शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिकूल परिस्थितीवर मात करून शेतकऱ्याचा मुलगा बनला तहसीलदार

By admin | Updated: April 15, 2016 01:46 IST

करंजखेड : अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील तरुणाने आपले शालेय शिक्षण एकशिक्षकी शाळेत पूर्ण केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्याने आपले शिक्षण

करंजखेड : अल्पभूधारक शेतकरी कुटुंबातील तरुणाने आपले शालेय शिक्षण एकशिक्षकी शाळेत पूर्ण केले. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्याने आपले शिक्षण पूर्ण करीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या तहसीलदार परीक्षेत घवघवीत यश मिळवले. कन्नड तालुक्यातील तलवाडी येथील रहिवासी असलेल्या या तरुणाने ग्रामीण भागातील तरुणांसमोर आदर्श निर्माण केला आहे. विक्रमसिंग राजपूत असे या यशवंताचे नाव आहे. १३ एप्रिल, वेळ दुपारची. तलवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्याचा गौरव करण्यात आला. अल्पभूधारक कुटुंबातील जन्मलेल्या विक्रमसिंगचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण गावातील एकशिक्षकी शाळेत झाले. पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण तलवाडीपासून जवळच असलेल्या करंजखेड येथील महाविद्यालयात झाले. त्यामुळे त्यास करंजखेड ते तलवाडी अशी रोज पायपीट करावी लागे. बारावीनंतर तो पुढील शिक्षणासाठी औरंगाबादेत दाखल झाला. खेड्यातून आलेली मुले शहरात आल्यास गोंधळून जातात. विक्रमसिंगला मात्र पदवीचे शिक्षण घेत असतानाच चांगले मित्र मिळाले. पदवीला असतानाच त्याने नोकरीच्या संधी शोधण्यास सुरुवात केली. तेव्हा त्यास लोकसेवा आयोगाच्या परीक्षा देऊन अधिकारी होता येत असल्याचे समजले आणि तो तेव्हापासून अभ्यासाला लागला. लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्या अभ्यासक्रमानुसार त्याने पुस्तकांची जमवाजमव केली. ध्येयाने झपाटलेल्या विक्रमने पहिल्याच प्रयत्नात लोकसेवा आयोगाची राज्यसेवा ही परीक्षा उत्तीर्ण केली. लोकसेवा आयोगाने नुकताच राज्यसेवा परीक्षेचा निकाल जाहीर केला. यात विक्रमसिंगची तहसीलदारपदी निवड केल्याचे आयोगाने घोषित केले. तलवाडी येथील अधिकारी होणारा विक्र मसिंग हा पहिलाच आहे. ही आनंदाची वार्ता गावकऱ्यांना कळताच त्यांनी प्रचंड जल्लोषात ढोल-ताशाच्या गजरात स्वागत केले. गावातील महिलांनी त्याचे औक्षण केले.