शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
2
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
3
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
4
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
5
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
6
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
7
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
8
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
9
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार
10
"ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून नृसिंह अवताराप्रमाणे नवा अवतार समोर येऊन राक्षसरूपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास  
11
“भाजपा महायुती सरकारने १०० दिवसांत आका, खोके शब्द दिले, जनतेची फसवणूक केली”; कुणी केली टीका?
12
पुण्यात आयशरची स्कूटीला धडक, महिलेला फरफटत नेल्याने मृत्यू; वेळेत रुग्णवाहिका न आल्याने लोकांचा संताप
13
जम्मू-काश्मीरच्या रामबन जिल्ह्यात भीषण अपघात; सैन्याचे वाहन दरीत कोसळले, 3 जवान शहीद
14
“मला आता या देशाची भीती वाटते, युट्यूब चॅनल बंद करण्याला बदला घेणे म्हणतात का?”: संजय राऊत
15
सीरिजच्या शूटिंगवेळीच झालं वडिलांचं निधन; मराठी अभिनेत्री म्हणाली, "वडिलांनी येऊ नको असं..."
16
“लाडकी बहीण योजना बंद झाली, १५०० वरून ५००वर आले, २१०० देणार म्हणाले होते”: संजय राऊत
17
पैशांसाठी युक्रेनला विकली शस्त्रे; आता भारतासमोर युद्धात इतके दिवसही टिकणार नाही पाकिस्तान
18
स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली; युद्धासाठी तयार आहोत; पाकच्या नौदल प्रमुखाचं विधान
19
"तू कधीच अभिनेता होऊ शकत नाहीस", नवऱ्यावर ओरडायची अर्चना पूरण सिंग, अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला...
20
"CRPF ने पाकिस्तानी महिलेशी लग्न करण्यासाठी परवानगी दिली होती"; बडतर्फ केल्यानंतर जवानाने सगळेच सांगितले

उस्मानाबादकरांची थांबली वणवण !

By admin | Updated: October 5, 2014 00:48 IST

उस्मानाबाद : शहरामध्ये २०१२-१३ मध्ये निर्माण झालेल्या भीषण टंचाईचे चित्र डोळ्यासमोर आल्यानंतर आजही अशी परिस्थिती पुन्हा कधीही ओढावू नये

उस्मानाबाद : शहरामध्ये २०१२-१३ मध्ये निर्माण झालेल्या भीषण टंचाईचे चित्र डोळ्यासमोर आल्यानंतर आजही अशी परिस्थिती पुन्हा कधीही ओढावू नये, असे वाटल्यावाचून राहत नाही. मात्र शहरामध्ये उजनी पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली आणि टंचाईचा काळोख दूर झाला. २० ते २५ दिवसाला मिळणारे पाणी आज चार दिवसाआड मिळू लागले आहे. हातलादेवीच्या पायथ्याशी नव्याने पंपहाऊस उभारण्यात येणार आहे. सदरील यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर उस्मानाबादकरांना दररोज मुबलक पाणी मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. सदरील यंत्रणा अवघ्या येत्या सहा महिन्यात कार्यान्वित होईल, असे नगराध्यक्ष सुनील काकडे यांनी सांगितले.उस्मानाबाद शहरामध्ये २०१२-१३ यावर्षातील उन्हाळ्यामध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली होती. शहराच्या आजूबाजूचे प्रकल्प कोरडेठाक पडले होते. पालिकेच्या कुपनलिकांनीही दम तोडला होता. त्यामुळे शहरामध्ये पाण्याचे संकट अधिकच गंभीर बनले होते. शहरामध्ये तब्बल २० ते २२ दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होत होता. तोही अत्यल्प. खाजगी टँकरचे दरही गगनाला भिडले होते. ५०० लिटर पाण्यासाठी १०० ते १५० रुपये मोजावे लागत होते. येथेही वेटींग असे. ही समस्या लक्षात घेवून नगर परिषदेने उजनी पाणी पुरवठा योजनेला गती देण्यासाठी तातडीने प्रयत्न करुन शासनाकडे निधीची मागणी केली होती. तत्कालीन आघाडी शासनाने सढळ हाताने निधी दिला. आणि योजनेचे कामही युद्धपातळीवर पूर्ण केले. त्यामुळे शहराची भीषण पाणी टंचाईच्या जोखडातून मुक्तता झाली. आजघडीला उस्मानाबादच्या जवळपास सर्वच भागात चार दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. उजनी धरणातून प्रत्येक दिवशी ४० ते ५० लाख लिटर पाणी उचलले जात आहे.दरम्यान, शहराला दररोज पाणी पुरवठा व्हावा यासाठी पालिकेकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरु आहेत. हातलादेवीच्या पायथ्याशी कायमस्वरुपी संपहाऊस उभारण्यात येणार आहे. याठिकाणी पंपाची संख्या वाढविण्यात येणार आहे. त्यामुळे या योजनेद्वारे पूर्ण क्षमतेने म्हणजेच ८ टीएमसी पाणी उचलता येणार आहे. त्यानंतर शहराला दररोज पाणीपुरवठा करता येईल, असे सांगण्यात येते. नगर परिषदेकडून संपहाऊस बांधकामासाठीची निविदा मागील काही दिवसापूर्वी काढण्यात आली असून, हे काम येत्या सहा महिन्यामध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. एकंदरीतच उजनी पाणीपुरवठा योजनेचे काम युद्ध पातळीवर झाल्यामुळे आज उस्मानाबाद शहर १९ एप्रिल २०१३ रोजी टँकरमुक्त झाले. तेव्हापासून ते आजतागायत पालिका प्रशासनावर टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आलेली नाही. यामुळे कोट्यवधीचा खर्चही वाचला असल्याचे नगराध्यक्ष सुनील काकडे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)