शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

नियोजन समितीची रणधुमाळी सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 00:34 IST

जिल्हा नियोजन समितीवर स्थानिक स्वराज्य संस्थामधून पाठविण्यात येणाºया प्रतिनिधीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ झाली असून जिल्हा परिषदेचे ५ तर महापालिकेचे २ सदस्य वाढणार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून मतदारांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या मतदारयादीवर आक्षेपाची २३ आॅगस्ट ही अंतिम मुदत राहणार आहे.

अनुराग पोवळे ।लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: जिल्हा नियोजन समितीवर स्थानिक स्वराज्य संस्थामधून पाठविण्यात येणाºया प्रतिनिधीमध्ये लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ झाली असून जिल्हा परिषदेचे ५ तर महापालिकेचे २ सदस्य वाढणार आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या निवडणूक प्रक्रियेला प्रारंभ झाला असून मतदारांची प्राथमिक यादी प्रसिद्ध करण्यात आली असून या मतदारयादीवर आक्षेपाची २३ आॅगस्ट ही अंतिम मुदत राहणार आहे.नांदेड जिल्हा नियोजन समितीच्या ४० सदस्यांची निवडणूक प्रक्रिया सुरु झाली आहे. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या लक्षात घेऊन नियोजन समितीच्या सदस्यांमध्ये वाढ झाली आहे. ७ सदस्य वाढले असून त्यात जिल्हा परिषदेचे ५ तर महापालिकेचे २ सदस्य राहणार आहेत. नांदेड जिल्हा नियोजन समिती ही एकूण ५० सदस्यांची आहे. त्यात पालकमंत्री हे समितीचे अध्यक्ष तर जिल्हा परिषद अध्यक्ष, जिल्हाधिकारी, राज्यपाल नामनिर्देशीत १ सदस्य, विधिमंडळ नामनिर्देशीत सदस्य २ तसेच राज्य शासनाचे पदसिद्ध ४ सदस्य आहेत. तर उर्वरित सदस्य निवडून द्यावे लागणार आहेत. या निवडणुकीत जिल्हा परिषदेचे २८, नगरपरिषदांचे ४, महापालिकेचे २ आणि नगरपंचायतींमधून १ सदस्य निवडून द्यावयाचा आहे.या निवडणुकीसाठी नांदेड जिल्हा परिषद, नांदेड महापालिका, किनवट नगरपरिषद, हदगाव नगरपरिषद, मुदखेड नगरपरिषद, भोकर, उमरी, धर्माबाद, बिलोली, कुंडलवाडी, लोहा, कंधार, मुखेड आणि देगलूर नगरपरिषद तसेच अर्धापूर, माहूर, हिमायतनगर आणि नायगाव नगरपंचायतींमध्ये निवडून आलेल्या सदस्यांच्या नावाची प्राथमिक यादी १९ आॅगस्ट रोजी प्रसिद्ध करण्यात आली आहे.या मतदारयादीवर आक्षेप किंवा हरकत घ्यायची असेल तर त्यांना २३ आॅगस्टची अंतिम मुदत देण्यात आली आहे. मतदारयादी अंतिम होताच जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला जाणार आहे. सप्टेंबरच्या पहिल्या अथवा दुसºया आठवड्यात या निवडणुका होतील, अशी चिन्हे आहेत.नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, नगरपरिषद, नगरपंचायतींच्या निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या निवडणुकीतही काँग्रेस आपलाच वरचष्मा राखण्याचा प्रयत्न करणार आहे. तर विरोधक एकत्र येऊन काँग्रेसला रोखण्याची आपली नेहमीच खेळी खेळणार का? हाही प्रश्न पुढे आला आहे.