शहरं
Join us  
Trending Stories
1
"युद्ध थांबवलं नाही तर…’’, भारत-पाकिस्तानमधील संघर्षाचा उल्लेख करत डोनाल्ड ट्रम्प यांचा थायलंड कंबोडियाला इशारा
2
"...मग आम्हाला जगभर कशाला पाठवलं?"; IND vs PAK क्रिकेट शेड्युलवर संतापल्या प्रियंका चतुर्वेदी
3
मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात! कंटेनरचे ब्रेक फेल, अनेक वाहने एकमेकांवर धडकली...
4
IND vs ENG 4th Test Day 4 Stumps : साडे चार तासांत ३७३ चेंडूंचा सामना; KL राहुल-गिल जोडी जमली; पण लढाई अजून नाही संपली!
5
"जर 6 महिन्यांत मर्सिडीज अथवा बीएमडब्ल्यू हवी असेल तर..." सरन्यायाधीश गवई यांचा नव्या वकीलांना सल्ला
6
Asia Cup 2025: 'असं' झालं तर तब्बल तीन वेळा रंगणार IND vs PAK क्रिकेट सामना, जाणून घ्या
7
Shubman Gill Record : गिलनं साधला मोठा डाव! इंग्लंडच्या मैदानात पाक दिग्गजाला 'धोबीपछाड'
8
तेव्हा लोक म्हणाले होते जणू दुसरी ऐश्वर्याच, सलमान खानची ही हिरोईन आता दिसते अशी 
9
एलियन्सचं रहस्यमय अंतराळ यान नोव्हेंबरमध्ये करणार पृथ्वीवर हल्ला, शास्त्रज्ञांना धक्कादायक दावा
10
नवरा बायकोमध्ये तुफान भांडण, पतीच्या डोक्यात घातला हातोडा, हत्येनंतर दार लावलं अन्...
11
Video: बंगळुरूच्या महिला प्रोफेसरचा मराठमोळ्या 'वाजले की बारा' लावणीवर भन्नाट डान्स
12
"आम्ही खूप दुःखी..."; दिराने वहिनीला कुंकू लावलं अन् धबधब्यात घेतली उडी, प्रेमाचा भयंकर शेवट
13
IND vs ENG : जसप्रीत बुमराहचं 'शतक'; मँचेस्टर कसोटीतील न पटण्याजोगी गोष्ट
14
Asia Cup 2025 चे वेळापत्रक जाहीर! भारत पाकिस्तान पुन्हा एकाच गटात, 'या' दिवशी सामना
15
१४,२९८ पुरुषांना 'लाडकी बहीण'चा लाभ; अजित पवार म्हणाले, 'वसूल करणार, नाही दिले तर...'
16
"सरकार ही निरुपयोगी यंत्रणा, चालत्या गाडीला पंक्चर करण्याचं काम..."; नितीन गडकरींनी सुनावलं
17
बिहार निवडणुकीसाठी काँग्रेसची मोर्चेबांधणी, महाराष्ट्रातील या महिला खासदाराकडे सोपवली मोठी जबाबदारी
18
"बंदुकीच्या धाकाने बांगलादेशात ढकलले जातेय...!" बांगली भाषिक मुस्लिमांवरील कारवाईवरून ओवेसी भडकले
19
IND vs ENG : यशस्वीच्या पदरी लाजिरवाणा 'भोपळा'! साई आला अन् तोही फक्त 'दर्शन' देऊन गेला
20
"राहुल गांधींच्या नशिबात कायम माफी मागणे लिहीले आहे"; केंद्रीय कृषीमंत्र्यांनी काँग्रेसला घेरलं, "१० वर्षांनी पुन्हा..."

पैठण-अजिंठा ३ तासांत

By admin | Updated: September 5, 2014 00:53 IST

औरंगाबाद : गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या औरंगाबाद- अजिंठा- फर्दापूर आणि औरंगाबाद- पैठण रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे.

औरंगाबाद : गेल्या काही वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या औरंगाबाद- अजिंठा- फर्दापूर आणि औरंगाबाद- पैठण रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली आहे. या दोन्ही रस्त्यांच्या चौपदरीकरणानंतर पैठण- अजिंठा हे अंतर अवघ्या अडीच ते तीन तासांत कापता येणे शक्य होईल. त्यामुळे आगामी कालावधीत तीर्थक्षेत्र, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान आणि जगप्रसिद्ध अजिंठा लेणी या दोन ठिकाणी कमी वेळेत जाण्यासाठी सर्वसामान्य वाहनधारकांबरोबर देश- विदेशातील पर्यटकांना मोठी सुविधा होणार आहे. औरंगाबाद- अजिंठा- फर्दापूर आणि औरंगाबाद- पैठण रस्त्यांवर टोल आकारणी करून बीओटी तत्त्वावर त्यांचा विकास करण्यास राज्य मंत्रिमंडळाच्या पायाभूत सुविधांच्या उपसमितीने बुधवारी मंजुरी दिली. औरंगाबाद- अजिंठा- फर्दापूर या ९९ कि.मी. रस्त्याचा ७७५ कोटी रुपये खर्च करून विकास करण्यात येणार आहे. त्याचबरोबर औरंगाबाद- पैठण या ४५ कि.मी. रस्त्याचा २३९ कोटी रुपये खर्च करून विकास करण्यात येईल. औरंगाबादपासून काही अंतरावर असलेले पैठण शहर तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाते. जगप्रसिद्ध वेरुळ, अजिंठा लेणी, दौलताबाद आणि औरंगाबाद शहरातील पर्यटनस्थळांबरोबरच एक पर्यनस्थळ म्हणून पैठण येथेही पर्यटकांची गर्दी असते. शिवाय, जायकवाडी धरण, ज्ञानेश्वर उद्यान यासाठी पैठण प्रसिद्ध आहे. पैठण आणि चितेगावची औद्योगिक वसाहतही आहे. त्यामुळे औरंगाबाद- पैठण रस्ता वाहतुकीसाठी महत्त्वाचा ठरतो; परंतु गेल्या काही वर्षांत या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मृत्यूचा महामार्ग म्हणून रस्त्याची ओळख निर्माण होत आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून रस्त्याच्या चौपदरीकरणाची प्रतीक्षा वाहनधारकांना लागली आहे, तर दुसरीकडे औरंगाबाद- अजिंठा रस्ता सध्या दोन पदरी असून अनेक ठिकाणी वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. जगप्रसिद्ध अजिंठा लेणी पाहण्यासाठी देश- विदेशातून दरवर्षी लाखो पर्यटक येतात. त्यामुळे औरंगाबाद- फर्दापूर हा रस्ता पर्यटकांच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा ठरतो; परंतु अरुंद रस्ता, विविध ठिकाणी असलेल्या गावांमुळे वाहतुकीस ठिकठिकाणी अडथळा येतो. त्यामुळे पर्यटकांना कमी वेळेत या ठिकाणी पोहोचण्यासाठी अडचणी येतात.२०१६ अखेरीस पूर्णबांधा, वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर हे प्रकल्प राबविण्यात येत आहेत. यामध्ये राज्य आणि केंद्राच्या निधीचा वाटा असेल. या प्रकल्पांच्या निविदांना मान्यता देण्यात आल्यानंतर आता त्यांना केंद्रांची मंजुरी मिळण्याची प्रतीक्षा करावी लागेल. दोन्ही प्रकल्पांत केंदाचा २० टक्के निधीचा वाटा आहे. केंद्राची मंजुरी मिळण्यास कोणतीही अडचण नाही. त्यामुळे लवकरच संबंधित प्रकल्पांच्या कंत्राटदरांना वर्क आर्डर मिळेल; परंतु आचारसंहितेची अडचण येऊ शकते का? याकडे बघावे लागेल, अशी माहिती जागतिक बँक प्रकल्पाच्या सूत्रांनी दिली. औरंगाबाद- अजिंठा- फर्दापूर आणि औरंगाबाद- पैठण रस्त्याचे काम करण्याचा कालावधी दोन वर्षांचा राहणार आहे. त्यामुळे २०१६ च्या अखेरीस दोन्ही रस्ते पूर्ण होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. औरंगाबादहून अजिंठ्याला जाण्यासाठी सध्या जवळपास अडीच तास लागतात; परंतु औरंगाबाद- अजिंठा- फर्दापूर या रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर औरंगाबादहून अजिंठ्याला अवघ्या दीड तासात पोहोचणे शक्य होणार आहे. औरंगाबाद- पैठण मार्गाचे चौपदीकरण झाल्यानंतर औरंगाबादहून अवघ्या ४५ मिनिट ते एक तासात पैठण गाठता येईल. त्यामुळे पैठण- अजिंठा हे अंतर तीन तासांत कापणे शक्य होईल.या रस्त्यांवर वेळोवेळी वाहतुकीच्या कोंडीच्या समस्येला वाहनधारकांना सामोरे जावे लागते. चौपदीरकरणानंतर ही समस्या कायमची थांबेल. त्यामुळे वाहनधारकांच्या वेळेची बचत होईल. शिवाय, इंधनाचीही मोठी बचत होईल.