शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

‘ओपिनियन मेकर’ उमेदवारांची वानवा!

By admin | Updated: November 4, 2016 00:25 IST

जालना अभ्यासू आणि शहराच्या विकासाची जाण असलेल्या उमेदवारांची सद्यस्थितीत सर्वच पक्षांत वानवा असल्याचे चित्र त्या त्या पक्षांच्या उमेदवारांच्या यादीवरुन दिसून येते.

राजेश भिसे जालनानगर परिषद हा गत काही वर्षांपासून आखाडा बनला असून, अभ्यासू आणि शहराच्या विकासाची जाण असलेल्या उमेदवारांची सद्यस्थितीत सर्वच पक्षांत वानवा असल्याचे चित्र त्या त्या पक्षांच्या उमेदवारांच्या यादीवरुन दिसून येते. एकूणच ‘मसल आणि मनी पॉवर’ असलेला उमेदवार निवड प्रक्रियेत अधिक प्रभावी ठरल्याचे दिसून येत आहे.जालना नगर परिषद अ दर्जाची पालिका. मात्र, गत काही वर्षांत जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या या नगर परिषदेत अभ्यासू नेतृत्व आणि नगरसेवकांची संख्या कमी होत गेली. मुद्दयाची भाषा गुद्दयावर गेल्याचे पालिकेच्या अनेक सभांवरुन स्पष्ट होते. अशा प्रकारांमुळे अभ्यासू आणि प्रभावी नेतृत्व असलेल्या व्यक्तींनी पालिकेत नगरसेवकाच्या रुपाने जाणे टाळले. त्यामुळे नगर परिषद हा आखाडाच बनल्याचे चित्र गत काही दिवसांत दिसून आले आहे. अर्थकारणातून सत्ताकारण आणि सत्ताकारणातून अर्थकारण हेच सूत्र गत काही वर्षांत राजकारणात रुढ झाले आहे. त्यामुळे कोणतीही निवडणूक लढविणे हे आर्थिकदृष्ट्या सोपे राहिलेले नाही. परिणामी डॉक्टर्स, इंजिनिअर्स, वकील यासारख्या सामाजिक प्रतिष्ठा लाभलेल्या व्यक्तींनी निवडणूक न लढविणेच पसंत केले आहे. जनाधार नसलेले पण ‘मनी आणि मसल पॉवर’ असलेल्या व्यक्तींचा पालिकेत शिरकाव झाला. खिलाडूवृत्तीने कोणत्याही विषयावर सर्वंकष चर्चा झाल्याचे पालिका सभांत अनेक दिवसांपासून दिसून आले नाही. वैचारिक मतभेद असावेत मात्र विकास आणि जनहिताच्या मुद्द्यांवर सत्ताधारी आणि विरोधक एकत्र आले तर शहराचा सर्वांगीन होण्यास मदतच होते. पण अशी स्थिती अपवादात्मक परिस्थिती वगळता जालनेकरांना कधी अनुभवास आली नाही. किती नगरसेवकांना पालिका प्रशासनाचे नियम माहित आहेत. पाच वर्षांत किती नगरसेवकांनी चर्चेत सहभाग नोंदवला वा विकासाच्या मुद्द्यावर आपले परखड मत व्यक्त केले. हा संशोधनाचा विषय होऊ शकतो. एकूणच नगर परिषदेच्या निवडणुकीत सर्वच राजकीय पक्षांकडे अभ्यासू उमेदवारांची वानवा असल्याचे चित्र आहे. विविध विषयांचा अभ्यास असलेले उमेदवार सध्या तरी रिंगणात नसल्याने आगामी काळात पालिकेचा ‘आखाडा’ कोणत्या मुद्द्यांवर गाजणार हे काळच ठरवेल.