शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मनपात राजकीय गणित बदलणार

By admin | Updated: October 22, 2014 01:38 IST

विकास राऊत, औरंगाबाद एप्रिल २०१५ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विकास राऊत, औरंगाबादशिवसेना, भाजपाचा घटस्फोट आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा काडीमोड झाल्याने व एमआयएम या पक्षाचा शहरात शिरकाव झाल्यामुळे एप्रिल २०१५ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभेच्या राजकारणाचा प्लॅटफार्म म्हणून पालिकेकडे पाहिले जाते. मनपाच्या माध्यमातूनच अनेकांची राजकीय कारकीर्द घडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे सर्व राजकारण्यांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले आहे.सत्ताधारी शिवसेना, भाजपा युती तुटल्यामुळे त्यांचा २०१५ मध्ये होणाऱ्या मनपा निवडणुकीत कस लागणार आहे, तर एमआयएममुळे काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेसची मुस्लिम, दलित मतांची बँक पूर्णत: विस्कळीत झाली आहे. त्यांना नवीन मतदारांना स्वत:कडे वळवावे लागणार आहे, तर हिंदू मतांचे धु्रवीकरण झाल्यामुळे शिवसेनेला पूर्व आणि मध्य मतदारसंघात पराभव पत्करावा लागला आहे. भाजपाने पूर्व मतदारसंघात निसटता विजय मिळविला; परंतु मध्यमध्ये हिंदू मतांचे विभाजन दोन्ही पक्षांसाठी घातक ठरले. भाजपाला सर्वाधिक मते...शहरातील पूर्व, पश्चिम, मध्य मतदारसंघांत भाजपाला १ लाख ५९ हजार ३८३ मते मिळाली. एमआयएमच्या तिन्ही उमेदवारांनी पूर्व, पश्चिम, मध्य मतदारसंघात १ लाख ५७ हजार ४५९ मते घेतली. शिवसेनेला १ लाख १४ हजार ५५२ तर काँग्रेसला ४५ हजार ९४ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसला १९ हजार १६१ मते मिळाली तर मनसेच्या तिन्ही उमेदवारांना फक्त ९ हजार ६४० मते मिळाली आहेत. फुलंब्रीतील ६ वॉर्ड आणि शहरातील ९३ वॉर्ड मिळून साडेआठ लाख मतदार शहरात आहेत. त्यापैकी ५ लाख ४९ हजार ९६७ मतदारांनी मतदान केले. सुमारे २० टक्के मते एमआयएमने घेतली आहेत. ही व्होटबँक परंपरेनुसार काँग्रेस, राष्ट्रवादीची होती. आता ती व्होटबँक एमआयएमकडे गेल्यामुळे मनपातील आघाडीकडे असलेले ३० नगरसेवकांचे संख्याबळ घटणार असल्याचे दिसते. तर भाजपाकडे असलेले १५ नगरसेवकांचे संख्याबळ वाढविण्यासाठी पूर्व मतदारसंघातील शिवसेनेला खिंडार पाडण्याची रणनीती ठरविण्यासाठी भाजपाने सुरुवात केली आहे. शिवसेनेला आहे ते ३० संख्याबळ टिकविण्याचे मोठे आव्हान आहे.