शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी नोंदविले एक हजार गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:05 IST

औरंगाबाद: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार, रिक्षाचालक आणि अन्य नागरिकांवर ...

औरंगाबाद: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत घालून दिलेल्या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार, रिक्षाचालक आणि अन्य नागरिकांवर शहर पोलिसांनी तब्बल १ हजार गुन्हे नोंदविले. एवढेच नव्हे तर विनामास्क फिरणाऱ्या ७ हजार ५०८ नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. ही कारवाई १२ मार्च ते २१ एप्रिल दरम्यान करण्यात आली.

जिल्हा प्रशासनाने १२ मार्चपासून जिल्ह्यात ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत काही निर्बंध घातले. रिक्षात केवळ २ प्रवाशांची वाहतूक करणे, दुकानात सॅनिटायझर, थर्मल गण आणि ऑक्सिमीटर ठेवणे बंधनकारक केले. सुरुवातीला रात्री ८ वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची वेळ होती. शिवाय रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीत संचारबंदी होती. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसानी गुन्हे नोंदविले. १२ मार्च ते २१ एप्रिल या कालावधीत पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील १७ पोलीस ठाण्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तब्बल १ हजार गुन्हे नोंदविले. ही माहिती विशेष शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक बनकर यांनी दिली.

======(==============

चौकट

७ हजार ५०८ विनामास्क नागरिकांनी भरला ३७ लाख ७२ हजार ७०० रुपये दंड

वारंवार सांगूनही लोक मास्कचा वापर करीत नाही. अशा बेजबाबदार विनामास्क नागरिकांवर पोलिसांकडून १२ मार्चपासून दंडात्मक कारवाई केली जात आहे. विनामास्क नागरिकाला ५०० रुपये दंड आकारला जात आहे. १२ मार्च ते २१ एप्रिल या कालावधीत पोलिसांनी ७ हजार ५०८ जणांवर विनामास्कची कारवाई केली. या कारवाईत त्यांच्याकडून ३६ लाख ७२ हजार ७०० रुपये दंड वसूल करण्यात आल्याची माहिती विशेष शाखेकडून मिळाली. शहरातील १७ पोलीस ठाणे आणि वाहतूक शाखेने ही कारवाई केली.