जखमी
4
निवडणूक आयोग भाजपशी हातमिळवणी करून करतोय मतांची चोरी: राहुल गांधींचा आरोप
5
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
6
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
7
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
8
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
9
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
10
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
11
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
12
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
13
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
14
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
15
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
16
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
17
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
18
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
19
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
20
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव

राजकारण्यांनी यावे; मात्र साहित्यिकांची आब राखूनच

By admin | Updated: December 18, 2014 00:41 IST

औरंगाबाद : साहित्यिक मंचांवर राजकीय वावर असण्यात काही गैर नाही. साहित्यिकांनी राजकारण्यांना अस्पृश्य मानू नये. मात्र, त्यांचे लांगुलचालन करणेही योग्य नाही.

औरंगाबाद : साहित्यिक मंचांवर राजकीय वावर असण्यात काही गैर नाही. साहित्यिकांनी राजकारण्यांना अस्पृश्य मानू नये. मात्र, त्यांचे लांगुलचालन करणेही योग्य नाही. कारण संमेलनाध्यक्ष हीच संमेलनातील सर्वाधिक सन्माननीय व्यक्ती असते, असे मत ३६ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख यांनी मांडले. बुधवारी शहरात आल्यावर त्यांनी विविध विषयांवर संवाद साधला. प्रशासनातील उच्चपदांवर काम करून निवृत्त झालेले देशमुख लेखन क्षेत्रातही दीर्घकाळापासून कार्यरत आहेत. विविध सामाजिक, राजकीय विषयांवर त्यांनी कथा, कविता, कादंबरी व स्तंभलेखनाच्या माध्यमातून प्रभावीपणे प्रकाश टाकला आहे. साहित्य संमेलनाच्या उद्घाटनापासून समारोपापर्यंत राजकारण्यांचा वावर नेहमीच चर्चेत असतो. याबाबत देशमुख म्हणाले की, प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करताना नेहमीच राजकारण्यांची बरी-वाईट रूपे मी अनुभवलीत. समाजव्यवस्था चालविण्यासाठी प्रशासन व राजकारण या दोन बाबींना पर्याय नाही. साहित्यसुद्धा समाजाचेच प्रतिरूप असते. त्यामुळे राजकारण्यांवर फुली मारणे चुकीचेच आहे. साहित्य संमेलने झाली पाहिजेत या मताचा मी आहे. कारण त्या निमित्ताने वर्षभर लेखकांचा वाचकांशी संवाद होत राहतो. मात्र, संमेलनातील सवंग, उत्सवी बाबी वगळल्या पाहिजेत. मुन्शी प्रेमचंद यांनी प्रोग्रेसिव्ह रायटर असोसिएशन स्थापन केली होती. मराठीत अशी संघटना स्थापन करण्यास साहित्य परिषदेने पुढाकार घ्यावा. ज्येष्ठ साहित्यिक भालचंद्र नेमाडे यांनी नुकतेच इंग्रजी शाळा बंदच कराव्यात, असे वक्तव्य केले. त्याबाबत देशमुख म्हणाले की, इंग्रजी शाळा बंद करण्याऐवजी त्या शाळांमध्ये मराठी सक्तीची करणे हा मध्यममार्ग असू शकतो. कारण आज इंग्रजी ही जगातच काय; देशातही ज्ञानभाषा बनली आहे, हे वास्तव आपण मान्य केले पाहिजे.