शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
4
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
5
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
6
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
7
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
8
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
9
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
10
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
11
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
12
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
13
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
14
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
15
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
16
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा
17
Nagpur: मित्राचा वाढदिवस ठरला आयुष्यातील शेवटचा दिवस, स्विमिंग पूलमध्ये बुडून तरुणाचा मृत्यू
18
“राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येत असतील तर...”; मनसे-ठाकरे गट युतीवर काँग्रेस नेते थेट बोलले
19
एआयमुळे २०००० नोकऱ्या मिळणार, Cognizant २०२५ मध्ये फ्रेशर्सची भरती करणार
20
“उद्धव-राज ठाकरे दोघेही भावासमान, महाराष्ट्र हितासाठी मनाचा मोठेपणा दाखवत...”: सुप्रिया सुळे

मनपात राजकीय गणित बदलणार

By admin | Updated: October 22, 2014 01:38 IST

विकास राऊत, औरंगाबाद एप्रिल २०१५ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

विकास राऊत, औरंगाबादशिवसेना, भाजपाचा घटस्फोट आणि काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा काडीमोड झाल्याने व एमआयएम या पक्षाचा शहरात शिरकाव झाल्यामुळे एप्रिल २०१५ मध्ये होणाऱ्या महापालिकेच्या निवडणुकीच्या राजकारणाला मोठी कलाटणी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विधानसभेच्या राजकारणाचा प्लॅटफार्म म्हणून पालिकेकडे पाहिले जाते. मनपाच्या माध्यमातूनच अनेकांची राजकीय कारकीर्द घडली आहे. विधानसभा निवडणुकीच्या निकालामुळे सर्व राजकारण्यांना आत्मचिंतन करण्यास भाग पाडले आहे.सत्ताधारी शिवसेना, भाजपा युती तुटल्यामुळे त्यांचा २०१५ मध्ये होणाऱ्या मनपा निवडणुकीत कस लागणार आहे, तर एमआयएममुळे काँगे्रस, राष्ट्रवादी काँग्रेसची मुस्लिम, दलित मतांची बँक पूर्णत: विस्कळीत झाली आहे. त्यांना नवीन मतदारांना स्वत:कडे वळवावे लागणार आहे, तर हिंदू मतांचे धु्रवीकरण झाल्यामुळे शिवसेनेला पूर्व आणि मध्य मतदारसंघात पराभव पत्करावा लागला आहे. भाजपाने पूर्व मतदारसंघात निसटता विजय मिळविला; परंतु मध्यमध्ये हिंदू मतांचे विभाजन दोन्ही पक्षांसाठी घातक ठरले. भाजपाला सर्वाधिक मते...शहरातील पूर्व, पश्चिम, मध्य मतदारसंघांत भाजपाला १ लाख ५९ हजार ३८३ मते मिळाली. एमआयएमच्या तिन्ही उमेदवारांनी पूर्व, पश्चिम, मध्य मतदारसंघात १ लाख ५७ हजार ४५९ मते घेतली. शिवसेनेला १ लाख १४ हजार ५५२ तर काँग्रेसला ४५ हजार ९४ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसला १९ हजार १६१ मते मिळाली तर मनसेच्या तिन्ही उमेदवारांना फक्त ९ हजार ६४० मते मिळाली आहेत. फुलंब्रीतील ६ वॉर्ड आणि शहरातील ९३ वॉर्ड मिळून साडेआठ लाख मतदार शहरात आहेत. त्यापैकी ५ लाख ४९ हजार ९६७ मतदारांनी मतदान केले. सुमारे २० टक्के मते एमआयएमने घेतली आहेत. ही व्होटबँक परंपरेनुसार काँग्रेस, राष्ट्रवादीची होती. आता ती व्होटबँक एमआयएमकडे गेल्यामुळे मनपातील आघाडीकडे असलेले ३० नगरसेवकांचे संख्याबळ घटणार असल्याचे दिसते. तर भाजपाकडे असलेले १५ नगरसेवकांचे संख्याबळ वाढविण्यासाठी पूर्व मतदारसंघातील शिवसेनेला खिंडार पाडण्याची रणनीती ठरविण्यासाठी भाजपाने सुरुवात केली आहे. शिवसेनेला आहे ते ३० संख्याबळ टिकविण्याचे मोठे आव्हान आहे.