शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
3
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
4
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
5
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
6
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
7
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
8
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
9
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
10
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
11
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
12
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
13
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
14
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
15
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
16
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
17
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
18
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
19
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस
20
चार्ली किर्कच्या शोकसभेत पत्नीने केलं अनपेक्षित विधान; एरिका किर्क म्हणाल्या," त्या तरुणाला मी..."

पोलिस वसाहतीची दुरवस्था

By admin | Updated: August 30, 2014 00:00 IST

परभणी: येथील पोलिस वसाहतीमधील निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे.

परभणी: येथील पोलिस वसाहतीमधील निवासस्थानांची दुरवस्था झाली आहे. मागील काही वर्षांपासून दुरुस्ती झाली नसल्याने अधिकारी-कर्मचाऱ्यांना समस्यांचा सामना करावा लागत आहे.जिल्ह्यातील पोलिस अधिकारी- कर्मचाऱ्यांसाठी येथे निवासस्थाने उभारण्यात आली आहेत. परंतु मागील अनेक वर्षांपासून या वसाहतीची दुरवस्था झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महानगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष होत असल्याने या दुरवस्थेत दिवसेंदिवस वाढ होत आहे.अनेक घरांची पडझड झाली असल्याने त्याची तत्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे. या भागातील रस्त्यांचीही अवस्था बिकट झाली आहे. त्यामुळे पावसाळ्यामध्ये वसाहतीत जाणे- येणे मोठे जिकरीचे काम होते. रस्त्यांवरील गिट्टी उखडून गेली आहे. पावसाळ्यात विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना या रस्त्यावरुन येणे-जाणे करणे अवघड होत आहे. त्यामुळे या रस्त्यांचे नूतणीकरण करावे, अशी मागणीही पुढे येत आहे. निवासस्थानांच्या दुरवस्थेबरोबरच अनेक सोयी-सुविधाही उपलब्ध नाहीत. पोलिस कर्मचाऱ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी दूर अंतरावर जावे लागते. ही गैरसोय दूर करण्यासाठी वसाहतीमध्येच शाळा सुरू करावी. रात्रं दिवस कर्तव्य बजावणाऱ्या पोलिस कर्मचाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. निवासस्थानांची दुरवस्था तर झालीच आहे. शिवाय कर्मचाऱ्यांना मिळणारे मानधनही तुटपुंजे आहे. या मानधनात वाढ करावी, अशी मागणी होत आहे.पोलिस वसाहतीतील समस्या व इतर कर्मचाऱ्यांच्या समस्यांविषयी पोलिस अधीक्षकांकडे ऊहापोह करण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांच्या या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी संतोष भालेराव, शरद टाकरस आदींनी केली आहे. नांदेड, लातूर या ठिकाणी नवीन इमारतींचे बांधकाम झाले आहे. त्याचसोबत रस्त्यांची कामे देखील झाली आहेत. परभणीतही नवीन इमारतींचे निर्माण करण्यात आले. परंतु रस्त्यांची कामे केली नाही. त्यामुळे या पोलिस कर्मचाऱ्यांच्या समस्या ‘जैसे थे’ आहेत. त्यामुळे याप्रश्नी लक्ष घालावे आणि योग्य त्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. (प्रतिनिधी)या पोलिस वसाहतीमध्ये चारशे ते पाचशे कुटुंब राहतात. तसेच पोलिस अधिकाऱ्यांची ३० ते ३५ कुटुंब वास्तव्यास आहेत. परंतु थोडाही पाऊस आला तरी निवासस्थाने गळतात. या भागात मोठमोठ्या इमारती आहेत परंतु गार्डनची सोय नाही. रस्त्यांची देखील दुरवस्था झाली आहे. जागोजागी उखडलेले रस्ते, रस्त्यावर मोठमोेठे खड्डे पडलेत. या खड्ड्यांमध्ये पाणी साचते. परिणामी वाहने चालविणे अवघड झाले आहे. या भागात कचराकुंडीची व्यवस्था नाही, घंटागाडी देखील येत नाही. परिणामी पोलिस कर्मचाऱ्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. पोलिस कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नांकडे लक्ष घालून ते सोडवावेत, अशी मागणी जय हो मित्रमंडळाच्या वतीने अमोल रणखांब, धनंजय रणखांब, पवन मस्के, सचिन जाधव, राहुल कातकडे, नितीन आगळे, शरद टाकरस, महेश जाधव, निखिल जाधव, पप्पू तारेख, संदीप मालसमिंदर, सय्यद मुनवर आदींनी केली आहे.