शहरं
Join us  
Trending Stories
1
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
2
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा
3
IPL 2025: लखनौच्या अडचणीत वाढ, दुखापतीमुळं मयांक यादव आयपीएलमधून बाहेर!
4
Shiv Sena: पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील संशयितांची माहिती देणाऱ्याला १० लाख रुपयांचे बक्षीस
5
भारताचा तुर्कीला दणका, विमानतळांवर सेवा देणाऱ्या सेलेबी कंपनीची सुरक्षा मंजुरी केली रद्द!
6
बिहार दौऱ्यात राहुल गांधी यांच्याविरोधात दोन गुन्हे दाखल, पोलिसांनी शंभराहून अधिक जणांना केलं आरोपी
7
India Pakistan Ceasefire: "भारत-पाकिस्तान यांच्यात १८ मेपर्यंत शस्त्रसंधी"; पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री डार यांचे विधान
8
आधी ट्रम्प यांच्यावर भडकली, नंतर पोस्ट डिलीट; कंगना म्हणाली, "जेपी नड्डांनी डिलीट करायला सांगितली"
9
ED Raid: 23 कोटींचं सोनं, 8 कोटी रोख; वसई विरार मनपाचे नगररचना उपसंचालक रेड्डीकडे सापडली कोट्यवधींची माया
10
Donald Trump : "मी असं म्हणत नाही की..."; भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठे दावे करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांची पलटी
11
सुटी रद्द झाल्याने कामावर परतणाऱ्या मेजरवर काळाचा घाला; डोळ्यादेखत पत्नीचा मृत्यू, लेक गंभीर जखमी
12
'पाकिस्तानशी फक्त दहशतवाद अन् PoK वर चर्चा होईल; तिसऱ्याचा हस्तक्षेप खपवून घेणार नाही'
13
'गदर'मधला दरम्यान सिंग आठवतोय का? एका आजारामुळे झालं होत्याचं नव्हतं, अभिनेत्याचा झाला दुर्देवी शेवट
14
व्यापाऱ्यांनी कोणाच्या धमकीला भीक घालू नये; आम्ही तुमच्या पाठीशी आहोत - देवेंद्र फडणवीस
15
इंग्लंड दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा; 'लेडी सेहवाग'ला मिळाली कमबॅकची संधी
16
अटक करण्याची धमकी देत मागितली खंडणी: उल्हासनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस निलंबित
17
Crime: निवृत्त न्यायाधीशाच्या दोन मुले आणि सुनेला जन्मठेपेची शिक्षा; 2007 मधील प्रकरण काय?
18
Motivational Story: वडिलांचं सायकल दुरूस्तीचं दुकान, कष्टाची जाणीव ठेवून मुलानं दहावीत मिळवले घवघवीत यश
19
आश्चर्यकारक! आरोपीने बलात्कार पिडितेला भरकोर्टात केलं 'प्रपोज'; सर्वोच्च न्यायालयातील प्रसंग
20
"बेटा, सरेंडर कर", दहशतवाद्याने चकमकीआधी आईला केलेला Video कॉल; तिने समजावलं पण...

पंचनाम्याची प्रक्रिया संथ गतीने

By admin | Updated: April 16, 2015 00:59 IST

बाळासाहेब जाधव , लातूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे फळबागा, भाजीपाला व धान्य पिकांचेही मोठे नुकसान झाले. हजारो हेक्टर्सवरील पिके व फळबागांचे नुकसान होऊनही

बाळासाहेब जाधव , लातूरजिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे फळबागा, भाजीपाला व धान्य पिकांचेही मोठे नुकसान झाले. हजारो हेक्टर्सवरील पिके व फळबागांचे नुकसान होऊनही पंचनाम्यांच्या कामांना मात्र गती मिळाली नाही. प्रातिनिधिक स्वरुपात औसा तालुक्यातील किल्लारी येथील फळबागांचे पंचनामे सुरू करण्यात आले. परंतु, उर्वरित पंचनाम्यांच्या कामांना मात्र तब्बल तीन दिवस होऊनही सुरुवातच झाली नसल्याने शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.लातूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने पिकांचे, फळबागांचे व धान्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लातूर तालुक्यातील ६४ गावांतील ४०४ हेक्टर्स फळबाग क्षेत्र, ३७५ भाजीपाला क्षेत्र व ५७५ धान्य पिकांचे क्षेत्र असे एकूण १३५४ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे. निलंगा तालुक्यातील १३५ गावांतील १९५ हेक्टर्स फळबागा, १५२ हेक्टर्स भाजीपाला, १७५ हेक्टर्स धान्य पिके अशा एकूण ५२२ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यात फळबागांचे क्षेत्र मोठे असल्याने ३३.३० हेक्टर्सवरील आंब्याच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रेणापूर तालुक्यातील ५६ गावांतील ६०.८० हेक्टर्स फळबागा, २२ हेक्टर्स भाजीपाला, १४० हेक्टर्स धान्य पिके अशा एकूण २२२ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले. देवणी तालुक्यातील ३८ गावांतील ९५ हेक्टर्सवरील फळबागा, २८ हेक्टर्सवरील भाजीपाला, ७ हेक्टर्सवरील धान्य पिके अशा एकूण १८३ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले. जळकोट तालुक्यातील २५ गावांतील २० हेक्टर्सवरील फळबागा, ५० हेक्टर्सवरील भाजीपाला, ४० हेक्टर्सवरील धान्य पिके अशा एकूण ११० हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अहमदपूर तालुक्यातील ७९ गावांतील २२१.४५ हेक्टर्सवरील फळबागा, ६३.६० हेक्टर्सवरील भाजीपाला अशा एकूण २८५.०५ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले. औसा तालुक्यातील ६३ गावांतील ३५० हेक्टर्सवरील फळबागा, १२६.७० हेक्टर्सवरील भाजीपाला, १०.६० हेक्टर्सवरील धान्य पिके असे एकूण ४८७.३० हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले. उदगीर तालुक्यातील २५ गावांतील ५५ हेक्टर्सवरील फळबागा, २० हेक्टर्सवरील भाजीपाला अशा एकूण ७५ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले. चाकूर तालुक्यातील ५२ गावांतील २५४ हेक्टर्सवरील फळबागा, १८ हेक्टर्सवरील भाजीपाला अशा एकूण २७२ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे.