शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
3
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
4
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
5
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
6
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
7
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
8
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
9
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
10
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
11
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
12
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
13
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
14
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
15
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
16
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
17
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
18
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
19
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
20
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा

तिच्या स्पर्शाने म्हातारा तरूण झाला, काठाने का होईना, समुद्र फिरून आला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 00:49 IST

तिच्या स्पर्शाने म्हातारा तरूण झाला, काठा काठाने समुद्र फिरुन आला, अशा एकापेक्षा एक सरस कविता सादर करुन फ. मुं. शिंदे यांनी रसिक श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : तिच्या स्पर्शाने म्हातारा तरूण झाला, काठा काठाने समुद्र फिरुन आला, अशा एकापेक्षा एक सरस कविता सादर करुन फ. मुं. शिंदे यांनी रसिक श्रोत्यांच्या मनाचा ठाव घेतला. ‘ती’ म्हणजे सत्तासुंदरी, ती म्हणजे लोकशाही, अशी एक ना अनेक ‘ती’ ची रुपे उलगडून दाखवत फ.मुं.नी श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.जालना शहरातील सरस्वती भुवन प्रशालेच्या प्रांगणात ऊर्मी जालनाच्या वतीने कोजागिरी पौर्णिमेनिमित्त ‘दुधात चांदणे सांडले’ या काव्यमैफिलीचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात डॉ. उल्हास उढाण आणि राज्याचे माजी सहकार आयुक्त डॉ. सुभाष माने यांना ‘ऊर्मी’चा यंदाचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाच्या नियोजित वेळेपूर्वीच वरुणराजाने हजेरी लावल्याने संमेलन वर्गखोलीत पार पडले. संमेलनात प्रा. ज्योती स्वामी, प्रा. शशिकांत पाटील, शिवाजीराव कायंदे, इंद्रजित घुले, वनमाला पाटील यांनी सहभाग नोंदवला.फ.मुं. शिंदेंची ‘आपले मत मांडण्याची सोय राहिली नाही, जिव्हासोबत भांडण्याची सोय राहिली नाही. कसे कसे कोणी कोणी नित्य किती सैरभैर, दु:खात अश्रू सांडण्याची सोय राहिली नाही’ ही कविता उपस्थितांची दाद मिळवून गेली.प्रा. ज्योती स्वामी यांनी स्त्री मनाचा ठाव घेणारी ‘मी शोध घेते बाई मनाचा’ ही कविता सादर केली. प्रा. शशिकांत पाटील यांनी आपल्या कवितेतून शेतकरी आत्महत्येवर आसूड ओढले. तर शिवाजीराव कायंदे यांनी सद्यस्थितीतील शेती आणि शेतकरी जीवनावर कविता सादर केली. इंद्रजित घुले यांनी प्रेमावर कविता सादर करुन उपस्थितांची दाद मिळवली. वनमाला पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे गोडवे गाणारी कविता सादर केली. संमेलनाचे नेटके सूत्रसंचालन कविवर्य जयराम खेडेकर यांनी केले. संमेलनाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. या वेळी डॉ. राजन उढाण, डॉ. उल्हास उढाण, डॉ. प्रमोद डोईफोडे, प्रा. रंगनाथ खेडेकर, भाऊसाहेब घुगे, बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले, प्रा. नारायण बोराडे, शिवकुमार सोळुंके, अ‍ॅड. दीपक कोल्हे यांच्यासह रसिक श्रोत्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.