शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकाल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
3
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
4
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
5
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
6
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
7
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
8
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
9
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
10
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
11
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
12
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
13
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
14
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
15
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
16
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
17
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
18
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
19
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
20
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार

परभणीतील जलकुंभाचे काम रखडले

By admin | Updated: September 12, 2014 00:07 IST

परभणी : सुजल निर्मल अभियानांतर्गत राजगोपालचारी उद्यान आणि रामकृष्णनगर येथे सुरू करण्यात आलेले जलकुंभाचे काम मागील काही महिन्यांपासून रखडले आहे.

परभणी : सुजल निर्मल अभियानांतर्गत राजगोपालचारी उद्यान आणि रामकृष्णनगर येथे सुरू करण्यात आलेले जलकुंभाचे काम मागील काही महिन्यांपासून रखडले आहे. त्यामुळे शहरवासियांना पाण्याच्या समस्येला सामोरे जावे लागत आहे.परभणी शहरात पाण्याची समस्या निर्माण झाल्याने २००९ मध्ये महाराष्ट्र शासनाने सुजल निर्मल अभियानांतर्गत शहरी भागातील नागरिकांच्या पाण्याची समस्या दूर व्हावी, या उद्देशाने पाणीपुरवठा योजना मंजूर केली. या योजनेच्या पहिल्या टप्प्यात पायाभूत सुविधा उभारण्यासाठी अनुदान दिले जाते. परभणी नगरपालिका असताना हे अनुदान मंजूर करण्यात आले. त्यासाठी लागणारा २९ लाख रुपयांचा लोकवाटा २०११ मध्ये अदा करुन योजनेसाठी मिळणारे अनुदान प्राप्त करण्यासाठी अर्हता पूर्ण केली आहे. या योजनेअंतर्गत राजगोपालचारी उद्यान आणि रामकृष्णनगर या ठिकाणी जलकुंभ उभारण्याचे नियोजन करण्यात आले. ११ नोव्हेंबर २०१२ रोजी राजगोपालचारी उद्यानातील जलकुंभाच्या पायाभरणीचा प्रारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. परंतु आजतागायत हे काम रखडले आहे. दोन्ही ठिकाणच्या जलकुंभाची क्षमता २४ लाख लिटर एवढी आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.दरम्यान, या प्रश्नावर भारिप-बहुजन महासंघाने एक सविस्तर निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. महानगरपालिका अभियंत्याकडून या कामाचा प्रगती अहवाल मागवून घ्यावा, अहवाल समाधानकारक नसल्यास संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करावी, योजना राबविण्यात कोठे त्रुटी आहे किंवा अडथळे आहेत ते दूर करण्यासाठी उपाययोजना करुन नागरिकांची पाण्यासाठी होणारी हेळसांड थांबवावी, अशी मागणी भारिप- बहुजन महासंघाने केली आहे. या मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या या निवेदनावर बाबासाहेब जाधव, भाऊसाहेब गुळवे, सचिन गंगाखेडकर, गौतम रणखांबे, संदीप खाडे, नितीन लहाने, अनुरथ झोडपे, किशन गवळे, सखाराम उजागर, साहेबराव साळवे, मोतीराम सौंदडकर, नामदेव ढेपे, रामराव सावंत, अमोल सिरसमकर, भानुदास सावंत, प्रकाश वाकळे, बुद्धभूषण जाधव, उमेश वारकर, प्रशांत कांबळे, श्रवण इंगोले, किरण डुमने, विशाल मगरे आदींची नावे आहेत.या वसाहतींना होणार फायदाया दोन्ही जलकुंभाचे काम पूर्ण होऊन पाणीपुरवठा सुरू झाल्यास वजिराबाद, गुलजार कॉलनी, बरकर नगर, सेवकनगर, राहत कॉलनी, कॅनाल झोेपडपट्टीचा भाग, धाररोड स्थित झोपडपट्टी, अशोकनगर, फुले कॉलनी, मरीमाता मंदिर परिसर, गुलशनबाग, युसूफ कॉलनी परिसर, सहयोग कॉलनी, मकदूमपुरा, पार्वतीनगर, राहूलनगर, जवाहर कॉलनी, ज्ञानेश्वरनगर, मोची कॉलनी, सारनाथ कॉलनी, श्रीनिवास कॉलनी, डी.आर.बी. कॉलनी, गांधीनगर, मराठवाडा प्लॉट परिसर, गणेशनगर, खाजा कॉलनी, पोस्टमन कॉलनी, राजाराणी मंगल कार्यालय परिसर, स्वच्छता कॉलनी, नगरपरिषद कॉलनी, बँक कॉलनी, दर्गा रोड, गणेशनगर, सुभेदारनगर, इकबालनगर, दादाराव प्लॉट, वकील कॉलनी, लहुजीनगर आदी वसाहतींना फायदा होणार आहे.