शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

दंड आकारणीत ‘दंडे’लशाही

By admin | Updated: June 5, 2016 00:45 IST

औरंगाबाद : बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी पूर्वी मनपाच्या नगररचना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते.

औरंगाबाद : बांधकाम परवानगी मिळविण्यासाठी पूर्वी मनपाच्या नगररचना कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत होते. मागील काही दिवसांपासून बांधकाम परवानगीतील अनेक अडथळे दूर करण्याचा प्रयत्न मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी सुरू केला आहे. ज्या नागरिकांना बांधकाम परवानगी देण्यात येते, त्यांना आता नवीन नियमानुसार जोत्याच्या पूर्णत्वाचे प्रमाणपत्र (प्लिंथ कम्प्लिशन सर्टिफिकेट) घेणे बंधनकारक केले आहे. ज्यांनी हे प्रमाणपत्र घेतले नाही, त्यांना १० हजार ते ३ लाख रुपयांपर्यंत दंड वसूल करण्यात येत आहे. शहरात आजही असंख्य नागरिक मनपाकडून बांधकाम परवानगी घेऊनच घर बांधतात. मनपाने विविध तांत्रिक कारणांमुळे परवानगी थांबवून ठेवल्यास नागरिक बांधकाम सुरूही करीत नाहीत. वर्षभरात १२०० ते १५०० नागरिक मनपाकडून बांधकाम परवानगी घेतात. ५ जानेवारी २०१६ पासून मनपाने विकास नियंत्रण नियमावलीमधील नियम क्र. ७.४ नुसार जोत्यापर्यंतचे बांधकाम झाल्यावर पूर्णत्वाचे प्रमाणपत्र घ्यावे. वास्तुविशारदामार्फत यासाठी स्वतंत्र प्रस्ताव दाखल करावा. असंख्य नागरिक बांधकाम परवानगी मिळविल्यानंतर जोत्याचे प्रमाणपत्र घेण्यास टाळाटाळ करतात. संपूर्ण बांधकाम झाल्यावर थेट भोगवटा प्रमाणपत्र घेण्यासाठी येतात. यामुळे चटई निर्देशांकाचे उल्लंघन करण्याचे प्रमाण वाढत असल्याचे मनपा प्रशासनाचे म्हणणे आहे. ११ फेबु्रवारी २०१६ रोजी तत्कालीन मनपा आयुक्तांनी एक आदेश काढून जोत्याचे प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले आहे. आश्चर्याची बाब म्हणजे आदेशाची अंमलबजावणी ५ जानेवारी २०१६ पासून करावी, असे आदेशात म्हटले आहे.