शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaishnavi Hagawane Case : कस्पटे कुटुंबियांच्या भेटीनंतर अजित पवार म्हणाले, 'त्यांनी अजून दोन नावे सांगितली'
2
भारताला दहशतवादाविरोधात स्वरक्षणाचा पूर्ण अधिकार; जर्मनीने केले 'ऑपरेशन सिंदूर'चे समर्थन
3
शिंदेंच्या शिवसेनेत उफाळला वाद! बाजोरिया हटावचा नारा, शिवसैनिकांनी बॅनर जाळले
4
'भारताच्या ऑपरेशन सिंदूरमुळे खूप नुकसान झाले', पाकिस्तानी नेत्या मरियम नवाजची कबुली
5
स्पाय कॅमेऱ्यातून बायकोचे प्रायव्हेट व्हिडिओ..! निलेश चव्हाणच्या काळ्या कारनाम्यांची A टू Z स्टोरी
6
शालार्थ आयडी घोटाळा : छत्रपती संभाजीनगर बोर्डाच्या सचिव वैशाली जामदार यांना अटक
7
नागपुरात वासनांधाने ओलांडली विकृतीची सीमा, घोड्यासोबत अनैसर्गिक कृत्य
8
'मला पाडण्यासाठी भाजपने प्रयत्न केले', धर्मरावबाबा आत्राम यांचा राष्ट्रवादीच्या मेळाव्यातच आरोप
9
“ते हत्यार शोधून…” वैष्णवी हगवणे प्रकरणात वकिलांकडून मोठी अपडेट
10
'...तर आयफोनवर 25 टक्के टॅरिफ लागेल', भारतातील आयफोन निर्मितीत ट्रम्प यांचा खोडा, टिम कुक यांना इशारा
11
नागपूर शहरातील सराफा आणि हवाला व्यावसायिकांवर ईडीचे छापे, लखोटियांना घेतलं ताब्यात
12
Vaishnavi Hagawane Death Case: वैष्णवी हगवणेचा सासरा आणि दीर दोघांना २८ मे पर्यंत पोलीस कोठडी
13
Virat Kohli: विश्वविक्रमापासून विराट कोहली फक्त ६३ धावा दूर; इतिहासात पहिल्यांदाच असं घडणार!
14
भयानक वादळ, पाकिस्तानने एअरस्पेस नाकारली, मग हवाई दलाने सांभाळला मोर्चा, वाचवले २२७ प्रवाशांचे प्राण 
15
छत्तीसगडच्या सीमेवर चार माओवाद्यांचा खात्मा गडचिराेली पाेलिसांची कारवाई, जंगलात काढली रात्र
16
'भारताने वॉटरबॉम्ब टाकला, आपण उपासमारीने मरू...', पाकिस्तानी खासदाराने व्यक्त केली भीती
17
पाकव्याप्त काश्मीरपेक्षा, पाकव्याप्त काँग्रेसचा धोका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे टीकास्त्र
18
Pakistan Spy: दुसऱ्या पत्नीला भेटायला जायचा पाकिस्तानला, दिल्लीत भंगारचे काम; हेर मोहम्मद हारून कोण?
19
शेवटच्या क्षणी आरसीबीने कर्णधारच बदलला; नाणेफेकीसाठी आलेल्या खेळाडूला पाहून पॅट कमिन्स शॉक!
20
राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांना दिला असा कानमंत्र, आखली रणनीती, उत्तर देताना भाजपा नेत्यांची होणार पळापळ 

मराठवाड्याच्या सीमेवरील पद्मावती प्रकल्प कोरडा पडण्याच्या मार्गावर!

By admin | Updated: April 19, 2016 01:08 IST

भोकरदन : मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर असलेल्या पदमावती मध्यम प्रकल्पातील पाणी चोरी कोणी थांबवायची यांचा ताळमेळ लागत नसल्यामुळे

भोकरदन : मराठवाडा व विदर्भाच्या सिमेवर असलेल्या पदमावती मध्यम प्रकल्पातील पाणी चोरी कोणी थांबवायची यांचा ताळमेळ लागत नसल्यामुळे मध्यम प्रकल्प कोरडा पडण्याच्या मार्गावर आला आहे. धरण कोरडे झाल्यावर वालसांवगी, पारध बु, पारध खुर्द, वाढोणा या भोकरदन तालुक्यातील गावासह बुलडाणा व चिखली तालुक्यातील मासरूळ, धामणगाव, तराडेखड, देऊळघाट, सोयगाव, गुम्मी या गावावर भीषण पाणीटंचाईचे संकट उभे राहण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने वालसांवगी, पारध बु, व वाढोण्याचे सरपंच तीव्र अंदोलनाच्या पवित्र्यात आहेत़तालुक्यातील पदमावती व चिखली तालुक्यातील मासरूळ या दोन्ही गावाच्या सिमेवर हा मध्यम प्रकल्प झालेला असून, लघु पाटंबधारे विभाग चिखली अर्तगत या प्रकल्पाचे काम करण्यात आलेले असल्यामुळे विदर्भाच्या अर्तगत येतो. मात्र या प्रकल्पासाठी भोकरदन तालुक्यातील शेतकऱ्याच्या जमिनी मोठ्या प्रमाणात गेलेल्या आहेत. शिवाय पदमावती या गावाचे पुनर्वसन सुध्दा करावे लागले होते. या प्रकल्पावरून भोकरदन तालुक्यातील पारध खुर्द, पारध बु, वालसांवगी, वाढोणा, पदमावती या गावासाठी पाणी पुरवठा योजनाचे काम करण्यात आलेले असून, त्या द्वारे गावातील नागरिकांना पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र या वर्षी धरणामध्ये ८० टक्के पाणी साठा असताना सुध्दा एप्रिलच्या १९ तारखेलाच मृतसाठ्याएवढेच पाणी या राहिल्याने या धरणातील आणखी पंधरा दिवस पाणी चोरी सुरूच राहिली, तर धरण कोरडे पडणार आहे. मात्र, त्यानंतर या धरणावरून पाणी पुरवठा असलेल्या गावात तीव्र पाणी टंचाई निर्माण होणार आहे़ या धरणातून पाणी चोरी करणारे शेतकरी सुध्दा याच गावातील आहेत. मात्र त्याना पाणीचोरी करण्यापासून कोणी रोखावे असा प्रश्न उपस्थित होत आहे. आजही ७० ते ८० विद्युत पंपाद्वारे पाणी चोरी सुरू आहे़या धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्यासाठी १० जानेवारी रोजी चिखली येथील लघु पांटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अंभियत्याने या परिसरातील विज पुरवठा बंद करण्या संदर्भात उपअभियंता विजवितरणला पत्र दिलेले आहे. त्यानंतर ३ फेबु्रवारी रोजी भोकरदनच्या तहसिलदारांनी सुध्दा वीजपुरवठा खंडीत करण्यासाठी पत्र दिले आहे.त्यानंतर महावितरणच्या वतीने एल टी लाईनचा पुरवठा बंद केला होता. मात्र या परिसरातील रोहित्राचा पुरवठा सुरूच ठेवल्याने पाणी चोरी सर्रास सुरू आहे. या भागातील विजपुरवठा खंडीत करण्यासाठी सर्व विभागाने एकत्र येऊन कार्यवाही करण्याची गरज असल्याने अधिकाऱ्यानी सुध्दा याकडे दुर्लक्ष केल्यामुळे धरण कोरडे पडण्याच्या मार्गावर आहे़ (वार्ताहर)