शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
5
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
6
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
7
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
8
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
9
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
10
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
11
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
12
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
13
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
14
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
15
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
16
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
17
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
18
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
19
अमेरिकेनं इराणवर ज्या B-२ स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला केला त्याची किंमत माहित्येय? तासाला किती खर्च येतो? जाणून थक्क व्हाल
20
Ashadhi Wari : दिवे घाटाची अवघड वाट पार करीत माउलींचा पालखी सोहळा कऱ्हेकाठी विसावला

दिवाळीनंतर फुटणार राजकीय फटाके

By admin | Updated: November 14, 2015 00:49 IST

कळंब : शहरात अनियमित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, पालिकेच्या पाणीपुरवठा समितीतील चार सदस्यांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केली आहे़

कळंब : शहरात अनियमित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, पालिकेच्या पाणीपुरवठा समितीतील चार सदस्यांनी राजीनामा देण्याची तयारी सुरू केली आहे़ परिणामी दिवाळीनंतर पाणीप्रश्नावरून पालिकेत राजकीय फटाके जोरात फुटण्याची शक्यता आहे़शहराच्या काही भागात सध्या सात ते आठ दिवसाआड तर काही भागात चार ते पाच दिवसाआड पाण्याचा पुरवठा केला जातो़ पालिका प्रशासनाच्या कारभारावर विसंभून न राहता काही सदस्यांनी आपापल्या प्रभागात स्वखर्चाने पाणी उपलब्ध करून दिले आहे़ एकंदरीत शहरात पाणी समस्येवरून नागरिकांमध्येही असंतोष दिसत आहे़ मांजरा धरणातून शहराला पाण्याचा पुरवठा होता़ हा पाणीपुरवठा दीर्घकाळ टिकणार नाही, या कारणाने नगर पालिकेने पाणी कपात करून बचतीचा मार्ग अवलंबिला आहे़ परंतू धरणात पाणीसाठा आहे, तोपर्यंत पुरेसा व नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी शहरवासियांतून होत आहे़ शहरवासियांच्या या मागणीला पालिका प्रशासन मात्र दाद देताना दिसत नाही़ मांजरा धरणातून इतर शहर तसेच गावांना पाण्याचा पुरवठा होतो़ त्या ठिकाणी पाणी बचत करण्यासाठी पाणी कपात होते का ? हे पाहून नगर पालिकेने धोरण ठरवावे, अशी मागणीही होत आहे़शहरातील पाणी समस्या पाहता पाणी पुरवठा समितीवरील सदस्य पांडुरंग कुंभार, संजय मुंदडा, कांतीलाल बागरेचा व छायाताई आष्टेकर या नगरसेवकांनी समितीच्या बैठकीत शहराला चार दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे लेखी आदेश पाणीपुरवठा विभागाला दिले होते़ या आदेशाला केराची टोपली दाखवून सात ते आठ दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे धोरण कायम ठेवण्यात आले आहे़ पालिकेतील काही मंडळींच्या दबावामुळे पाणीपुरवठा विभागाने समितीचे आदेश धुडकावल्याची चर्चाही सुरू आहे़ पाणी पुरवठ्याचे श्रेय विरोधकांना जाऊ नये, यासाठी समितीच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याची चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे़ या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा समितीचे चार सदस्य १६ नोव्हेंबर रोजी राजीनामे देणार असल्याचे वृत्त आहे़ (वार्ताहर)