शहरं
Join us  
Trending Stories
1
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
4
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
5
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
6
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
7
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
8
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
9
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
10
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
11
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
12
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
13
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
14
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
15
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
16
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
17
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
18
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
19
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
20
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!

ऐच्छिक रक्तदान पंधरवड्यास प्रारंभ

By admin | Updated: October 2, 2014 00:50 IST

औरंगाबाद : रक्ताला पर्याय देण्यास संशोधनकर्त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे घात, अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने रक्त देऊन त्याचे प्राण वाचविता येते.

औरंगाबाद : वैद्यकीय क्षेत्राने एवढी प्रगती केली तरी अद्याप मानवी रक्ताला पर्याय देण्यास संशोधनकर्त्यांना यश मिळाले नाही. त्यामुळे घात, अपघातात गंभीर जखमी झालेल्या रुग्णांना तातडीने रक्त देऊन त्याचे प्राण वाचविता येते. थॅलेसेमिया, सिकलसेल आजाराच्या रुग्णांना नियमित रक्त दिले तरच ते जिवंत राहू शकतात. याबाबत विविध पातळीवर जागृती होत असतानाही रक्तदान करण्यासाठी नागरिक पुढे येत नाहीत. परिणामी दरवर्षी उन्हाळ्यात रक्ताच्या तुटवड्याचा सामना करावा लागतो. १ आॅक्टोबरपासून सुरू झालेला ऐच्छिक रक्तदान पंधरवडा १५ आॅक्टोबरपर्यंत चालेल. त्यानिमित्ताने शासकीय रक्तपेढीच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवारी रक्तदान जनजागृती रॅली केली होती. ही रॅली सकाळी ९ वाजता शहागंज येथील गांधी पुतळ्यापासून निघून औरंगपुरा येथे विसर्जित झाली. २ ते ६ आॅक्टोबर या कालावधीत रोज विविध ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. ८ आॅक्टोबर रोजी घाटीतील बाह्यरुग्ण विभागामध्ये पोस्टर प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन अधिष्ठातांच्या हस्ते होईल. शिवाय रांगोळी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ९ रोजी खांडेवाडी येथील बडवे इंजिनिअरिंग कंपनीत रक्तदान शिबीर होईल. १० आॅक्टोबर रोजी विद्यापीठातील समाजकार्य महाविद्यालयात रक्तदान शिबीर, १२ रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याशिवाय घाटीतील रक्तपेढीचे प्रमुख आणि अन्य डॉक्टर मंडळी रक्तदान सर्व श्रेष्ठदान या विषयावर विविध महाविद्यालयांत जाऊन व्याख्यान देणार आहे.