शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
4
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
5
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
6
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
7
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
8
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
9
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
10
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
11
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
12
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
13
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
14
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
15
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
16
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
17
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
18
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
19
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
20
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7 लाख कोटींची कमाई

मराठवाड्याच्या सीमेवरील पद्मावती प्रकल्प कोरडा पडण्याच्या मार्गावर!

By admin | Updated: April 19, 2016 01:08 IST

भोकरदन : मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर असलेल्या पदमावती मध्यम प्रकल्पातील पाणी चोरी कोणी थांबवायची यांचा ताळमेळ लागत नसल्यामुळे

भोकरदन : मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर असलेल्या पदमावती मध्यम प्रकल्पातील पाणी चोरी कोणी थांबवायची यांचा ताळमेळ लागत नसल्यामुळे मध्यम प्रकल्प कोरडा पडण्याच्या मार्गावर आला आहे. धरण कोरडे झाल्यावर वालसांवगी, पारध बु, पारध खुर्द, वाढोणा या भोकरदन तालुक्यातील गावासह बुलडाणा व चिखली तालुक्यातील मासरूळ, धामणगाव, तराडेखड, देऊळघाट, सोयगाव, गुम्मी या गावावर भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने वालसांवगी, पारध बु, व वाढोण्याचे सरपंच तीव्र अंदोलनाच्या पवित्र्यात आहेत़तालुक्यातील पदमावती व चिखली तालुक्यातील मासरूळ या दोन्ही गावाच्या सिमेवर हा मध्यम प्रकल्प झालेला असून, लघु पाटंबधारे विभाग चिखली अर्तगत या प्रकल्पाचे काम करण्यात आलेले असल्यामुळे विदर्भाच्या अर्तगत येतो. मात्र या प्रकल्पासाठी भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्याच्या जमिनी मोठ्या प्रमाणात गेलेल्या आहेत. शिवाय पदमावती या गावाचे पुनर्वसन सुध्दा करावे लागले होते. या प्रकल्पावरून भोकरदन तालुक्यातील पारध खुर्द, पारध बु, वालसांवगी, वाढोणा, पदमावती या गावासाठी पाणी पुरवठा योजनाचे काम करण्यात आलेले असून, त्या द्वारे गावातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र या वर्षी धरणामध्ये ८० टक्के पाणी साठा असताना सुध्दा एप्रिलच्या १९ तारखेलाच मृतसाठ्याएवढेच पाणी या राहिल्याने या धरणातील आणखी पंधरा दिवस पाणी चोरी सुरूच राहिली, तर धरण कोरडे पडणार आहे. मात्र, त्यानंतर या धरणावरून पाणी पुरवठा असलेल्या गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण होणार आहे़ या धरणातून पाणी चोरी करणारे शेतकरी सुध्दा याच गावातील आहेत. मात्र त्याना पाणीचोरी करण्यापासून कोणी रोखावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. आजही ७० ते ८० विद्युत पंपाद्वारे पाणी चोरी सुरू आहे़या धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यासाठी १० जानेवारी रोजी चिखली येथील लघु पांटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अंभियत्याने या परिसरातील विज पुरवठा बंद करण्या संदर्भात उपअभियंता विजवितरणला पत्र दिलेले आहे. त्यानंतर ३ फेबु्रवारी रोजी भोकरदनच्या तहसिलदारांनी सुध्दा वीजपुरवठा खंडीत करण्यासाठी पत्र दिले आहे.त्यानंतर महावितरणच्या वतीने एल टी लाईनचा पुरवठा बंद केला होता. मात्र या परिसरातील रोहित्राचा पुरवठा सुरूच ठेवल्याने पाणी चोरी सर्रास सुरू आहे. या भागातील विजपुरवठा खंडीत करण्यासाठी सर्व विभागाने एकत्र येऊन कार्यवाही करण्याची गरज असल्याने अधिकाऱ्यानी सुध्दा याकडे दुर्लक्ष केल्यामुळे धरण कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे़ (वार्ताहर)