शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
3
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
4
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
5
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
6
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
7
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
8
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
9
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
10
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
11
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
12
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
13
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
14
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
15
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!
16
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
17
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
18
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
19
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
20
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे

पाच वर्षांत घाटीचा कायापालट

By admin | Updated: August 22, 2014 00:21 IST

बापू सोळुंके, औरंगाबाद शासकीय कॅन्सर हॉस्पिटल हे घाटीचाच अविभाज्य घटक म्हणून ओळखले जाते. आमखास मैदान येथे उभारण्यात आलेले भव्य शासकीय कॅन्सर हॉस्पिटल २१ सप्टेंबर २०१२ रोजी रुग्णसेवेत दाखल झाले.

बापू सोळुंके, औरंगाबादशासकीय कॅन्सर हॉस्पिटल हे घाटीचाच अविभाज्य घटक म्हणून ओळखले जाते. आमखास मैदान येथे उभारण्यात आलेले भव्य शासकीय कॅन्सर हॉस्पिटल २१ सप्टेंबर २०१२ रोजी रुग्णसेवेत दाखल झाले. या हॉस्पिटलची ख्याती ऐकून संपूर्ण महाराष्ट्रातील रुग्ण उपचारासाठी याच रुग्णालयास पसंती देत आहेत. परिणामी तेथील खाटा अपुऱ्या पडत असल्याने प्रशासनाने हॉस्पिटलचा दुसरा टप्पा उभारण्यास तातडीने मंजुरी द्यावी, अशी मागणी शासनाकडे केली आहे.घाटीतील किरणोपचार विभागात कॅन्सरच्या रुग्णांवर उपचार केले जातात. कॅन्सरवरील उपचार दीर्घकाळ चालतात. रुग्णांसोबत त्यांचे नातेवाईकही घाटीच्या आवारात फुटपाथावर पडलेले दिसतात. कॅन्सरच्या रुग्णांना अ‍ॅडमिट राहता येईल असे स्वतंत्र शासकीय कॅन्सर हॉस्पिटल औरंगाबादेत उभारावे, यासाठी शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा यांनी शासनाकडे प्रस्ताव सादर के ला आणि मंजूर करून घेतला. सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आमखास मैदान येथील जागाही मिळवून दिली. हॉस्पिटलसाठी निधी कमी पडू दिला नाही. शिवाय हॉस्पिटलचे काम योग्य होते अथवा नाही, याची पाहणी करण्यासाठी त्यांनी वेळोवेळी बांधकामस्थळी भेटीही दिल्या. कंत्राटदाराने उत्कृष्ट बांधकाम करून हॉस्पिटलची नवीन इमारत घाटीच्या ताब्यात दिली. २१ सप्टेंबर २०१२ रोजी हॉस्पिटल रुग्णसेवेत दाखल झाले. शंभर खाटांची क्षमता असलेल्या या आलिशान हॉस्पिटलमध्ये आठ आॅपरेशन थिएटर आहेत. शिवाय महिला आणि पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड, स्वतंत्र बाह्यरुग्ण विभाग, पॅथॉलॉजी लॅब आहे. हॉस्पिटल सुरू झाल्याचे कळताच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून रुग्ण तेथे दाखल होऊ लागले. तेथील अद्ययावत यंत्रणा केवळ कॅन्सरच्या पेशीच जाळून टाकते. हे करताना चांगल्या पेशीचे नुकसानही होऊ देत नाही. परिणामी किरणोपचारामुळे होणारे साईड इफेक्टस् येथे उपचार घेणाऱ्या रुग्णांना सोसावे लागत नाहीत. शिवाय राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत मोफत उपचार येथे उपलब्ध आहेत. कॅन्सरवरील उपचार घेण्यासाठी रुग्ण शासकीय कॅन्सर हॉस्पिटलला प्राधान्य देत आहेत. परिणामी हॉस्पिटलमध्ये रुग्णांची गर्दी दिवसेंदिवस वाढत आहे.मेडिसीन विभागाला कॉर्पोरेट लूकघाटीत दाखल होणाऱ्या एकूण रुग्णांपैकी सुमारे ४० टक्के रुग्ण हे मेडिसीन विभागाशी संबंधित असतात. विषबाधा, विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे रुग्ण, सर्पदंश झालेले, डेंग्यू, मलेरिया, गॅस्ट्रो, कॉलरा, चिकुन गुनिया, स्वाईन फ्लू अशा विविध साथींचे रुग्ण, टी.बी., एच.आय.व्ही. एड्स, कुत्रा चावल्यामुळे होणारा रेबीज, अशा विविध प्रकारांच्या आजाराचे रुग्ण मेडिसीन विभागात विविध वॉर्डांत अ‍ॅडमिट होतात. जानेवारी २०१३ पूर्वी मेडिसीन विभागाचे विविध वॉर्ड विखुरलेले होते. प्रत्येक वॉर्डात जाऊन रुग्णावर उपचार करताना डॉक्टरांची दमछाक होई. शालेय शिक्षणमंत्री राजेंद्र दर्डा हे घाटी रुग्णालय अभ्यागत समितीचे अध्यक्ष असताना २००८ साली त्यांनी मेडिसीन विभागाचे विखुरलेले वॉर्ड एकाच छताखाली आणण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी शासनाकडून निधी मिळवून मेडिसीन विभागासाठी सर्व सुविधा असलेली दोन मजली टोलेजंग इमारत उभारण्यात आली. जानेवारी २०१३ मध्ये ही इमारत मेडिसीन विभागाच्या ताब्यात देण्यात आली. तेव्हापासून मेडिसीन विभागाचे विविध वॉर्ड, एमआयसीयू, आयसीयू, पॅथॉलॉजी लॅब एकाच छताखाली आणण्यात आले.