शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

‘ते’ ठराव कायम करण्याचे आदेश

By admin | Updated: March 31, 2015 00:36 IST

उस्मानाबाद : निवडणुका न झालेल्या सोसायट्यांचे अपात्र ठरविलेले ‘ते’ ठराव कायम करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत़ तीन याचिकाकर्त्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे़

उस्मानाबाद : निवडणुका न झालेल्या सोसायट्यांचे अपात्र ठरविलेले ‘ते’ ठराव कायम करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले आहेत़ तीन याचिकाकर्त्यांना त्यामुळे दिलासा मिळाला आहे़ जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी मतदार यादी प्रसिध्द करण्याच्या प्रक्रियेवेळी बीड येथील एका याचिकेच्या सुनावणीदरम्यान न्यायालयाने ज्या सोसायट्यांची निवडणूक वेळेत झालेली नाही, त्या सोसायट्या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेण्यासाठी सक्षम नसल्याचे सांगत, असे ठराव अपात्र करण्याच्या सूचना दिलेल्या होत्या़ यावरून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील अशा २१५ ठरावांना अपात्र ठरविले होते़ त्यानंतर अपात्र ठरलेले बसवराज सरणे, लक्ष्मण मुनाळे, काकासाहेब पाटील आदींनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती़ त्यावेळी याबाबत सोसायट्यांना पूर्वसूचना दिलेली नव्हती, गतवर्षी दुष्काळी स्थितीमुळेच शासनाने निवडणुकीला मुदतवाढ दिली होती़ निवडणूक घेण्याचे काम प्रशासनाचे असल्याने सोसायट्यांची यामध्ये काही चूक नाही, आदी विविध कारणे देत बाजू मांडली होती़ याचिकाकर्त्यांची बाजू ऐकूण घेत वकिलांनी केलेला युक्तीवाद ऐकूण न्यायालयाने याचिकाकर्त्यांचे ठराव कायम करण्याचे आदेश दिल्याचे वृत्त आहे़ त्यामुळे या तिघांना दिलासा मिळाला आहे़