शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

दंड आकारणीत ‘दंडे’लशाही

By admin | Updated: June 5, 2016 00:45 IST

औरंगाबाद : बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी पूर्वी मनपाच्या नगररचना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते.

औरंगाबाद : बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी पूर्वी मनपाच्या नगररचना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. मागील काही दिवसांपासून बांधकाम परवानगीतील अनेक अडथळे दूर करण्याचा प्रयत्न मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सुरू केला आहे. ज्या नागरिकांना बांधकाम परवानगी देण्यात येते, त्यांना आता नवीन नियमानुसार जोत्याच्या पूर्णत्वाचे प्रमाणपत्र (प्लिंथ कम्प्लिशन सर्टिफिकेट) घेणे बंधनकारक केले आहे. ज्यांनी हे प्रमाणपत्र घेतले नाही, त्यांना १० हजार ते ३ लाख रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येत आहे. शहरात आजही असंख्य नागरिक मनपाकडून बांधकाम परवानगी घेऊनच घर बांधतात. मनपाने विविध तांत्रिक कारणांमुळे परवानगी थांबवून ठेवल्यास नागरिक बांधकाम सुरूही करीत नाहीत. वर्षभरात १२०० ते १५०० नागरिक मनपाकडून बांधकाम परवानगी घेतात. ५ जानेवारी २०१६ पासून मनपाने विकास नियंत्रण नियमावलीमधील नियम क्र. ७.४ नुसार जोत्यापर्यंतचे बांधकाम झाल्यावर पूर्णत्वाचे प्रमाणपत्र घ्यावे. वास्तुविशारदामार्फत यासाठी स्वतंत्र प्रस्ताव दाखल करावा. असंख्य नागरिक बांधकाम परवानगी मिळविल्यानंतर जोत्याचे प्रमाणपत्र घेण्यास टाळाटाळ करतात. संपूर्ण बांधकाम झाल्यावर थेट भोगवटा प्रमाणपत्र घेण्यासाठी येतात. यामुळे चटई निर्देशांकाचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. ११ फेबु्रवारी २०१६ रोजी तत्कालीन मनपा आयुक्तांनी एक आदेश काढून जोत्याचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आदेशाची अंमलबजावणी ५ जानेवारी २०१६ पासून करावी, असे आदेशात म्हटले आहे.