शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

आमची स्वतंत्र ‘आयडेंटिटी’

By admin | Updated: June 22, 2014 00:48 IST

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कुणाचाही चेहरा पुढे करून मते मागणार नाही. गेल्या साठ वर्षांत आम्ही कधीही चेहरा दिला नाही व पुढेही देणार नाही.

औरंगाबाद : विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस कुणाचाही चेहरा पुढे करून मते मागणार नाही. गेल्या साठ वर्षांत आम्ही कधीही चेहरा दिला नाही व पुढेही देणार नाही. कुणाचे अनुकरण करण्याचा प्रश्नच येत नाही. आमचे स्वतंत्र अस्तित्व व ओळख आहे, असे रोखठोक मत राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या नेत्या व खा. सुप्रिया सुळे यांनी शनिवारी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवकांसाठी आयोजित सोशल मीडिया कार्यशाळेला मार्गदर्शन करण्यासाठी खा. सुळे शहरात आल्या होत्या. कार्यशाळेनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्या म्हणाल्या, देशाला उत्तरदायी नेता हवा होता. तो मतदारांनी शोधला. परंतु आम्ही विधानसभा निवडणुकीसाठी असा कोणताही चेहरा पुढे करणार नाही. शरद पवार यांनी त्यांचे राजकारण नेहमी चांगला सामाजिक बदल, गुणात्मक विकास कामे व सुशासन या त्रिसूत्रीनुसार केले आहे. यापुढेही याच मार्गाने आम्ही जाणार आहोत. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना थेट उत्तरे देण्याचे टाळत अत्यंत सावध व मोजकेच वक्तव्य त्या करीत होत्या. त्यामुळे अनेक प्रश्नांची उत्तरे त्यांनी पक्षश्रेष्ठींकडे अंगुलीनिर्देश करून देण्याचे टाळलेच. आघाडीत नव्या मित्रांची गरज आहे काय, रेल्वे दरवाढ अटळ होती काय, आघाडीचे जागा वाटपाचे सूत्र काय राहील आदी अनेक प्रश्नांवर त्या स्पष्ट बोलल्या नाहीत. यावेळी उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, नीलेश राऊत, एकनाथ गवळी, संदेश कांबळे आदींची उपस्थिती होती. हिना गावित सुसंस्कृत मुलगीराष्ट्रवादी युवती काँग्रेसचा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला फायदा झाला काय, असे विचारता खा. सुळे म्हणाल्या, महिला बचत गट व राष्ट्रवादी युवती काँग्रेसकडे राजकारणाच्या दृष्टीने पाहत नाहीत. त्यामुळेच हिना गावितांनी पक्ष सोडला काय असे विचारता, त्या म्हणाल्या नंदुरबार मतदारसंघ काँग्रेसकडे आहे, त्यामुळे हिनाला तेथून संधी देणे शक्य नव्हते. हिना गावित ही सुसंस्कृत मुलगी आहे. तिला माझ्या कायम शुभेच्छा राहतील. महिला मुख्यमंत्र्यांनी महिलांचे किती प्रश्न सोडविलेमहाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून तुमच्या नावाची चर्चा सध्या सुरू आहे, असे विचारता त्या म्हणाल्या, मी दिल्लीत रमले आहे व मला तेथेच राहायचे आहे. अनेक राज्यांत महिला मुख्यमंत्री आहेत. त्यांनी महिलांचे किती प्रश्न सोडविले हा संशोधनाचा विषय आहे.