शहरं
Join us  
Trending Stories
1
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
2
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
3
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
4
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
5
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
6
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
7
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
8
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!
9
महिला अधिकारी तुरुंगात गुंडाशी फोनवर अश्लील बोलायची, पत्रेही सापडली; धक्कादायक माहिती उघड
10
विधानसभेच्या नो पार्किंगमध्ये उभी होती मंत्र्यांची कार, वाहतूक पोलिसांनी क्रेन आणली आणि...
11
बेपत्ता अर्चनाला शोधण्यासाठी पोलिसांना नवा प्लॅन; ८ दिवसांपासून ती गायब, ६ टीम अलर्ट
12
'तारीख-वार तुम्ही ठरवा, मी यायला तयार...'; बागेश्वर बाबाने स्वीकारलं अखिलेश यादवंचे 'चॅलेंज'
13
Krishna Janmashtami 2025: टीव्हीवर बालकृष्णाची भूमिका साकारणारी चिमुरडी आता दिसते खूप वेगळी, सध्या ती काय करते?
14
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
15
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
16
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
17
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
18
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
19
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
20
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव

पाटोदा ग्रा.पं.ला केंद्र शासनाचा ८ लाखांचा पुरस्कार

By admin | Updated: August 7, 2014 01:56 IST

वाळूज महानगर : केंद्र शासनाच्या पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला ८ लाखांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला

वाळूज महानगर : केंद्र शासनाच्या पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेअंतर्गत औरंगाबाद जिल्ह्यातील पाटोदा ग्रामपंचायतीला ८ लाखांचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. १४ आॅगस्टला पुणे येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.पर्यावरण संतुलित समृद्ध ग्राम योजनेअंतर्गत राज्यातील ८३३ ग्रामपंचायतींना ‘पर्यावरण विकास रत्न व पंचायत सबलीकरण व उत्तरदायित्व प्रोत्साहन योजनेअंतर्गत पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे. या ग्रामपंचायतीने लोकसहभागातून गावात विविध उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. गावात शुद्ध पाणी पुरवठ्याचे योग्य व्यवस्थापन, ग्रामपंचायतीचे संगणकीकृत अद्ययावत अभिलेखे, वृक्ष लागवड, नियमितपणे मासिक व ग्रामसभेचे आयोजन, कचरा व सांडपाण्याचे व्यवस्थापन उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. पाटोदा गावात राबविण्यात आलेल्या ‘पाटोदा पॅटर्न’ची सर्व राज्यभर चर्चा आहे. ग्रामपंचायतीने राबविलेल्या या उपक्रमाची दखल घेऊन केंद्र शासनाचा ८ लाख रुपयांचा मानाचा पुरस्कार या ग्रामपंचायतीला जाहीर झाला आहे. १४ आॅगस्टला पुणे येथे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आदींच्या उपस्थितीत हा पुरस्कार पाटोदा ग्रामपंचायतीला प्रदान करण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी वासुदेव सोळंके, गटविकास अधिकारी विजय परदेशी यांनी सरपंच दत्तात्रय शहाणे, उपसरपंच हरिश्चंद्र मातकर, माजी सरपंच भास्करराव पा. पेरे, ग्रामविकास अधिकारी आर.डी. चौधरी यांनी ग्रामपंचायतीचे व ग्रामस्थांचे कौतुक केले. सरपंच शहाणे, उपसरपंच मातकर, माजी सरपंच भास्करराव पा. पेरे, ग्रामविकास अधिकारी आर.डी. चौधरी, चंद्रकांत पेरे, बबनराव पेरे, बाळसाहेब पेरे, अप्पासाहेब मुचक, उत्तम पवार, कल्याण पेरे, सखाराम मातकर, बबनराव मुचक, देवचंद पेरे आदींनी आनंदोत्सव साजरा केला.या ग्रामपंचायतीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, यशवंत पंचायत राज अभियान, पर्यावरण विकास रत्न, पर्यावरण संतुलित समृद्ध योजना, निर्मलग्राम, दलित वस्ती सुधार योजना, साने गुरुजी स्वच्छ व सुंदर शाळा, अंगणवाडी इ.सह जवळपास ५० लाखांवर पारितोषिके मिळविली आहेत. पारितोषिकांच्या रकमेचा विनियोग गावात विविध उपक्रम राबविण्यासाठी केला जात असल्याचे माजी सरपंच भास्कर पा.पेरे, सरपंच दत्तात्रय शहाणे, उपसरपंच हरिश्चंद्र मातकर, ग्रामविकास अधिकारी आर.डी. चौधरी यांनी सांगितले.