औरंगाबाद : प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) परिसर दलालमुक्त करण्याचे आदेश परिवहन आयुक्तांनी आरटीओ कार्यालयांना दिले आहेत. परंतु सोमवारी अनेक दलाल मंडळी बिनधास्त कामे करताना दिसून आली. त्यामुळे आरटीओ कार्यालय परिवहन आयुक्तांच्या आदेशाला केराची टोपली दाखवीत आहे.कार्यालयात अनधिकृत व्यक्ती येऊन वाहन मालकांच्या वतीने वाहनांची नोंदणी, हस्तांतर नोंद, नाहरकत प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्रांचे नूतनीकरण, लर्निंग, पर्मनंट लायसन्स काढणे, अशी कामे करून घेत आहेत. १आरटीओ कार्यालयातील दरवाजा बंद ठेवण्यात येत असल्याने दलालांना आतमध्ये येता येत नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु कार्यालयाच्या परिसरात खुर्च्या टाकून, रिक्षा, चारचाकी वाहनांमध्ये बसून दलाल मंडळी कामे करीत आहेत. अशांना कोण हटविणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.२आरटीओ कार्यालयातील कामकाजाविषयी सहज कल्पना येत नसल्याने सोमवारी अनेक वाहनधारकांची गैरसोय होत असल्याचे चित्र दिसून आले. विविध कामे स्वत:च पूर्ण करण्यासाठी त्याची सहज माहिती मिळण्याची गरज आहे. परंतु आरटीओ कार्यालयात याची कोणतीही सुविधा नसल्याने वाहनधारकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे.दलाल बनणार प्रतिनिधीगेल्या अनेक वर्षांपासून वाहन मालकांचे प्रतिनिधी म्हणून अनेक जण काम करीत आहेत. परिवहन आयुक्तांच्या आदेशानंतर आता दलाल मंडळीही वाहन मालकांचे प्रतिनिधी (अधिकारपत्रधारक) म्हणून कामे करणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.
‘त्या’ आदेशाला केराची टोपली
By admin | Updated: January 20, 2015 01:28 IST