शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
2
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
3
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
4
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
5
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
6
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
7
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
8
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
9
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
10
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
11
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
12
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
13
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
14
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
15
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
16
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
17
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
18
रशिया आणि युक्रेनमध्ये मोठा करार होणार, राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींनी केली घोषणा; म्हणाले...
19
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
20
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
Daily Top 2Weekly Top 5

राजकीय सुडाचा आरोप; गेवराईमध्ये बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2017 23:01 IST

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्ज प्रकरणात फसवणूक केल्याच्या आरोपाखाली माजी मंत्री शिवाजीराव पंडित, आ. अमरसिंह पंडित, चेअरमन जयसिंह पंडित यांच्यासह २८ जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय सुडापोटी गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे पुतळे जाळले आणि घोषणा देऊन संताप व्यक्त केला.

लोकमत न्यूज नेटवर्कगेवराई : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कर्ज प्रकरणात फसवणूक केल्याच्या आरोपाखाली माजी मंत्री शिवाजीराव पंडित, आ. अमरसिंह पंडित, चेअरमन जयसिंह पंडित यांच्यासह २८ जणांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर राजकीय सुडापोटी गुन्हे दाखल केल्याचा आरोप करत सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी पालकमंत्री पंकजा मुंडे यांचे पुतळे जाळले आणि घोषणा देऊन संताप व्यक्त केला. गेवराईसह ग्रामीण भागात बंद पाळण्यात आला.राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला. ३०० ते ४०० तरुणांनी रॅली काढून संपूर्ण गेवराई शहरात फिरून दुकाने बंद केली. तालुक्यातील मादळमोही येथे खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष डिगांबर येवले, युवा नेते राजाभाऊ वारंगे, दत्ता हकदार दीपक वारंगे यांच्या नेतृत्वाखाली गावातून फेरी काढून दाखल गुन्ह्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी मन्सूरभाई, शिवाजीराव माखणे, शेख समशेर, भिमा भोपळे, सदाशिव वाघमारे, दिलीप राक्षे, नारायण गोडसे, अवदुत येवले, जगदीश मोटे, माऊली तळेकर, अयुब पठाण, बाबुराव येवले, सुरेश भोपळे, जालिंदर मोहिते, सुनिल पुरी, हनुमान गोडसे, अरुण वाघमारे, संभाजी हकदार, सादेक कुरेशी, बंडू दरेकर, बळीराम राक्षे, पिंटू तळेकर, शेख सिराज यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.उमापूरमध्ये माजी जि.प.सदस्य संग्राम आहेर, रावसाहेब देशमुख, बप्पासाहेब आहेर, कारखान्याचे माजी संचालक प्रेमचंद गायकवाड, चेअरमन तुळशीदास औटी, बाजार समितीचे संचालक बळीराम खरात, कमळाजी विर, बाबासाहेब टेकाळे, रवि आहेर, अजय आहेर, शेखर औटी, राहुल देशमुख, अमोल देशमुख, विष्णू दळवी आदींनी भाजप नेतृत्वाचा निषेध करण्यासाठी प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. यावेळी शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.दरम्यान, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी दाखल झालेले गुन्हे राजकीय सुडापोटी असल्याचे सांगितले. सोमवारी गुन्हा दाखल झाल्यानंतर तालुक्यात ठिकठिकाणी तीव्र पडसाद उमटल्याने त्यांनी कार्यकर्त्यांना शांतता राखून कायदा व सुव्यवस्था कोठेही बिघडणार नाही याची दक्षता घेण्याचे आवाहन केले.