शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

कर्ज न भरण्याची शपथ

By admin | Updated: June 28, 2017 00:29 IST

नांदेड: शासन निर्णयानुसार नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रूपये कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही़

लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड: शासन निर्णयानुसार नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रूपये कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही़ या निर्णयाने संतापलेल्या चालू बाकीदार शेतकऱ्यांनी नियमित कर्ज फेडणे हा गुन्हा आहे का, असा प्रश्न उपस्थित केला़ तसेच अर्धापूर तालुक्यातील शंभरांवर शेतकऱ्यांनी एकत्र येत यापुढे कर्ज न भरण्याची सामूहिक शपथ घेतली़ दरम्यान, तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले़ मराठवाड्यातील शेतकरी संपाची ठिणगी अर्धापूर तालुक्यातूनच पडली होती़ त्याचबरोबर नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक प्रमाणात अर्धापूर तालुक्यातील शेतकरी संपकाळात रस्त्यावर उतरले होते़ दरम्यान, कर्जमाफीवर चर्चा करण्यासाठी आणि आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी अर्धापूर येथील लंगडे कॉम्प्लेक्स येथे शेतकऱ्यांच्या वतीने मंगळवारी बैठक घेण्यात आली़ थकबाकीदार शेतकऱ्यांना सरसकट दीड लाख रुपये कर्जमाफी देण्याच्या निर्णयाबद्दल कुणाचेही दुमत नाही़, परंतु जे शेतकरी नियमितपणे कर्जाची परतफेड करून चालू बाकीदार आहेत, त्यांना प्रोत्साहन अनुदान देत कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवणे अन्यायकारक असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली़ चालू बाकीदार शेतकऱ्यांना थकित शेतकऱ्यांप्रमाणे कर्जमाफी मिळावी, यासाठी शासनाच्या विरोधात आंदोलन उभारण्याचा संकल्प करुन कर्ज न भरण्याची शपथ उपस्थित शेकडो शेतकऱ्यांनी घेतली.तसेच या अन्यायाविरोधात आंदोलन उभे करण्यासाठी शेतकऱ्यांनी पुन्हा रस्त्यावर येण्याची गरज असल्याचे स्वाभिमानी संभाजी ब्रिगेडचे गव्हाणे यांनी सांगितले़ यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष अ‍ॅड़ किशोर देशमुख, आम आदमी पार्टीचे तालुकाध्यक्ष बालाजी आबादार, युवक काँग्रेसचे सरचिटणीस दत्ता पाटील बंडाळे, माजी सरपंच उद्धवराव राजेगोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष चंद्रकांत पाटील टेकाळे, प्रहार संघटनेचे जिल्हाध्यक्ष उमाकांत तिडके, सरपंच शहानंद मुधळ, संजय कंकाळ, अ‍ॅड़ बालाजी कदम, उत्तमराव मुधळ, बालाजी मुधळ, केशव डाढाळे, सुदाम बंडाळे, नगरसेवक शिवराज जाधव, तुकाराम साखरे, बबनराव बंडाळे, डिगा बंडाळे, समद खान पठाण, बालाजी कदम, मारोती जाधव, दत्तराव क्षीरसागर, बालाजी कानोडे, नारायण मुधळ, बहिर्जी वानखेडे, ज्ञानेश राजेगोरे यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते़ त्यानंतर तहसीलदारांना निवेदन देण्यात आले़