शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

प्रशासन लोकशाहीवर स्वार झाल्याचे चित्र

By admin | Updated: June 12, 2014 01:40 IST

जालना : नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्षांनी नागरी प्रश्नांसंदर्भात दाखविलेल्या हतबलपणामुळेच पालिका प्रशासन हे लोकशाहीवर स्वार झाल्याचे चित्र समोर आले

जालना : नगराध्यक्षांसह उपनगराध्यक्षांनी नागरी प्रश्नांसंदर्भात दाखविलेल्या हतबलपणामुळेच पालिका प्रशासन हे लोकशाहीवर स्वार झाल्याचे चित्र समोर आले असल्याचे मत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष साईनाथ चिन्नादोरे यांनी व्यक्त केले. एक दिवसाचासुध्दा पालिकेच्या कामाचा अनुभव नाही. असे असतानासुद्धा थेट ‘अ’ वर्गामध्ये पालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा बाबासाहेब मनोहरे यांना पदभार कसा काय दिला? असा सवाल चिन्नादोरे यांनी प्रसिद्धीपत्रकाव्दारे व्यक्त केला. शासनाकडून मनोहरे यांची नियुक्ती झाली असताना त्यांना कोणताही अनुभव नसताना पालिका प्रशासनाने रूजू करून का घेतले? मुख्याधिकाऱ्यांची संपूर्ण कारकीर्द वादग्रस्त ठरली असतानासुद्धा त्यांच्या विरोधात सत्ताधाऱ्यांनी अविश्वास ठराव का आणला नाही? असे प्रश्न आता जनतेसमोर पडू लागले असल्याचे चिन्नादोरे यांनी म्हटले.पालिकेच्या सर्वसाधारण सभेत कोणताही विरोध न होता सर्वानुमते ठराव का घेतले जातात, असा आरोप करीत, चिन्नादोरे यांनी या मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यकाळात जायकवाडी -जालना पाणीपुरवठा योजनेत अनेक कामे निकृष्ट दर्जाची झाली असतानासुद्धा संबंधित कंत्राटदाराची बिले काढण्यासाठी पालिका प्रशासनाने घाई-गडबड दाखविल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. गेल्या काही वर्षांपासून संपूर्ण शहर अंधारात आहे. ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. गटारी तुंबल्या आहेत. पाणीपुरवठ्याचे नियोजन पूर्णत: कोलमडले आहे. यासह अन्य प्रश्नही भयावह झाले आहेत. असे असतांना मुख्याधिकारी मूग गिळून गप्प आहेत, असे ते म्हणाले. (प्रतिनिधी)सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या अपेक्षेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी पालिकेअंतर्गत अनागोंदी कारभाराच्या विरोधात ओळीनेही बोलण्याची भूमिका घेतली नाही. हेच लोकप्रतिनिधी आता भयावह झालेल्या प्रश्नांविरोधात रस्त्यावर येऊन झगडणार का? असा सवाल चिन्नादोरे यांनी व्यक्त केला.