शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

हक्कासाठी एकतेची वज्रमूठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2017 23:55 IST

'एक मराठा लाख मराठा' चा नारा देत सकल मराठा समाजाने शुक्रवारी परभणी शहरात दुचाकी रॅली काढून मुंबईच्या मोर्चासाठी जनजागृती केली. अतिशय शिस्तीत निघालेल्या या रॅलीने एक आदर्श घालून देत मोर्चाला येण्याचे आवाहन केले.

लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : 'एक मराठा लाख मराठा' चा नारा देत सकल मराठा समाजाने शुक्रवारी परभणी शहरात दुचाकी रॅली काढून मुंबईच्या मोर्चासाठी जनजागृती केली. अतिशय शिस्तीत निघालेल्या या रॅलीने एक आदर्श घालून देत मोर्चाला येण्याचे आवाहन केले.९ आॅगस्ट रोजी मुंबईत मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे. त्या अनुषंगाने मोर्चाच्या जनजागृतीसाठी परभणी जिल्ह्यातील मराठा समाज सरसावला आहे. मोर्चाची तयारी पूर्ण झाली असून आता गावोगावी बैठकांवर जोर दिला जात आहे. मोर्चाला जाण्या-येण्याची सोय, तेथील मार्ग, व्यवस्था, आचारसंहिता आदीची माहिती दिली जात आहे. याच पार्श्वभूमीवर परभणीत शुक्रवारी सकल मराठा समाजाने दुचाकी फेरीचे आयोजन केले होते. त्यासाठी सोशलमीडियावर आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार शुक्रवारी प्रथमच एवढ्या भव्य प्रमाणात दुचाकी रॅली परभणीकरांनी अनुभवलीे. सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ दुचाकीस्वार गाड्यांना भगवे झेंडे लावून हजर झाले होते.शिस्तीत गाड्या एकामागोमाग लावण्यात आल्या होत्या. छत्रपती शिवरायांना अभिवादन करुन ही रॅली स्टेशनरोडने निघाली. बसस्थानक, उड्डानपुल, जिल्हा परिषद मार्गे विसावा फाटा पर्यंत रॅली गेली. तेथून वळसा घेत जिल्हा शासकीय रुग्णालय, शिवाजी चौक, गांधीपार्क, नारायण चाळ, विसावा कॉर्नर मार्गे परत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा येथून वसमत रोडने जात शिवाजी महाविद्यालयमार्गे संत तुकाराम महाविद्यालयाच्या मैदानावर रॅलीचा समारोप करण्यात आला. या रॅलीत हजारोंच्या संख्येने मराठा युवक, युवती व महिलांसह दुचाकीस्वार सहभागी झाले होते. एक मराठा लाख मराठा, जय जिजाऊ जय शिवराय, या जय घोषाने शहराचे मुख्य रस्ते दणाणून गेले.दरम्यान, मागील वर्षी भव्य व आदर्श मूक मोर्चा परभणीत काढण्यात आला होता. मात्र शासनाकडून मागण्या मान्य न झाल्यामुळे ९ आॅगस्ट रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने मुंबई येथे मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात नियोजन बैठकाही घेण्यात आल्या. त्याचाच भाग म्हणून शुक्रवारी शहरात दुचाकी रॅली काढण्यात आली.या रॅलीमध्ये शहरासह ग्रामीण भागातील युवक-युवती मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.