शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

साडेचार हजार हेक्टरमधून जाणार समृद्धीचा मार्ग

By admin | Updated: May 24, 2016 01:24 IST

औरंगाबाद : मुंबई- नागपूर या ८५० किलोमीटर अंतराच्या ‘सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे’ च्या भूसंपादनासाठी आंध्र प्रदेशची प्रस्तावित राजधानी अमरावतीसाठी

 

औरंगाबाद : मुंबई- नागपूर या ८५० किलोमीटर अंतराच्या ‘सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे’ च्या भूसंपादनासाठी आंध्र प्रदेशची प्रस्तावित राजधानी अमरावतीसाठी वापरलेला पॅटर्न लागू करण्याचा विचार असून, या महामार्गावर २३ टाऊनशिप उभ्या राहणार आहेत. मराठवाडा समृद्धीचा हा महामार्ग औरंगाबाद व जालना जिल्ह्यांतून १५५ किलोमीटर जाणार असून, त्या मार्गावर ४ टाऊनशिप उभारल्या जाणार आहेत. महामार्ग आणि टाऊनशिप मिळून साडेचार हजार हेक्टर जमिनीचे संपादन करावे लागणार आहे. विभागीय आयुक्तालयात सोमवारी सायंकाळी झालेल्या बैठकीत रस्ते विकास महामंडळाने त्या महामार्गाचे पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन भूसंपादनाशी संबंधित यंत्रणांसमोर सादर केले. ६ पैकी ४ टाऊनशिप उभारण्यात येणार असून, जालन्यात सर्वात मोठी १ हजार हेक्टरवरील टाऊनशिप उभारण्यावर बैठकीत चर्चा झाल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ.दांगट यांनी दिली. ते म्हणाले, औरंगाबाद, बीड या जिल्ह्यांतून १५५ कि़ मी. रोड जात आहे. त्यामध्ये ४ ठिकाणी टाऊनशिप विकसित करण्याचे ठरले आहे. जालना, करमाड-शेकटा, लासूर स्टेशन, माळीवाडा-दौलताबाद येथे टाऊनशिप उभारण्यात येईल. जालन्यात १ हजार हेक्टरमधून टाऊनशिप उभारण्यात येईल. साडेचार हजार हेक्टर जागा रोड आणि टाऊनशिपसाठी लागेल. भूसंपादनासाठी शेतकऱ्यांना काय मावेजा द्यायचा, त्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर चर्चा करून होणार आहे. शेतकऱ्यांना जास्तीचा फायदा होईल, असाच तो निर्णय होईल. बैठकीला राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, विभागीय आयुक्त डॉ. दांगट, महामंडळाचे सहसंचालक कुरुंदकर, जिल्हाधिकारी डॉ.निधी पांडे, जालन्याचे जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे, रस्ते विकास महामंडळाचे मुंबई व स्थानिक मुख्य अभियंते, नगररचना, भूमी अभिलेख व इतर अधिकारी, अशा ५० जणांची उपस्थिती होती. ग्रामजीवन उंचावणार ग्रामीण भागाच्या जवळून हा रस्ता जाणार आहे. तेथे सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध (पान २ वर) ४नागपूर-सेलडोह-वर्धा-येळी-पुलगाव-धामणगाव-वखफळी-कारंजा लाड-सेलू बाजार-मालेगाव-मेहकर-दुसरबीड-सिंदखेडराजा-जालना-शेंद्रा-औरंगाबाद-सावंगी-दौलताबाद-लासूर-वैजापूर-शिर्डी-गोंदे-पिंपळगाव मोर-घोटी, देवळी-खर्डी-शहापूरजवळील कासेगाव-वडपे (भिवंडी बायपास) असा हा सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे असेल. पुढे ते कापूरबावडी जंक्शनवरून मुंबई असा जाईल. २२ जिल्ह्यांना जोडणार हा महत्त्वाकांक्षी मार्ग प्रत्यक्ष ११ जिल्ह्यांमधून जाणार असला तरी चारपदरी जोडरस्त्यांनी तो अन्य ११ जिल्ह्यांना जोडला जाणार आहे. विदर्भ-मराठवाडा, उत्तर व पश्चिम महाराष्ट्राच्या विकासाचा हा महामार्ग असेल. नागपूर ते औरंगाबाद हे अंतर तीन तासांत तर त्यापुढील मुंबईपर्यंतचे अंतर तीन तासांत कापता येईल.