शहरं
Join us  
Trending Stories
1
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय?
2
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
3
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
4
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
5
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
6
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
7
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
8
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र
9
Radhika Yadav : "इथे खूप बंधनं, मला जीवनाचा आनंद घ्यायचाय..."; राधिकाचं कोचसोबतचं WhatsApp चॅट समोर
10
'स्क्विड गेम'मधला गी ह्युन हिंदी सिनेमात दिसणार? अभिनेता ली जुंगने दिली प्रतिक्रिया
11
भारत रशियाच्या मैत्रीमुळे अमेरिकेला पोटदुखी; ५००% टॅरिफसाठी विधेयक सादर, काय होणार आपल्यावर परिणाम?
12
दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू
13
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
14
ड्रोन उडवण्याचा प्रयत्न करत असतानाच झाला स्फोट; पाकिस्तानमध्ये दहशतवाद्याचा बॉम्बस्फोटात मृत्यू
15
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
16
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
17
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
18
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
19
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
20
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

साडेचार हजार हेक्टरमधून जाणार समृद्धीचा मार्ग

By admin | Updated: May 24, 2016 01:24 IST

औरंगाबाद : मुंबई- नागपूर या ८५० किलोमीटर अंतराच्या ‘सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे’ च्या भूसंपादनासाठी आंध्र प्रदेशची प्रस्तावित राजधानी अमरावतीसाठी

 

औरंगाबाद : मुंबई- नागपूर या ८५० किलोमीटर अंतराच्या ‘सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे’ च्या भूसंपादनासाठी आंध्र प्रदेशची प्रस्तावित राजधानी अमरावतीसाठी वापरलेला पॅटर्न लागू करण्याचा विचार असून, या महामार्गावर २३ टाऊनशिप उभ्या राहणार आहेत. मराठवाडा समृद्धीचा हा महामार्ग औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतून १५५ किलोमीटर जाणार असून, त्या मार्गावर ४ टाऊनशिप उभारल्या जाणार आहेत. महामार्ग आणि टाऊनशिप मिळून साडेचार हजार हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. विभागीय आयुक्तालयात सोमवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत रस्ते विकास महामंडळाने त्या महामार्गाचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन भूसंपादनाशी संबंधित यंत्रणांसमोर सादर केले. ६ पैकी ४ टाऊनशिप उभारण्यात येणार असून, जालन्यात सर्वात मोठी १ हजार हेक्टरवरील टाऊनशिप उभारण्यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दांगट यांनी दिली. ते म्हणाले, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यांतून १५५ कि़ मी. रोड जात आहे. त्यामध्ये ४ ठिकाणी टाऊनशिप विकसित करण्याचे ठरले आहे. जालना, करमाड-शेकटा, लासूर स्टेशन, माळीवाडा-दौलताबाद येथे टाऊनशिप उभारण्यात येईल. जालन्यात १ हजार हेक्टरमधून टाऊनशिप उभारण्यात येईल. साडेचार हजार हेक्टर जागा रोड आणि टाऊनशिपसाठी लागेल. भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना काय मावेजा द्यायचा, त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर चर्चा करून होणार आहे. शेतकऱ्यांना जास्तीचा फायदा होईल, असाच तो निर्णय होईल. बैठकीला राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, विभागीय आयुक्त डॉ. दांगट, महामंडळाचे सहसंचालक कुरुंदकर, जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडे, जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, रस्ते विकास महामंडळाचे मुंबई व स्थानिक मुख्य अभियंते, नगररचना, भूमी अभिलेख व इतर अधिकारी, अशा ५० जणांची उपस्थिती होती. ग्रामजीवन उंचावणार ग्रामीण भागाच्या जवळून हा रस्ता जाणार आहे. तेथे सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध (पान २ वर) ४नागपूर-सेलडोह-वर्धा-येळी-पुलगाव-धामणगाव-वखफळी-कारंजा लाड-सेलू बाजार-मालेगाव-मेहकर-दुसरबीड-सिंदखेडराजा-जालना-शेंद्रा-औरंगाबाद-सावंगी-दौलताबाद-लासूर-वैजापूर-शिर्डी-गोंदे-पिंपळगाव मोर-घोटी, देवळी-खर्डी-शहापूरजवळील कासेगाव-वडपे (भिवंडी बायपास) असा हा सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे असेल. पुढे ते कापूरबावडी जंक्शनवरून मुंबई असा जाईल. २२ जिल्ह्यांना जोडणार हा महत्त्वाकांक्षी मार्ग प्रत्यक्ष ११ जिल्ह्यांमधून जाणार असला तरी चारपदरी जोडरस्त्यांनी तो अन्य ११ जिल्ह्यांना जोडला जाणार आहे. विदर्भ-मराठवाडा, उत्तर व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा हा महामार्ग असेल. नागपूर ते औरंगाबाद हे अंतर तीन तासांत तर त्यापुढील मुंबईपर्यंतचे अंतर तीन तासांत कापता येईल.