शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

चिकाटी, दृढनिश्चिय, सकारात्मकतेमुळेच यश शक्य

By admin | Updated: August 15, 2014 00:02 IST

परभणी : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत हमखास यश मिळतेच, असे लोकेशकुमार जांगिड यांनी ‘सांगितले.

परभणी : केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश मिळविण्यासाठी चिकाटी, दृढनिश्चिय व सकारात्मक दृष्टीकोन बाळगला तर हमखास यश मिळतेच, असे या परीक्षेत नुकतेच यश मिळविलेल्या परभणी येथील लोकेशकुमार जांगिड यांनी ‘लोकमत’शी बोलतांना सांगितले. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात आलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल जूनमध्ये जाहीर झाला. या परीक्षेत परभणी येथील रहिवासी असलेल्या लोकेशकुमार रामचंद्र जांगिड यांनी देशपातळीवर ६८ वा रँक मिळविला. लोकेशकुमार यांना यामुळे आयएएसचे कॅडर मिळाले आहे. त्यांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयास भेट दिली असता त्यांनी त्यांच्या यशाचे गमक सांगितले. लोकेशकुमार यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण परभणी येथील मॉडेल इंग्लिश स्कूल येथे झाले असून ११ व १२ वीचे शिक्षण त्यांनी बालविद्यामंदिर येथून घेतले आहे. त्यानंतर त्यांनी नांदेड येथील गुरु गोविंदसिंग अभियांत्रिकी महाविद्यालयातून बी.टेकचे शिक्षण घेतले. ११ वीपासूनच त्यांना केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या सेवेत जाण्याची इच्छा होती. त्या दृष्टीकोनातून त्यांनी तशी तयारी केली. २००८ मध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्ली येथे खाजगी शिकवणी लावून या परीक्षेची तयारी सुरु केली. २००९ मध्ये झालेल्या आयोगाच्या परीक्षेत त्यांनी लोकप्रशासन व समाजशास्त्र हे विषय घेऊन देशपातळीवर ९१० वा रँक मिळविला. त्यामुळे त्यांची दिल्ली- अंदमान निकोबार आयलॅन्ड सिव्हील सर्व्हिसेससाठी निवड झाली. असे असले तरी त्यांचे लक्ष आयएएसकडेच होते. त्यामुळे त्यांनी पुन्हा दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा परीक्षेत प्रयत्न केला. परंतु, त्यांना यश मिळाले नाही. अंदमानमध्ये समाजकल्याण संचालक म्हणून नोकरी करीत असताना त्यांनी पुन्हा चौथ्यांदा आयोगाची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. त्यात त्यांना यश आले व जूनमध्ये जाहीर झालेल्या निकात त्यांना ६८ रँक मिळाला. त्यामुळे आता त्यांना आयएएस कॅडर मिळणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)जुलैमध्ये जांगिड हे प्रशिक्षणासाठी मसुरी येथे जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर बुधवारी ते परभणीत आले असता त्यांनी लोकमत कार्यालयास भेट दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांंनी कसलाही न्यूनगंड न बाळगता लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करावी. यासाठी चालू घडामोडी, वृत्तपत्राचे वाचन, सखोल अभ्यास, राज्यसभा, लोकसभा टीव्हीवरील बातम्या आणि चर्चासत्र पहावे. बीबीसी वेबसाईडवरील बातम्या व इंटरनेटवर स्पर्धा परीक्षा विषयक असलेल्या अभ्यासक्रमांची माहिती घ्यावी. केंद्र शासनाच्या पीआयबी वेबसाईडवरील माहिती घेऊन यशस्वी विद्यार्थ्यांच्या ब्लॉगचे वाचन करावे. जेणेकरुन त्यांना प्रेरणा मिळेल. परीक्षेत यश मिळवायचे असेल तर अभ्यासाचे नियोजन करुन त्यामध्ये सातत्य ठेवावे. चिकाटी असावी. सकरात्मक दृष्टीकोनातून विचार केल्यास निश्चितच यश मिळविता येते, असेही जांगिड म्हणाले.