शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
2
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
3
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
4
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
5
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
6
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
7
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
8
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
9
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
10
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
11
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
12
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
13
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
14
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
15
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
16
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
17
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
18
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
19
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
20
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल

‘शिवनेरी’ चा मार्ग दुर्गम

By admin | Updated: June 12, 2014 01:33 IST

औरंगाबाद : प्रवाशांचा भरपूर प्रतिसाद असतानाही एसटी महामंडळाच्या अनास्थेमुळे औरंगाबादहून पुण्याकडे सध्या १२ पैकी केवळ ९ ‘शिवनेरी’ बस धावत आहेत.

औरंगाबाद : प्रवाशांचा भरपूर प्रतिसाद असतानाही एसटी महामंडळाच्या अनास्थेमुळे औरंगाबादहून पुण्याकडे सध्या १२ पैकी केवळ ९ ‘शिवनेरी’ बस धावत आहेत. त्यातच पुन्हा दररोज ४ ते ५ फेऱ्या रद्द होत असल्याने रद्द झालेल्या या फेऱ्या खाजगी ट्रॅव्हल्ससाठी संधी निर्माण करून देण्याचाच प्रकार असल्याची प्रतिक्रिया प्रवाशांमधून व्यक्त होत आहे. पुणे मार्गावर धावणाऱ्या शिवनेरी बसच्या वारंवार रद्द होणाऱ्या फेऱ्यांमुळे महामंडळाचे अधिकारी औरंगाबाद आगाराच्या उत्पन्नावर पाणी सोडत आहेत.औरंगाबाद- पुणे मार्गावर महामंडळाने खासगी एजन्सीमार्फत शिवनेरी बससेवा सुरू केली. पुणे- औरंगाबाद मार्गावर सहा आणि औरंगाबाद- पुणे मार्गावर सहा शिवनेरी बस चालविण्यात येत होत्या. मात्र, काही दिवसांपूर्वीच दोन शिवनेरी बसची मुदत संपल्याने त्या बंद पडल्या.दहा बसद्वारे शिवनेरीची सेवा सुरू असताना बसच्या नादुरुस्तीमुळे फेऱ्या रद्द होण्याचे प्रकार गेल्या महिनाभरात वाढल्याने प्रवाशांना अनेक प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागले. मागील आठवड्यात एक बस अपघातामुळे बंद पडली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून दररोज फेऱ्या रद्द होण्याचा प्रकार सुरू आहे. पंचपक्वान्न दिले मात्र ते येथील एसटीच्या अधिकाऱ्यांना खाता येत नसल्याची स्थिती आहे. प्रवाशांना परत केले पैसेपुण्याहून- औरंगाबादकडे निघालेली शिवनेरी बस नादुरुस्त झाल्याने ऐन उन्हाळ्यात प्रवाशांना उकाड्याचा त्रास सहन करीत येथे यावे लागले.१३ मे रोजी हा प्रकार घडल्यानंतर एसटी प्रशासनाने दुसरी शिवनेरी बस उपलब्ध करून न देता नगरपर्यंत साध्या बसमधून प्रवास करायला भाग पाडल्याबद्दल काही प्रवाशांनी १४ मे रोजी मध्यवर्ती बसस्थानकात नाराजी व्यक्त केली. यावेळी प्रवाशांना पैसे परत करण्यात आले होते.प्रवासी-कर्मचाऱ्यांमध्ये बाचाबाची४ मध्यवर्ती बसस्थानकात २५ मे रोजी दुपारी १ वाजता पुण्याला जाणारी शिवनेरी बस अचानक रद्द करण्यात आल्यामुळे प्रवाशांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. ४ अचानक बस रद्द झाल्याने प्रवासी आणि स्थानकावरील चालक- वाहक, कर्मचारी यांच्यात बाचाबाची झाली. ४ जवळपास तासाभरानंतर दुपारी २ वाजेच्या सुमारास या प्रवाशांची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. नियोजनाकडे दुर्लक्षसर्वाधिक उत्पन्न देणारी बस म्हणून शिवनेरीकडे पाहिले जाते. त्यामुळे कंत्राट रद्द होण्यापूर्वी दोन बसचे नव्याने कंत्राट करण्याची आवश्यकता होती. तसेच बस नादुरुस्त होण्याचे प्रमाण कमी होईल, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहता वेळीच नियोजन करण्याची गरज होती; परंतु याकडे कानाडोळा केला गेला. ‘शिवनेरी’ बससेवा बंद पाडण्याचा कट आखला गेला आहे की काय, असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. वरिष्ठ पातळीवर निर्णयशिवनेरी बसच्या कंत्राटाबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय होत असतो. अपघातग्रस्त झालेली बस आगामी दोन दिवसांत दाखल होईल. तसेच लवकरच नाशिक अथवा मुंबई मार्गावरील एक शिवनेरी बस मिळणार आहे, अशी माहिती मध्यवर्ती बसस्थानकाचे आगार व्यवस्थापक (वरिष्ठ) प्रताप जाधव यांनी दिली.बुधवारी चार फेऱ्या रद्दबुधवारी सकाळी ८, १० सायंकाळी ५ आणि रात्री ८ वाजेच्या शिवनेरीच्या फेऱ्या रद्द झाल्याची सूचना मध्यवर्ती बसस्थानकात लावण्यात आली होती. बहुतांश प्रवासी सकाळी आणि सायंकाळी प्रवास करण्यास प्राधान्य देतात. मात्र, याच वेळेतील फेऱ्या रद्द होत असल्याने प्रवाशांची प्रचंड गैरसोय होत असल्याचे दिसत आहे.