शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

नियोजन समितीची रणधुमाळी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:34 IST

जिल्हा नियोजन समितीवर स्थानिक स्वराज्य संस्थामधून पाठविण्यात येणाºया प्रतिनिधीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ झाली असून जिल्हा परिषदेचे ५ तर महापालिकेचे २ सदस्य वाढणार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून मतदारांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या मतदारयादीवर आक्षेपाची २३ आॅगस्ट ही अंतिम मुदत राहणार आहे.

अनुराग पोवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्हा नियोजन समितीवर स्थानिक स्वराज्य संस्थामधून पाठविण्यात येणाºया प्रतिनिधीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ झाली असून जिल्हा परिषदेचे ५ तर महापालिकेचे २ सदस्य वाढणार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून मतदारांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या मतदारयादीवर आक्षेपाची २३ आॅगस्ट ही अंतिम मुदत राहणार आहे.नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या ४० सदस्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या लक्षात घेऊन नियोजन समितीच्या सदस्यांमध्ये वाढ झाली आहे. ७ सदस्य वाढले असून त्यात जिल्हा परिषदेचे ५ तर महापालिकेचे २ सदस्य राहणार आहेत. नांदेड जिल्हा नियोजन समिती ही एकूण ५० सदस्यांची आहे. त्यात पालकमंत्री हे समितीचे अध्यक्ष तर जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हाधिकारी, राज्यपाल नामनिर्देशीत १ सदस्य, विधिमंडळ नामनिर्देशीत सदस्य २ तसेच राज्य शासनाचे पदसिद्ध ४ सदस्य आहेत. तर उर्वरित सदस्य निवडून द्यावे लागणार आहेत. या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे २८, नगरपरिषदांचे ४, महापालिकेचे २ आणि नगरपंचायतींमधून १ सदस्य निवडून द्यावयाचा आहे.या निवडणुकीसाठी नांदेड जिल्हा परिषद, नांदेड महापालिका, किनवट नगरपरिषद, हदगाव नगरपरिषद, मुदखेड नगरपरिषद, भोकर, उमरी, धर्माबाद, बिलोली, कुंडलवाडी, लोहा, कंधार, मुखेड आणि देगलूर नगरपरिषद तसेच अर्धापूर, माहूर, हिमायतनगर आणि नायगाव नगरपंचायतींमध्ये निवडून आलेल्या सदस्यांच्या नावाची प्राथमिक यादी १९ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.या मतदारयादीवर आक्षेप किंवा हरकत घ्यायची असेल तर त्यांना २३ आॅगस्टची अंतिम मुदत देण्यात आली आहे. मतदारयादी अंतिम होताच जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या अथवा दुसºया आठवड्यात या निवडणुका होतील, अशी चिन्हे आहेत.नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीतही काँग्रेस आपलाच वरचष्मा राखण्याचा प्रयत्न करणार आहे. तर विरोधक एकत्र येऊन काँग्रेसला रोखण्याची आपली नेहमीच खेळी खेळणार का? हाही प्रश्न पुढे आला आहे.