शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
6
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
7
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
8
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
9
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
10
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
11
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
12
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
13
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
14
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
15
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
16
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
17
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
18
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
19
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
20
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला

पंढरीची वारी, यंदाही घरूनच साजरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:05 IST

जयेश निरपळ गंगापूर : वारी म्हणजे महाराष्ट्राचं मोठं सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक वैभव आहे. दरवर्षी ज्येष्ठ-आषाढ महिन्यात वारकरी मनाला वेध ...

जयेश निरपळ

गंगापूर : वारी म्हणजे महाराष्ट्राचं मोठं सांस्कृतिक, सामाजिक, आध्यात्मिक वैभव आहे. दरवर्षी ज्येष्ठ-आषाढ महिन्यात वारकरी मनाला वेध लागतात ते पंढरपूरच्या वारीचे. परंतु कोरोना महामामारीमुळे शेकडो वर्षांची परंपरा असलेली वारी खंडित झाली असून सलग दुसऱ्या वर्षी पांडुरंगाचे दर्शन होणार नसल्याने तालुक्यातील वारकरी निराश झाले आहेत. वारकरी प्रत्येक वर्षी दिंडीची आतुरतेने वाट पाहत असतो.

घोंगटा, राहुटीसह इतर आवश्यक साहित्याची जुळवाजुळव अनेक दिवसांआधीच मोठ्या उत्साहात वारकरी करीत असतात. भजन, प्रवचन, कीर्तन, रिंगण, फुगडी पावसामुळे निर्माण झालेला मृदगंध आदींच्या साक्षीनं हा सोहळा फुलतो. पंढरीची वारी म्हणजे वारकऱ्यांची दिवाळीच. येथील विठ्ठल आश्रम, देवगड संस्थान, रामगड, सरला बेट व आदी दिंड्यांमार्फत तालुक्यातील साधारणपणे सात ते आठ हजार वारकरी दरवर्षी ‘पंढरीचा वारकरी ! वारी चुको न दे हरी !’ या तुकोबांच्या अभंगाप्रमाणे पंढरपूरची वाट धरतात. यामध्ये महिलांचा देखील मोठ्या प्रमाणात समावेश असतो. विशेष म्हणजे या दिंड्यांचा उल्लेख महाराष्ट्रातील मानाच्या दिंड्यामध्ये होतो. वारीसाठी विशेष नियम करून दिंड्यांना मान्यता द्यायला हवी होती, असं काहींच मत आहे.

--

कोरोनाचा प्रादुर्भावदेखील कमी झाला असून वारीसाठी विशेष नियम तयार करून दिंड्यांना मान्यता द्यायला हवी होती. जेणे करून वारकऱ्यांचा हिरमोड झाला नसता. - हभप रामभाऊ महाराज राऊत, दिंडी प्रमुख, विठ्ठल आश्रम.

शासनाने अतिशय विचारपूर्वक निर्णय घेतला असून यामध्ये वारकऱ्यांचे हित आहे. या निर्णयाचा आम्ही आदर करतो. सध्याच्या नैसर्गिक संकटात गरजवंताला मदत करून खऱ्या अर्थाने विठ्ठल भक्तीचा आंनद घेता येऊ शकतो. - प्रा. गिरजीनाथ जाधव, प्रसिद्धी प्रमुख, अ. भा. वा. परिषद.