शहरं
Join us  
Trending Stories
1
"ज्यांच्याकडे काहीच नाही, त्यांच्याकडे संविधानाची गॅरंटी आहे"; नामिबियात PM मोदींच्या भाषणाला स्टँडिंग ओव्हेशन
2
संजय गायकवाडांचा कँटिनमध्ये राडा; अन्न आणि औषध प्रशासनाची अजंता केटरर्सवर मोठी कारवाई
3
ट्रम्प यांनी पुन्हा फोडला टॅरिफ बॉम्ब...! इराक, फिलिपिन्ससह 'या' 6 देशांना बसणार फटका
4
'डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर कधीही होऊ शकतो 'ड्रोन हल्ला', खामेनेई यांच्या जवळच्या माणसाची अमेरिकेला खुली धमकी!
5
कुणाचा तरी राग माझ्यावर का काढता? अर्थसंकल्प कशाला मांडता म्हणणाऱ्या जाधवांना अजितदादांचे प्रत्युत्तर
6
"...तर मॉस्को अन् बिजिंग बॉम्बनं उडवेन!" ट्रम्प यांची पुतीन-जिनपिंग यांना खुली धमकी? 'ऑडिओ' लीक!
7
"गौतम गंभीरला काहीही बोलू नका; भारत मालिका हरला तरीही..."; योगराज सिंह यांनी कुणाला ठणकावलं?
8
“...तर राज्याच्या साधनसंपत्तीत भर, आर्थिक शिस्तीचे पालन करीतच अर्थकारभार”: DCM अजित पवार
9
युतीबाबत न बोलण्याचे राज ठाकरेंचे स्पष्ट आदेश, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
10
"मराठी अस्मिता जपली पाहिजे पण..."; भाषेच्या वादात जान्हवी कपूरची उडी; बॉयफ्रेंड शिखर पहारियाची पोस्ट केली शेअर
11
सावधान! हे अ‍ॅप तुमच्या हॉट्स अ‍ॅपचे मेसेज वाचू शकते, आताच सेटिंग्स बदला
12
अकोल्यात तरुणीवर कारमध्ये अत्याचाराचा प्रयत्न, आराेपीच्या गुप्तांगावर लाथ मारत करून घेतली स्वतःची सुटका
13
ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाविकास आघाडी फुटणार का? पृथ्वीराज चव्हाणांचे सूचक विधान, म्हणाले...
14
शाळेत शिकणारी मुलगी प्रेगनंट राहिल्यास १ लाख रुपये मिळणार; रशियाच्या या योजनेची होतेय चर्चा
15
मीरारोडचे पोलीस आयुक्त मधुकर पांडेंची बदली; मराठी मोर्चाला परवानगी नाकारल्याने मुख्यमंत्रीही वैतागले
16
पुन्हा रॉकेट बनला MRF चा शेअर, गेला ₹ 150000 पार; लोकांना केलं मालामाल! दिला बंपर परतावा
17
“महाराष्ट्रातील मतचोरीचा पॅटर्न बिहारमध्ये वापरायचा भाजपा, निवडणूक आयोगाचा प्रयत्न”: सपकाळ
18
"आमच्यावर आरोप केला जातो, शिवसेनेने मराठी माणसासाठी काय केलं? माझं सरकार यांनी पाडलं नसतं तर...! काय म्हणाले उद्धव ठाकरे?
19
रामललांसाठी आणखी एक अस्सल सागवानी लाकडाचे खास भव्य मंदिर बनणार; अयोध्येत कुठे बांधले जाणार?
20
Maruti Suzuki ते Mahindra..; जगातील सर्वात श्रीमंत कार कंपन्यांमध्ये भारतीय कंपन्यांचा दबदबा

भूखंडांचा विकास नाही

By admin | Updated: May 16, 2014 00:18 IST

मोहन बारहाते, मानवत शहरातील एकाही भूखंडाचा नगर पालिकेच्या कारभार्‍यांनी विकास केलेला नाही. याबाबीकडे कारभार्‍यांचे कायमस्वरुपी दुर्लक्ष राहिले आहे.

मोहन बारहाते, मानवत शहरातील एकाही भूखंडाचा नगर पालिकेच्या कारभार्‍यांनी विकास केलेला नाही. याबाबीकडे कारभार्‍यांचे कायमस्वरुपी दुर्लक्ष राहिले आहे. त्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी जागाच नाही. मानवत शहराचा औरस-चौरस विस्तार झाला. या विस्तारात अनेक नवीन वसाहती निर्माण झाल्या. निर्माण झालेल्या वसाहतीपैकी अनेक वसाहती नगररचना विभागाकडून मान्यता घेऊन निर्माण झाल्या. तर काही अवैधरित्या निर्माण झाल्या. अवैधरित्या निर्माण झालेल्या वसाहतींवर नियंत्रण ठेवण्याचे काम नगर पालिकेचे असते. ज्या वसाहतीत नियमानुसार निर्माण झालेल्या असतात. त्या वसाहतीमध्ये नगर पालिकेला विकासकामांसाठी वसाहतीच्या एकूण क्षेत्रफळाच्या दहा टक्के क्षेत्रफळ उद्यानासाठी तर दहा टक्के क्षेत्रफळ अंतर्गत रस्ते व नाल्यांसाठी सोडावे लागते. या भागात नगरपालिकेने निधी टाकून वसाहतीतील उद्यानांचा विकास करण्याची गरज असते. परंतु मागील अनेक वर्षांपासून मानवत नगर पालिकेने शहरातील कोणत्याही नूतन वसाहतीतील भूखंडाचा विकास केलेला नाही. या भूखंडाच्या विकासात लहान मुलांना खेळण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या खेळण्या लॉन वृक्ष लागवड आदी बाबी येतात. परंतु शहरातील अनेक नूतन वसाहतींमध्ये त्यांना निर्माण होऊन दहा-दहा वर्षे होऊनही तिथे साधे रस्ते व नाल्या नाहीत. काही भागात तर अजूनही पिण्याचे पाणी पोहचणे बाकी आहे. तेव्हा या भूखंडाचा विकास करून शहरातील वसाहतीत उद्यान करणे, त्यात खेळण्या टाकणे, वृक्ष लागवड करणे आदी कामे न.प.चे कारभारी कधी मनावर घेणार या खरा प्रश्न आहे. शहरातील लहान लहान मुलांना त्यांच्या शारीरिक विकासासाठी खेळ हा आवश्यक असतो. खेळ म्हणजे मनोरंजन, नेतृत्व, शारीरिक विकास, आरोग्य आदींचे प्रतिक असते. त्यामुळे लहान मुलांना खेळण्यासाठी मैदानांची गरज असते. नुसती मैदाने असून चालत नाहीत तर ती मैदाने सर्वसोयींनीयुक्त असावी लागतात. परंतु नगर पालिकेच्या दुर्लक्षामुळे आजमितीस मानवत शहरातील एकाही भूखंडाचा विकास झालेला नाही. त्यामुळे लहान मुुलांचे मातीशी असणारे नाते तुटत चालले आहे. मुलांचा शारीरिक व मानसिक विकासही व्यवस्थितपणे होत नाही. भूखंडांचा विकास ही केवळ लहान मुलांचीच गरज आहे, असे नाही तर वृद्धांनाही सदपावली करण्यासाठी भूखंडांचा विकास सहाय्यभूत ठरणार आहे. त्यामुळे नगर पालिकेने या बाबीकडे लक्ष घालून शहरातील विविध नूतन वसाहतींमध्ये भूखंडाचा विकास करणे गरजेचे आहे. दूरदृष्टीचा अभाव नागरिकांकडून कधीही या विकासकामाबाबत नगरसेवकांकडे आग्रह धरल्या जात नाही. त्यामुळे जैसे थे स्थितीमध्ये मानवतमधील भूखंड दिसून येतात. नगर पालिकेवर निवडून गेल्यानंतर नगरसेवकांनी नगराच्या विकासासंबंधी विचारमंथन करून त्या दृष्टीने विकासकामे करण्याची गरज असते. परंतु निवडलेल्या नगरसेवकांकडून या कामांबाबत कधीही मौखिक चर्चा होताना दिसत नाही.