शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
2
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
3
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
4
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
5
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
6
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
7
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
8
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
9
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
10
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
11
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
12
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
13
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
14
Share Market: US Fed च्या निर्णयानंतर देशांतर्गत शेअर बाजारात मोठी तेजी, सेन्सेक्स ३०० अंकांनी वधारला; 'या' शेअर्समध्ये तेजी
15
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
16
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
17
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
18
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
19
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
20
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर

पांदण रस्त्याने टाकली कात

By admin | Updated: July 13, 2014 00:19 IST

भारज: जाफराबाद तालुक्यातील भारज गावात पाणंदमुक्ती अभियान राबविण्यात आल्याने लोकसहभागातून रस्त्यांनी कात टाकली आहे.

भारज: जाफराबाद तालुक्यातील भारज गावात पाणंदमुक्ती अभियान राबविण्यात आल्याने लोकसहभागातून रस्त्यांनी कात टाकली आहे. शेतात जाणारे रस्ते आता गुळगुळीत झाल्याने शेतकरी समाधान व्यक्त करीत आहेत. शेतात जाण्यासाठी नेहमीच रस्त्यांचा प्रश्न उभा राहत होता. जो रस्ता आहे. तो झाडा-झुडपांनी व्यापलेला, रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ता? असा प्रश्न नेहमीच पडायचा. पावसाळ्यात तर या रस्त्यावरून पायी चालणेही कठीण होत असे. त्यातच शासनाच्या पाणंदमुक्ती अभियानाला लोकसहभागाची साथ मिळाल्याने पाणंद रस्ते कात टाकत आहेत. भारज परिसरातील आडा ते भातोडी या पाणंद रस्त्याचे काम यातूनच करण्यात आल्याने तो रस्ता आता गुळगुळीत झाला आहे. त्यामुळे भारज आडा, व भातोडी या तिन्ही गावांतील अनेक शेतकऱ्यांचा शेतात जाण्याच्या रस्त्याचा प्रश्न सुटला आहे. आता शेतातील माल थेट बाजारपेठेपर्यंत नेण्यासाठी वाहने शेतात येतील. त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली मेहनत वाया जाणार नाही. तसेच त्यांचा खर्चही वाचणार असल्याने शेतकरी आनंदी आहे. तीर्थपुरीतही रस्तातीर्थपुरी येथील शेतकऱ्यांनी तीर्थपुरी ते जोगलादेवी हा रस्ता लोकवर्गणीतून तयार केला असल्याने त्या भागातील शेतकऱ्यांचा शेतीला जाण्यासाठीचा प्रश्न निकाली निघाला आहे. तीर्थपुरी येथील जि. प. शाळेच्या जवळून जुना जोगलादेवी रस्ता असून या रस्त्याने पावसाळ्यात शेतात जाण्यासाठी चिखलाचा त्रास सहन करावा लागत होता.शेतकऱ्यांनी १ लाख ५ हजार रुपये लोकवर्गणी करुन दीड कि.मी. अंतराचा रस्ता तयार केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह जनावरांचा मार्ग मोकळा झाला.लोकवर्गणी जमा करणे तसेच शेतकऱ्यांची मानसिकता बदलण्यासाठी गावातील बालासाहेब केसकर, गणेश बोबडे, शिवाजी मुक्ताराम बोबडे, महादेव चिमणे, संजय बोबडे, मुकेश वैद्य यांनी परिश्रम घेतले. आता मात्र इतरांनी हा आदर्श घ्यावा.अनेक शेतकऱ्यांना लाभ जाफराबाद तालुक्यातील भारज परिसरातील अनेक मुख्य रस्त्यांची मोठी दुरवस्था झालेली आहे. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने नेहमीच दुर्लक्ष कलेले आहे. या रस्त्यांचा प्रश्न कायम असताना ग्रामस्थांनी पाणंदमुक्ती अभियानाच्या माध्यमातून आडा, भारज ते भातोडी पांदण रस्त्याचे काम केले. त्यामुळे या तीन गावांतील ग्रामस्थांचा रस्त्याचा प्रश्न निकाली निघाला आहे.