प रभणी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला़ या बालेकिल्ल्याची राजधानी म्हणजे परभणी शहऱ या वेळीच्या लोकसभा निवडणुकीत सेनेने परभणी बालेकिल्ला असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध केले़ परंतु, परभणी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला पिछाडीवर रहावे लागले आणि हीच पिछाडी सेनेसाठी चिंतेची आणि चिंतनाची बाब ठरली आहे़ परभणी जिल्ह्यात लोकसभेवर ३५ वर्षांपासून सेनेचे अधिराज्य आहे़ परभणी लोकसभेबरोबरच परभणी विधानसभादेखील शिवसेनेचाच गड आहे़ या विधानसभा मतदारसंघही २५ वर्षांपासून शिवसेनेच्या ताब्यात आहे़ अद्यापपर्यंत हा गड अभेद्य आहे़ यावेळेसही परंपरेप्रमाणे जनतेने सेनेच्या पारड्यात कौल दिला आहे़ शिवसेनेचे आ़ बंडू जाधव लोकसभा निवडणुकीत तब्बल सव्वा लाख मतांनी विजयी झाले़ परभणी लोकसभेतील परभणी मतदारसंघ वगळता इतर सर्व विधानसभा मतदारसंघात सेनेला मताधिक्य आहे़ परभणी येथे शिवसेनेचे मताधिक्य का घटले याचे चिंतन होणे गरजेचे आहे़ यावेळच्या निवडणुकीत शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस आघाडीने लढत दिली़ शिवसेना आणि राष्ट्रवादी आघाडी या दोघांच्या ताकदीचा विचार केला तर राकाँकडे माप झुकते जाते़ परंतु, मोदी लाटेमुळे परभणी मतदार संघातही सेनेला मताधिक्य मिळेल, असा होरा होता़ ग्रामीण भागावर शिवसेनेची अजूनही पकड आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातून सेनेला मताधिक्य मिळणे अपेक्षित होते, परंतु तसे झाले नाही़ या मतदार संघात बंडू जाधव हे स्वत: आमदार आहेत़ तसेच जिल्हा परिषदेच्या १० गटांपैकी ४ गट सेनेच्या ताब्यात आहेत़ शहरी भागात नगरपालिकेमध्ये सेनेचे ८ तर मित्र पक्ष असलेल्या भाजपाचे २ सदस्य आहेत़ दुसर्या बाजुला परभणी जि़प़ गटात राकाँचे ४, काँग्रेसचे २ सदस्य आहेत़ महानगरपालिकेतही राकाँची सत्ता आहे़ त्यामुळे राकाँची ताकद अधिक असली तरी विधानसभेवर शिवसेनेचा भगवा असताना आणि मोदींची लाट असतानाही राकाँला साडेनऊ हजाराचे मताधिक्य या मतदार संघाने दिले़ या निवडणुकीवरच आगामी विधानसभेचे समीकरणे अवलंबून आहेत़ त्यामुळे या निवडणुकीत परभणीत घटलेले मताधिक्य सेनेसाठी चिंतेची बाब आहे़ या विषयी निश्चितच आत्मपरीक्षण करण्याची गरज निर्माण झाली आहे़ काय घडले मतदारसंघात परभणी मतदारसंघात स्थानिक स्वराज्य संस्थांवर राष्ट्रवादीचीच पकड आहे़ शहरी भागातही राकाँचे प्राबल्य आहे़ या निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिष्ठा पणाला लावली होती़ या कारणामुळे राकाँला या मतदारसंघामधून ९ हजार ५४५ मतांची आघाडी मिळाली़ मतदारसंघात प्रथमच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोघांनीही एकत्रित येऊन लढा दिला़ काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश देशमुख यांच्यासह काँग्रेस पक्षाचे सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादीचे काम केले़ त्याचा फायदा मताधिक्य मिळण्यात आला़ प्रत्येक प्रभागात नगरसेवकांनी केलेल्या प्रचारामुळे राकाँला आघाडी मिळाली़ जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकास केला जातो़ या जिल्हा परिषदेत परभणी मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँगे्रसचे प्राबल्य आहे़ तसेच अनेक ग्रामपंचायतीही राकाँकडे आहेत़ यामुळे या निवडणुकीत राकाँला एकमेव परभणीत आघाडी मिळू शकली़ अनेक कॉलन्यामध्ये मतांची टक्केवारी घसरली. ही टक्केवारी वाढविण्यासाठी अधिक प्रयत्न होणे आवश्यक आहेत.
परभणीतील पिछाडी शिवसेनेसाठी चिंतेची
By admin | Updated: May 18, 2014 00:38 IST