शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

दोन तालुक्यांत कागदोपत्री विमा; कृषी आयुक्तालयाकडून चौकशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:04 IST

औरंगाबाद : जिल्ह्यातील सिल्लोड आणि सोयगाव या दोन तालुक्यांत सुमारे एक लाख शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा केंद्रशासन नियुक्त कंपन्यांनी कागदोपत्री ...

औरंगाबाद : जिल्ह्यातील सिल्लोड आणि सोयगाव या दोन तालुक्यांत सुमारे एक लाख शेतकऱ्यांच्या पिकांचा विमा केंद्रशासन नियुक्त कंपन्यांनी कागदोपत्री काढण्यात आल्याप्रकरणी कृषिमंत्री दादा भुसे यांच्याकडे ३० मे रोजी पुरावे सादर करून चौकशीची मागणी करण्यात आली होती. या प्रकरणात कृषी आयुक्तालयाकडून चौकशी करण्यात येणार असून, त्यासाठी तयारी झाल्याची माहिती कृषी अधिकारी तुकाराम मोटे यांनी दिली.

राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यासंदर्भात तहसीलदार, तसेच महसुली यंत्रणा आणि तालुका कृषी अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप करीत कृषिमंत्र्यांकडे तक्रार केली होती. विमा कंपन्या शेतकऱ्यांचे नुकसान केले असून, सर्वांत अगोदर ज्यांच्या विमापत्रावर स्वाक्षऱ्या आहेत. त्यात तहसीलदार, विमा कंपनी प्रतिनिधी, कृषी अधिकारी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. या सर्वांची चौकशी करून कारवाई केली नाहीतर रस्त्यावर उतरून आंदोलनाचा इशारा अब्दुल सत्तार यांनी दिला होता. एक लाख शेतकऱ्यांना पीक विम्यापासून वंचित ठेवल्याचा, तसेच सर्वांत कमी पीक उत्पादन झालेले असताना २६० टक्के वाढ दाखविण्यात आली असून, ४२ टक्के आणेवारी आणि उत्पन्न २६० टक्के दाखविण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.

चौकट...

विम्यापोटी कंपन्यांनी घेतले ३८ कोटी

जिल्ह्यात एचडीएफसी इर्गो या विमा कंपनीने किमान आठ लाख खातेधारक शेतकऱ्यांचा विम्यापोटी ३८ कोटी रुपये भरले; मात्र विम्याचा केवळ लाभ १ लाख ३० हजार शेतकऱ्यांनाच लाभ मिळाला. अतिवृष्टीने कन्नड, गंगापूर, वैजापूर या तालुक्यांतील अनेक गावांत शेत पिकाचे नुकसान झाले. जिल्ह्यामध्ये कापूस, मका, सोयाबीन आणि इतर पिके हातून गेली. विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना सरसकट नुकसानभरपाई मिळावी अशी, शेतकऱ्यांची मागणी आजवर पूर्ण झालेली नाही.

चौकट...

भाजपचा राज्य सरकार, विमा कंपन्यावर आरोप

दरम्यान, राज्य सरकारच्या पीक विमा धोरणाविरोधात शेतकऱ्यांमध्ये मोठा असंतोष आहे. खासगी विमा कंपनी व कृषी विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संगनमताने शेतकऱ्यांची अडवणूक करण्यात येत आहे, असा आरोप खा. डॉ. भागवत कराड यांनी केला.

जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी अतिवृष्टीने पिकाचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. विमा मात्र केवळ दहा ते पंधरा टक्के शेतकऱ्यांना मिळाला. याबाबत राज्य सरकारकडे दाद मागणार असून, विभागीय आयुक्त यांना निवेदन देण्यात येईल, असे खा. कराड यांनी कळविले आहे.

राज्य सरकारने विमा देताना पाच वर्षांचे सरासरी पीक उत्पादन व उंबरठा अहवाल कागदोपत्री बनविला, परिणामी विमा कंपन्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विमा रक्कम कमी मिळाली, असे खा. कराड यांनी सांगितले. त्यांनी कृषी विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन पीक विम्यातील त्रुटी आणि सद्य:स्थिती समजून घेतली. कृषी सहसंचालक, जिल्हा कृषी अधीक्षक यांच्यासमवेत बैठक घेऊन विमा वाटपातील त्रुटी आणि उपाय याबाबत त्यांनी माहिती घेतली. यावेळी सहसंचालक डी. एल. जाधव, जिल्हा कृषी अधीक्षक टी. एस. मोटे, उदय देवळाणकर, कृषी सांख्यिकी एचडीएफसीचे विमा प्रतिनिधी आर. के. भिंगारे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष संजय खंबायते उपस्थित होते.