शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात १४ लाखांवर वाहने; प्रदूषण चाचणी केवळ ६० टक्के वाहनांचीच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:02 IST

संतोष हिरेमठ औरंगाबाद : वाहनांच्या धुरापासून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी वाहनांना प्रदूषण नियंत्रणात असल्याचे प्रमाणपत्र (पीयूसी) घेणे बंधनकारक केले आहे. ...

संतोष हिरेमठ

औरंगाबाद : वाहनांच्या धुरापासून होणारे प्रदूषण टाळण्यासाठी वाहनांना प्रदूषण नियंत्रणात असल्याचे प्रमाणपत्र (पीयूसी) घेणे बंधनकारक केले आहे. जिल्ह्यात मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष केले जाते. जिल्ह्यातील १४ लाख वाहनांत सुमारे ६० टक्के वाहनांकडे पीयूसी आहे. मात्र, ४० टक्के म्हणजे ६ लाख वाहने विनापीयूसी धावत असल्याचा अंदाज आहे. यात दुचाकी वाहनांची सर्वाधिक संख्या आहे. रस्त्यांवरून धूर ओकणारी वाहने बिनधास्त धावत आहे. तरीही कोणी त्यांना हटकत नाही.

जिल्ह्यातील दुचाकी, चारचाकी, बस, अवजड वाहने आदींची संख्या १४ लाखांवर आहे. यात सर्वाधिक संख्या दुचाकींची म्हणजे तब्बल ११ लाख ७६ हजार आहे. चारचाकींसह व्यावसायिक वाहनधारकांकडून नियमितपणे पीयूसी काढण्यावर भर दिला जातो. मात्र, एकदा दुचाकी घेतली की संपले, अशी स्थिती पहायला मिळते. आरटीओ कार्यालयाकडे काही काम निघाल्यासच केवळ पीयूसीची कागदोपत्री पूर्तता करण्याचा सोपस्कर केला जातो. पीयूसी नसलेली किती वाहने धावत आहे याची माहिती मिळेल, अशी यंत्रणा नाही. परंतु ४० टक्के वाहने विनापीयूसी असल्याचे आरटीओ अधिकाऱ्यांनी सांगितले.

जिल्ह्यातील एकूण वाहने - १४,९४,९१५

जिल्ह्यातील पीयूसी सेंटर-६६

असे आहेत वाहने तपासणीचे दर (रुपये)

चारचाकी (पेट्रोल)-९०

चारचाकी (डिझेल)-११०

ट्रक-११०

बस-११०

रिक्षा (बीएस-३)-७०

रिक्षा (बीएस-४)-९०

दुचाकी-३५

कुठल्या वाहनाला किती दंड (रुपये)

दुचाकी- १ हजार

चारचाकी-१ हजार

अवजड वाहन-१ हजार

सर्व प्रकारची वाहने-१ हजार रुपये

पीयूसी केली नाही म्हणून केवळ ९८५ वाहनांना दंड

जिल्ह्यात जानेवारी ते नोव्हेंबर या ११ महिन्यांच्या कालावधीत पीयूसी नसल्यामुळे केवळ ९८५ वाहनांवर आरटीओ कार्यालयातर्फे कारवाई करण्यात आली आहे. कोरोनामुळे मार्चपासून लॉकडाऊन होता. त्यामुळे वाहतूक ठप्प होती. त्यामुळे यंदा कारवाईचे प्रमाण कमी आहे. आरटीओ कार्यालयाकडे मनुष्यबळही अपुरे आहे. त्याचाही कारवाईवर परिणाम होतो.

पर्यावरण आणि स्वत:साठी

वाहनांचा पीयूसी काढावा

आरटीओ कार्यालयातर्फे पीयूसी नसलेल्या वाहनांवर नियमितपणे कारवाई केली जाते. पीयूसी नसल्यास एक हजार रुपये दंड होतो. तुलनेत काही रकमेत पीयूसी काढून मिळते. केवळ दंड वाचविण्यासाठी नव्हे तर पर्यावरणासाठी आणि स्वत:च्या आरोग्यासाठी प्रत्येक वाहनचालकांनी पीयूसी काढला पाहिजे.

- संजय मेत्रेवार, प्रादेशिक परिवहन अधिकारी