शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

पोलीस भरती होणार; पण संख्या किती?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:06 IST

बापू सोळुंके औरंगाबाद : एकीकडे राज्य सरकार पोलीस भरतीची जय्यत तयारी करीत असताना औरंगाबाद शहर पोलिसांतर्फे किती पदांची भरती ...

बापू सोळुंके

औरंगाबाद : एकीकडे राज्य सरकार पोलीस भरतीची जय्यत तयारी करीत असताना औरंगाबाद शहर पोलिसांतर्फे किती पदांची भरती होणार याविषयी माहितीच उपलब्ध नसल्याचे समोर आले. दुसरीकडे औरंगाबाद ग्रामीण आणि भारत बटालियनतर्फे रिक्त पदांची माहिती शासनाला पाठविण्यात आल्याचे सांगण्यात आले.

गतवर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस भरती रद्द झाली, तर २०१९ साली लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आचारसंहितामुळे पोलीस भरती झाली नव्हती. रखडलेली पोलीस भरती तातडीने घ्यावी, अशी मागणी राज्यातील बेरोजगार तरुण करीत आहेत. या पार्श्वभूमीवर गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दोन टप्प्यात १२ हजार ५०० पोलिसांची पदे भरणार असल्याचे जाहीर केले. गृहमंत्री यांच्या घोषणेने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांमध्ये उत्साह संचारला आहे. पोलीस भरतीकरिता औरंगाबाद शहर पोलिसांच्या अस्थापनेतर्फे किती पदे भरण्यात येणार आहे, याविषयी पोलीस उपायुक्त मीना मकवाना यांना विचारले असता तांत्रिक कारणांमुळे सध्या ही माहिती उपलब्ध नसल्याचे त्यांनी नमूद केले. अनुकंपा आणि जिल्हा बदलीसाठी काही पोलिसांनी अर्ज केलेले आहेत. ते अर्ज मंजूर झाले तर पदांची संख्या कमी जास्त होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

दुसरीकडे औरंगाबाद ग्रामीण पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून ८९ पदे भरली जाणार असल्याची माहिती पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांनी सांगितले. याबाबतची माहिती शासनाला पाठविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. सातारा येथील भारत बटालियनच्या अस्थापनेवर ३० पदे रिक्त असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. रिक्त पदांची माहिती शासनाला सादर करण्यात आली.

चौकट

भरती करण्याचे अधिकार

४० पेक्षा अधिक पदे रिक्त असेल तर स्वतः भरती करण्याचे अधिकार आस्थापनेला असतात. त्यापेक्षा कमी पदे भारत बटालियनची रिक्त आहेत. यामुळे शासनाच्या आदेशाने या रिक्त पदाची भरती प्रक्रिया औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलाला अथवा शहर पोलीस आयुक्तालयास घेण्यास सांगितले जाऊ शकते.