शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
6
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
7
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
8
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
9
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
10
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
11
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
12
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
13
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
14
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
15
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
16
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
17
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
18
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
19
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
20
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार

पंचनाम्याची प्रक्रिया संथ गतीने

By admin | Updated: April 16, 2015 00:59 IST

बाळासाहेब जाधव , लातूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे फळबागा, भाजीपाला व धान्य पिकांचेही मोठे नुकसान झाले. हजारो हेक्टर्सवरील पिके व फळबागांचे नुकसान होऊनही

बाळासाहेब जाधव , लातूरजिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे फळबागा, भाजीपाला व धान्य पिकांचेही मोठे नुकसान झाले. हजारो हेक्टर्सवरील पिके व फळबागांचे नुकसान होऊनही पंचनाम्यांच्या कामांना मात्र गती मिळाली नाही. प्रातिनिधिक स्वरुपात औसा तालुक्यातील किल्लारी येथील फळबागांचे पंचनामे सुरू करण्यात आले. परंतु, उर्वरित पंचनाम्यांच्या कामांना मात्र तब्बल तीन दिवस होऊनही सुरुवातच झाली नसल्याने शेतकऱ्यांतून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.लातूर जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने पिकांचे, फळबागांचे व धान्य पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. लातूर तालुक्यातील ६४ गावांतील ४०४ हेक्टर्स फळबाग क्षेत्र, ३७५ भाजीपाला क्षेत्र व ५७५ धान्य पिकांचे क्षेत्र असे एकूण १३५४ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे. निलंगा तालुक्यातील १३५ गावांतील १९५ हेक्टर्स फळबागा, १५२ हेक्टर्स भाजीपाला, १७५ हेक्टर्स धान्य पिके अशा एकूण ५२२ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे. शिरूर अनंतपाळ तालुक्यात फळबागांचे क्षेत्र मोठे असल्याने ३३.३० हेक्टर्सवरील आंब्याच्या बागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रेणापूर तालुक्यातील ५६ गावांतील ६०.८० हेक्टर्स फळबागा, २२ हेक्टर्स भाजीपाला, १४० हेक्टर्स धान्य पिके अशा एकूण २२२ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले. देवणी तालुक्यातील ३८ गावांतील ९५ हेक्टर्सवरील फळबागा, २८ हेक्टर्सवरील भाजीपाला, ७ हेक्टर्सवरील धान्य पिके अशा एकूण १८३ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले. जळकोट तालुक्यातील २५ गावांतील २० हेक्टर्सवरील फळबागा, ५० हेक्टर्सवरील भाजीपाला, ४० हेक्टर्सवरील धान्य पिके अशा एकूण ११० हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे. अहमदपूर तालुक्यातील ७९ गावांतील २२१.४५ हेक्टर्सवरील फळबागा, ६३.६० हेक्टर्सवरील भाजीपाला अशा एकूण २८५.०५ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले. औसा तालुक्यातील ६३ गावांतील ३५० हेक्टर्सवरील फळबागा, १२६.७० हेक्टर्सवरील भाजीपाला, १०.६० हेक्टर्सवरील धान्य पिके असे एकूण ४८७.३० हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले. उदगीर तालुक्यातील २५ गावांतील ५५ हेक्टर्सवरील फळबागा, २० हेक्टर्सवरील भाजीपाला अशा एकूण ७५ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले. चाकूर तालुक्यातील ५२ गावांतील २५४ हेक्टर्सवरील फळबागा, १८ हेक्टर्सवरील भाजीपाला अशा एकूण २७२ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले आहे.