शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

नियोजन समितीने सिग्नलसाठी दिलेले दीड कोटी धूळ खात !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2016 00:46 IST

हणमंत गायकवाड ,लातूर जिल्हा नियोजन समितीने शहर वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून १४ सिग्नल्ससाठी १ कोटी ५३ लाख ३१ हजारांचा निधी मंजूर केला असून, हा निधी नगर विभागाकडे वर्गही करण्यात आला आहे.

हणमंत गायकवाड ,लातूरजिल्हा नियोजन समितीने शहर वाहतुकीला शिस्त लागावी म्हणून १४ सिग्नल्ससाठी १ कोटी ५३ लाख ३१ हजारांचा निधी मंजूर केला असून, हा निधी नगर विभागाकडे वर्गही करण्यात आला आहे. मात्र मनपाने सिग्नलसाठी काढलेल्या निविदेला कंपन्यांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने निधी धूळ खात पडून आहे. जिल्हा नियोजन समितीने लातूर शहरातील विविध चौकांत १४ सिग्नल्स बसविण्यासाठी १ कोटी ५३ लाख ३१ हजारांचा निधी फेब्रुवारी महिन्यात मंजूर केला. मंजुरीनंतर हा निधी जिल्हा नियोजन समितीकडून नगर विभागाकडे वर्ग करण्यात आला आहे. नगर विभागाकडून मनपाकडे हा निधी वर्ग झाला आहे. दरम्यान, शहरात दयानंद गेट, शिवाजी चौक, आदर्श कॉलनी, गूळ मार्केट, हनुमान चौक, विवेकानंद चौक, गांधी चौक, बसवेश्वर चौक आदी १४ ठिकाणी या निधीतून सिग्नल्स बसविले जाणार आहेत. प्रत्येक सिग्नलवर दहा ते पंधरा लाख रुपये खर्च केला जाणार आहे. त्यासाठी मनपाने निविदा मागविल्या होत्या. दोनवेळा निविदा मागितल्या. परंतु, दोनच कंपन्यांनी निविदा भरली. कमीत कमी तीन कंपन्यांच्या निविदा असणे आवश्यक आहे. मात्र येथे दोनच निविदा आल्याने फेरनिविदा काढण्यात आली. आता तिसऱ्यांदा फेरनिविदा काढण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. लातूर शहरात अशोक हॉटेल चौक, मिनी मार्केट चौक येथील दोनच सिग्नल सध्या सुरू आहेत. अन्य चौकांत सिग्नल चालू नाहीत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी होते. नियमांचे उल्लंघन होते. शिस्त नसल्याने अपघातही होतात. त्यामुळे जिल्हा नियोजन समितीने मनपाच्या प्रस्तावानुसार १ कोटी ५३ लाख ३१ हजारांचा निधी मंजूर करून तो वर्गही केला आहे. परंतु, निविदा प्रक्रिया पूर्ण न झाल्याने निधी पडून आहे. लातूर शहरात १४ सिग्नल्स बसविण्यासाठी नियोजन समितीने प्रस्तुत निधी मंजूर केला आहे. तो संबंधित विभागाकडे वर्गही झाला आहे. पुढील प्रक्रिया मनपाची आहे. आम्ही निधी दिला असल्याचे जिल्हा नियोजन अधिकारी कोलगणे यांनी सांगितले.