शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
2
"जातीनिहाय जनगणनेमुळे मराठा आरक्षणाचा प्रश्न सुटेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास
3
१ कोटी दे, नाहीतर ठार मारून टाकू; गोलंदाज मोहम्मद शमीला जीवे मारण्याच्या धमकीचा ई-मेल
4
‘लाडक्या बहिणीं’साठी अजित पवार यांनी आभाळातून पैसे आणायचे का? मंत्री मुश्रीफ यांचा टोला
5
इन्स्टाग्राम मेसेजवरून भांडण पेटलं, पुण्यात शेजऱ्यानं तरुणाला दगडावर आपटून संपवलं! 
6
सईसोबत 'गुलकंद'मध्ये रोमान्स करणाऱ्या समीर चौघुले यांच्या बायको आणि मुलाला पाहिलंत का?
7
...अन् साथीदार गेला! नवरीच्या मांडीवर डोके ठेवून नवरदेवाने सोडले प्राण, महाराष्ट्रातील घटना
8
पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळाली जपानची साथ; संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मानले आभार
9
ताजमहालाजवळ ड्रायव्हरविना धावली कार, दोन पर्यटकांना चिरडले, धक्कादायक घटनेचा व्हिडीओ व्हायरल
10
Jalgaon Suicide: बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थ्याची आत्महत्या, जळगावातील पाचोरा येथील घटना
11
कपूर कुटुंबाची सून अन् सुमित राघवनची बहीण आहे 'ही' मराठी अभिनेत्री, तुम्ही ओळखलंत का?
12
लक्षात ठेवा, नापास झाल्याने आयुष्य संपत नाही ! सचिन तेंडुलकर, नागराज मंजुळे झाले होते नापास
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा १० ग्रॅम सोनं खरेदी करायला किती खर्च करावा लागणार?
14
Video: हॉर्न वाजवण्यास रोखल्याने तो संतापला; सुरक्षा रक्षकाला थारखाली चिरडले...
15
Sensex २९५ आणि Nifty ११४ अंकांच्या तेजीसह बंद; 'या' शेअर्समध्ये मोठा चढ-उतार
16
रशियाचा भारताला पाठिंबा! 'पहलगामच्या गुन्हेगारांना सोडता कामा नये'; पुतिन यांचा पीएम मोदींना फोन
17
"ऋषभ पंतला पुन्हा फॉर्मात यायचे असेल तर त्याने धोनीला फोन करावा"; दिग्गज फलंदाजाचा सल्ला
18
Nashik Crime: तिन्ही कोयत्यांवर जाधव बंधूंच्या रक्ताचे डाग आहेत तसेच; महाजनच्या घरात सापडली शस्त्रे
19
Ather Energy IPO चं अलॉटमेंट 'असं' करा चेक, ग्रे मार्केट प्रीमिअम काय देतोय संकेत?
20
Women violence: देशात आपल्याच घरात महिलांचा होतोय छळ, आकडे बघा काय सांगताहेत?

पक्षांतर्गत शह-काटशहाचे राजकारण !

By admin | Updated: October 6, 2014 00:13 IST

कळंब : कळंब-उस्मानाबाद मतदार संघात आता पक्षांतर्गत काटाकाटीचे राजकारण सुरु झाले आहे. विरोधी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी व्युव्हरचना आखली जात आहे.

कळंब : कळंब-उस्मानाबाद मतदार संघात आता पक्षांतर्गत काटाकाटीचे राजकारण सुरु झाले आहे. विरोधी पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना आपल्याकडे खेचण्यासाठी व्युव्हरचना आखली जात आहे. या काटाकाटीमध्ये कोणाकोणाचा पत्ता कटणार आणि कोणाला खुर्ची मिळणार, हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होणार आहे.कळंब - उस्मानाबाद मतदारसंघात चौरंगी फाईट होत आहे. प्रत्येक पक्षाने ही निवडणूक कमालीची प्रतिष्ठेची केली आहे. ‘अभी नही, तो कभी नही’ असा नाराचं पक्षश्रेष्ठींनी दिल्याने पदाधिकारी व कार्यकर्तेही जोमाने तयारीला लागल्याचे चित्र आहे. परंतु, या धामधुमीत प्रत्येक पक्षातील नाराज गट अजूनही शांत आहे. या गटाला आपल्याकडे खेचण्यासाठी प्रतिस्पर्धी पक्षांनी फिल्डींग लावली आहे.मतदारसंघात शिवसेनेतील गटबाजीने कहर केला आहे. हा नाराज गट अजूनही प्रचाराच्या रिंगणात उतरला नाही. तेरणा साखर कारखाना, तसेच सेना आमदारांच्या आजपर्यंच्या कार्याचा हिशोब मतदारांनी मागितला तर काय उत्तर द्यायचे? असा प्रश्न या नाराज गटाकडून विचारला जात आहे. त्यातच काँग्रेसची जिल्हा परिषदेत सेना-भाजपासोबत युती आहे. मग काँग्रेसवर टिका कोणत्या तोंडाने करायची? असा प्रश्नही शिवसैनिकांतून विचारला जातो आहे. या नाराज शिवसैनिकांना कोठे उघड तर कोठे अंतर्गत कामाला लावण्याची फिल्डींग राष्ट्रवादी व भाजपकडून आखली जात आहे. अशा नाराज गटांबरोबर चर्चेच्या दोन-तीन फेऱ्या झाल्याचेही विश्वसनीय वृत्त आहे.जिल्हा परिषदेत नुकत्याच झालेल्या विषय समित्यांच्या सभापती निवडीत तालुक्यातील काँग्रेसला स्थान न मिळाल्याने पक्षातील एक गट नाराज आहे. तालुक्यातील काँग्रेसच्या एकमेव जिल्हा परिषद सदस्या अर्चना शेळके यांना महिला व बालविकास सभापतीपद देण्याची कार्यकर्त्यांची मागणी होती. परंतु, सेनेने त्यांच्या सोईचे राजकारण केल्याने व काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनीही यात गांभिर्याने लक्ष न घातल्याने काँग्रेसचा एक गट सेना व काँग्रेसवरही नाराज आहे. त्यातच निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्त्यांना प्रचारामध्ये स्थान न दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी वाढली आहे. हा नाराज गटही भाजपा व राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे.‘आम्ही पक्षाचे जुने कार्यकर्ते असताना पक्षाने आमच्या कार्याची दखल घेतली नाही व उमेदवारीसाठी डावलले’ असे म्हणत तालुक्यातील भाजपाचा एक गट नाराज आहे. या नाराज गटातील दोन-चार कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या काही नेत्यांशी मदतीचा ‘हात’ देण्याची बोलणी केल्याची चर्चा आहे. या कार्यकर्त्यांमुळे भाजपाला काही फटका बसणार नाही. परंतु ‘त्या’ नेत्यांचा राष्ट्रवादीला काय फायदा होणार? असा प्रतिसवाल भाजपा कार्यकर्त्यांमधून केला जात आहे. भाजपाचे मतदान ‘फिक्स’ आहे. त्यामुळे कोणी कोठेही गेले तरी फरक पडणार नसल्याची भूमिका भाजपा गोटातून घेतली जात आहे.