शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

परभणीतील जलकुंभाचे काम रखडले

By admin | Updated: September 12, 2014 00:07 IST

परभणी : सुजल निर्मल अभियानांतर्गत राजगोपालचारी उद्यान आणि रामकृष्णनगर येथे सुरू करण्यात आलेले जलकुंभाचे काम मागील काही महिन्यांपासून रखडले आहे.

परभणी : सुजल निर्मल अभियानांतर्गत राजगोपालचारी उद्यान आणि रामकृष्णनगर येथे सुरू करण्यात आलेले जलकुंभाचे काम मागील काही महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे शहरवासियांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.परभणी शहरात पाण्याची समस्या निर्माण झाल्याने २००९ मध्ये महाराष्ट्र शासनाने सुजल निर्मल अभियानांतर्गत शहरी भागातील नागरिकांच्या पाण्याची समस्या दूर व्हावी, या उद्देशाने पाणीपुरवठा योजना मंजूर केली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी अनुदान दिले जाते. परभणी नगरपालिका असताना हे अनुदान मंजूर करण्यात आले. त्यासाठी लागणारा २९ लाख रुपयांचा लोकवाटा २०११ मध्ये अदा करुन योजनेसाठी मिळणारे अनुदान प्राप्त करण्यासाठी अर्हता पूर्ण केली आहे. या योजनेअंतर्गत राजगोपालचारी उद्यान आणि रामकृष्णनगर या ठिकाणी जलकुंभ उभारण्याचे नियोजन करण्यात आले. ११ नोव्हेंबर २०१२ रोजी राजगोपालचारी उद्यानातील जलकुंभाच्या पायाभरणीचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. परंतु आजतागायत हे काम रखडले आहे. दोन्ही ठिकाणच्या जलकुंभाची क्षमता २४ लाख लिटर एवढी आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.दरम्यान, या प्रश्नावर भारिप-बहुजन महासंघाने एक सविस्तर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. महानगरपालिका अभियंत्याकडून या कामाचा प्रगती अहवाल मागवून घ्यावा, अहवाल समाधानकारक नसल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी, योजना राबविण्यात कोठे त्रुटी आहे किंवा अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी उपाययोजना करुन नागरिकांची पाण्यासाठी होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी भारिप- बहुजन महासंघाने केली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या या निवेदनावर बाबासाहेब जाधव, भाऊसाहेब गुळवे, सचिन गंगाखेडकर, गौतम रणखांबे, संदीप खाडे, नितीन लहाने, अनुरथ झोडपे, किशन गवळे, सखाराम उजागर, साहेबराव साळवे, मोतीराम सौंदडकर, नामदेव ढेपे, रामराव सावंत, अमोल सिरसमकर, भानुदास सावंत, प्रकाश वाकळे, बुद्धभूषण जाधव, उमेश वारकर, प्रशांत कांबळे, श्रवण इंगोले, किरण डुमने, विशाल मगरे आदींची नावे आहेत.या वसाहतींना होणार फायदाया दोन्ही जलकुंभाचे काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरू झाल्यास वजिराबाद, गुलजार कॉलनी, बरकर नगर, सेवकनगर, राहत कॉलनी, कॅनाल झोेपडपट्टीचा भाग, धाररोड स्थित झोपडपट्टी, अशोकनगर, फुले कॉलनी, मरीमाता मंदिर परिसर, गुलशनबाग, युसूफ कॉलनी परिसर, सहयोग कॉलनी, मकदूमपुरा, पार्वतीनगर, राहूलनगर, जवाहर कॉलनी, ज्ञानेश्वरनगर, मोची कॉलनी, सारनाथ कॉलनी, श्रीनिवास कॉलनी, डी.आर.बी. कॉलनी, गांधीनगर, मराठवाडा प्लॉट परिसर, गणेशनगर, खाजा कॉलनी, पोस्टमन कॉलनी, राजाराणी मंगल कार्यालय परिसर, स्वच्छता कॉलनी, नगरपरिषद कॉलनी, बँक कॉलनी, दर्गा रोड, गणेशनगर, सुभेदारनगर, इकबालनगर, दादाराव प्लॉट, वकील कॉलनी, लहुजीनगर आदी वसाहतींना फायदा होणार आहे.