शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

वडिलोपार्जित जमिनीचा ताबा देण्याचे हमीपत्र दिल्याने याचिका निकाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:05 IST

याचिकाकर्त्यांचे वडील शेख महंमद यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या मुलांनी आईचा सांभाळ करण्यास नकार दिला. म्हणून शेख महंमद यांच्या मुली ...

याचिकाकर्त्यांचे वडील शेख महंमद यांच्या अकाली निधनानंतर त्यांच्या मुलांनी आईचा सांभाळ करण्यास नकार दिला. म्हणून शेख महंमद यांच्या मुली न्यामतबी, शायनाबी, खातूनबी व मन्नाबी यांनी वडिलांच्या मिळकतीमध्ये हक्क मिळावा यासाठी पैठणच्या दिवाणी न्यायालयात दावा दाखल केला होता. जमिनीत समान हक्क मिळावा, अशी त्यांची मागणी होती. दिवाणी न्यायालयाने मुलींचा दावा १ एप्रिल २०१५ रोजी मंजूर केला होता. त्यानंतर प्रतिवादी भावांनी जिल्हा न्यायालयात केलेले अपीलही फेटाळण्यात आले. न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन व्हावे यासाठी चौघींनी औरंगाबादचे जिल्हाधिकारी, पैठणचे तहसीलदार व उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालय यांच्याकडे सतत पाठपुरावा केला. संबंधित कार्यालयांनी वारंवार टाळाटाळ केल्याने चौघींनी ॲड. ज्ञानेश्वर पवार पाथरेकर यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल करून वडिलांच्या मालमत्तेत समान हक्क देण्याच्या आदेशाचे पालन व्हावे, अशी विनंती केली होती. दिवाणी न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे दोन महिन्यांत जमिनीच्या ताब्याची कार्यवाही पूर्ण करण्याचे हमीपत्र तहसीलदार व भूमी अभिलेख विभागाकडून खंडपीठात सादर करण्यात आले. त्यावरून खंडपीठाने याचिका निकाली काढली.