शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

प्रशासन लोकशाहीवर स्वार झाल्याचे चित्र

By admin | Updated: June 12, 2014 01:40 IST

जालना : नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्षांनी नागरी प्रश्नांसंदर्भात दाखविलेल्या हतबलपणामुळेच पालिका प्रशासन हे लोकशाहीवर स्वार झाल्याचे चित्र समोर आले

जालना : नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्षांनी नागरी प्रश्नांसंदर्भात दाखविलेल्या हतबलपणामुळेच पालिका प्रशासन हे लोकशाहीवर स्वार झाल्याचे चित्र समोर आले असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे यांनी व्यक्त केले. एक दिवसाचासुध्दा पालिकेच्या कामाचा अनुभव नाही. असे असतानासुद्धा थेट ‘अ’ वर्गामध्ये पालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा बाबासाहेब मनोहरे यांना पदभार कसा काय दिला? असा सवाल चिन्नादोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे व्यक्त केला. शासनाकडून मनोहरे यांची नियुक्ती झाली असताना त्यांना कोणताही अनुभव नसताना पालिका प्रशासनाने रूजू करून का घेतले? मुख्याधिकाऱ्यांची संपूर्ण कारकीर्द वादग्रस्त ठरली असतानासुद्धा त्यांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी अविश्वास ठराव का आणला नाही? असे प्रश्न आता जनतेसमोर पडू लागले असल्याचे चिन्नादोरे यांनी म्हटले.पालिकेच्या सर्वसाधारण सभेत कोणताही विरोध न होता सर्वानुमते ठराव का घेतले जातात, असा आरोप करीत, चिन्नादोरे यांनी या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यकाळात जायकवाडी -जालना पाणीपुरवठा योजनेत अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली असतानासुद्धा संबंधित कंत्राटदाराची बिले काढण्यासाठी पालिका प्रशासनाने घाई-गडबड दाखविल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण शहर अंधारात आहे. ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गटारी तुंबल्या आहेत. पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. यासह अन्य प्रश्नही भयावह झाले आहेत. असे असतांना मुख्याधिकारी मूग गिळून गप्प आहेत, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी पालिकेअंतर्गत अनागोंदी कारभाराच्या विरोधात ओळीनेही बोलण्याची भूमिका घेतली नाही. हेच लोकप्रतिनिधी आता भयावह झालेल्या प्रश्नांविरोधात रस्त्यावर येऊन झगडणार का? असा सवाल चिन्नादोरे यांनी व्यक्त केला.