जालना : परतूर तालुक्यातील निम्न दुधना प्रकल्पातून दररोज लाखो लिटर पाणी काही मंडळी लातूर येथे नेण्याचे नियोजन करत आहे. परतूर व मंठा तालुक्याचे हक्काचे पाणी इतर ठिकाणी देण्यास आपला विरोध राहणार असल्याची माहिती माजी आ. सुरेशकुमार जेथलिया यांनी रविवारी पत्रकारांना दिली. जेथलिया म्हणाले, राज्य शासन पाण्यावर तोडगा काढण्याऐवजी सातारा लुटायचे आणि पुण्याला दान करायचे या जुन्या म्हणीनुसार एकावर एक अन्याय करत दुसऱ्यावर मेहरबान होत असल्यााचा आरोप केला. निम्न दुधना प्रकल्प पूर्ण करण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडी सरकारचे मोठे योगदान आहे. या प्रकल्पात मृत साठा जरी शिल्लक आहे. चार वर्षांचा अनुमान पाहता भविष्यात पाऊस कमी आला तर हाच साठा परतूर- मंठेकरांना जीवदान ठरणार आहे. परतूरप्रमाणेच मंठा शहराची कायमस्वरूपी पाणीपुरवठा योजना पूर्ण झाल्यानंतर दोन्ही शहरातील नागरिकांचे भवितव्य या प्रकल्पावरच अलवंबून आहे. निम्न दुधना प्रकल्पातून दररोज लाखो लिटर पाण्याचा उपसा झाल्यास परतूरचे लवकरच लातूर होण्यास वेळ लागणार नाही असेही जेथलिया यांनी सांगितले. कठीण परिस्थतीत परतूर शहराची पाणीपुरवठा योजना दोन वर्षांच्या काळात पूर्ण केली आहे. काही काम बाकी आहे. पावसाळ्यापूर्वी उर्वरित काम पूर्ण होणे गरजेचे आहे. परंतु या योजनेमध्ये तथ्यहीन तक्रारी व बिनबुडाच्या आरोपांमुळे ही योजना चौकशीच्या फेऱ्यात अडकली आहे. अशा परिस्थितीत लातूरला निम्न दुधनाचे पाणी देणे आयोग्य आहे. याबाबत लवकरच महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे माजी आ. जेथलिया यांनी सांगितले. शासनाने भूमिका न बदलल्यास शेतकरी व जनतेला सोबत घेऊन रस्त्यावर उतरू असाही इशाराही माजी आ. जेथलिया यांनी यावेळी दिला. शहरातील नागरिकांचे भवितव्य या प्रकल्पावरच अलवंबून आहे. निम्न दुधनातून दररोज लाखो लिटर पाण्याचा उपसा झाल्यास परतूरचे लवकरच लातूर होण्यास वेळ लागणार नाही, असेही त्यांनी सांगितले. पाऊस पडल्यास भविष्यात हा प्रकल्प मंठा व परतूर तालुक्यासाठी वरदान ठरणार आहे.
निम्न दुधना प्रकल्पाचे पाणी लातूरला देण्यासाठी विरोधच..!
By admin | Updated: April 25, 2016 00:10 IST