शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
5
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
6
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
7
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
8
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
9
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
10
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
11
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
12
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
13
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
14
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
15
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
16
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
17
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती
18
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
19
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
20
सोनिया गांधींना भेटण्यासाठी जात होतात त्याचे काय? योगेश कदम यांचा उद्धव ठाकरेंना टोला

मनपात राजकीय गणित बदलणार

By admin | Updated: October 22, 2014 01:38 IST

विकास राऊत, औरंगाबाद एप्रिल २०१५ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विकास राऊत, औरंगाबादशिवसेना, भाजपाचा घटस्फोट आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा काडीमोड झाल्याने व एमआयएम या पक्षाचा शहरात शिरकाव झाल्यामुळे एप्रिल २०१५ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभेच्या राजकारणाचा प्लॅटफार्म म्हणून पालिकेकडे पाहिले जाते. मनपाच्या माध्यमातूनच अनेकांची राजकीय कारकीर्द घडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे सर्व राजकारण्यांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले आहे.सत्ताधारी शिवसेना, भाजपा युती तुटल्यामुळे त्यांचा २०१५ मध्ये होणाऱ्या मनपा निवडणुकीत कस लागणार आहे, तर एमआयएममुळे काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेसची मुस्लिम, दलित मतांची बँक पूर्णत: विस्कळीत झाली आहे. त्यांना नवीन मतदारांना स्वत:कडे वळवावे लागणार आहे, तर हिंदू मतांचे धु्रवीकरण झाल्यामुळे शिवसेनेला पूर्व आणि मध्य मतदारसंघात पराभव पत्करावा लागला आहे. भाजपाने पूर्व मतदारसंघात निसटता विजय मिळविला; परंतु मध्यमध्ये हिंदू मतांचे विभाजन दोन्ही पक्षांसाठी घातक ठरले. भाजपाला सर्वाधिक मते...शहरातील पूर्व, पश्चिम, मध्य मतदारसंघांत भाजपाला १ लाख ५९ हजार ३८३ मते मिळाली. एमआयएमच्या तिन्ही उमेदवारांनी पूर्व, पश्चिम, मध्य मतदारसंघात १ लाख ५७ हजार ४५९ मते घेतली. शिवसेनेला १ लाख १४ हजार ५५२ तर काँग्रेसला ४५ हजार ९४ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसला १९ हजार १६१ मते मिळाली तर मनसेच्या तिन्ही उमेदवारांना फक्त ९ हजार ६४० मते मिळाली आहेत. फुलंब्रीतील ६ वॉर्ड आणि शहरातील ९३ वॉर्ड मिळून साडेआठ लाख मतदार शहरात आहेत. त्यापैकी ५ लाख ४९ हजार ९६७ मतदारांनी मतदान केले. सुमारे २० टक्के मते एमआयएमने घेतली आहेत. ही व्होटबँक परंपरेनुसार काँग्रेस, राष्ट्रवादीची होती. आता ती व्होटबँक एमआयएमकडे गेल्यामुळे मनपातील आघाडीकडे असलेले ३० नगरसेवकांचे संख्याबळ घटणार असल्याचे दिसते. तर भाजपाकडे असलेले १५ नगरसेवकांचे संख्याबळ वाढविण्यासाठी पूर्व मतदारसंघातील शिवसेनेला खिंडार पाडण्याची रणनीती ठरविण्यासाठी भाजपाने सुरुवात केली आहे. शिवसेनेला आहे ते ३० संख्याबळ टिकविण्याचे मोठे आव्हान आहे.