शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
2
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
3
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
4
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
5
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
6
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
7
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
8
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
9
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
10
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
11
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
12
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
13
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
14
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
15
'भारताच्या भरभराटीसाठी अमेरिकेची भागीदारीच महत्त्वाची, पुन्हा...'; उद्योगपती हर्ष गोयंकांनी सांगितली सात कारणे
16
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव
17
ऑस्ट्रेलियन क्रिकेटर स्टंपमध्ये माईक असतो ते विसरला; रागाच्या भरात नको ते बोलून फसला!
18
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुमीत राघवनचा संताप, गडकरी-फडणवीसांना 'हे' तंत्रज्ञान वापरण्याचा सल्ला
19
"माझ्या पत्नीला स्वत:कडे ठेवतो अन् त्याची बायको माझ्याकडे पाठवतो..."; युवकाची अजब कहाणी, पोलीस हैराण
20
GST कपातीनंतर Alto, Swift, Dzire आणि WagonR किती रुपयांना मिळेल? जाणून घ्या...

जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागातील पंचनामे

By admin | Updated: June 5, 2014 00:50 IST

जालना : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये वादळी वार्‍यासह अनेक गावांमध्ये गारपीट झाल्याने घरांवरील पत्रे उडाली. तर असंख्य झाडे उन्मळून पडली.

जालना : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये वादळी वार्‍यासह अनेक गावांमध्ये गारपीट झाल्याने घरांवरील पत्रे उडाली. तर असंख्य झाडे उन्मळून पडली. यामुळे जीवित हानी वगळता घरांचे मोठे नुकसान झाले. विद्युत तारा निखळल्या, खांबही पडले. त्यामुळे अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला आहे. जिल्हा प्रशासनाने संबंधित गावांमध्ये पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. जिल्ह्यात २ व ३ जून रोजी अनेक ठिकाणी वादळी वार्‍यासह मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली. या वादळी वार्‍यासह गारपिटीमुळे अनेक शेतकर्‍यांच्या घरांवरील पत्रे उडाले. त्यामुळे त्यांचे संसार उघड्यावर पडले. त्याचप्रमाणे झाडे उन्मळून पडल्याने विद्युत तारा तुटणे, विद्युत खांब पडणे यासारखे प्रकारही घडले. त्यामुळे अनेक गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला. याबाबत संबंधित गावात जाऊन पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. जालना तालुक्यातील मानेगाव, निपाणी पोखरी, नसडगाव, घोडेगाव, धानोरा, टाकरवन, हस्तेपिंपळगाव, मोतीगव्हाण, हिवर्डी या भागात नुकसान झाले. चार्‍याच्या थप्प्याही उडाल्या. उपविभागीय अधिकारी मंजुषा मुथा व तहसीलदार जे.डी. वळवी यांनी मंगळवारी या भागाचा दौरा करून बाधित भागांची पाहणी केली. या भागाचा पंचनामा करून अहवाल गटविकास अधिकारी यांच्याकडे दिला जाणार आहे. त्यांच्याकडून नुकसानग्रस्तांना मदत मिळू शकेल, असे सूत्रांनी सांगितले. जिल्ह्यात जालना तालुक्यासह अंबड, घनसावंगी, परतूर, मंठा,आणि बदनापूर या तालुक्यांतील काही गावांमध्येही वादळी वार्‍यासह गारपीट झाली. या भागातील पंचनामेही करावेत, अशी मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे. (प्रतिनिधी)पारडगाव भागात मोठे नुकसान पारडगाव - घनसावंगी तालुक्यातील पारडगांव परिसरातील यावलपिंप्री, पांगरा, पारडगाव येथे ३ जून रोजी सायंकाळी ५ च्या सुमारास अवकाळी वार्‍यासह पावसाने हजेरी लावली. घरावरचे पत्रे उडून गेले तसेच परिसरातील १५ ते २० विद्युत खांब पडले. तारा तुटल्या. त्यामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. नुकसान झालेल्या गावांची पाहाणी करण्यासाठी घनसावंगीचे तहसीलदार अभय चव्हाण, सुधीर देशमुख, आर. बी. माळी आणि एम. एस. ई. बी. चे सहाय्यक अभियंता गुजरगे, रांजणीचे दुय्यम अभियंता एस. पी. पासवान यांनी गावात येवून झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी तलाठी गैरहजर होते. ग्रामस्थांनी तहसीलदारांना गावात तलाठी येत नसल्याचे सांगितले. तेव्हा तहसीलदार यांनी सांगितले की, तलाठी पंचनामे करण्यासाठी गावात येईल. गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तलाठ्याबद्दल ग्रामस्थांनी गावात येत नसल्याबाबत तक्रार केलेली आहे. काही ग्रामस्थांनी सांगितले, आजपर्यंत आम्ही तलाठी यांना बघितले सुध्दा नाही. गोरगरिबांच्या घरावरचे पत्र उडालेले असून काही ग्रामस्थांच्या घरावर पत्रा सुध्दा नाही, अशी ग्रामस्थाची परिस्थिती आहे.