शहरं
Join us  
Trending Stories
1
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
2
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
3
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
4
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
5
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
6
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
7
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व
8
एक कोटी ८४ लाखांचे प्रकरण दाबवण्यासाठी गृह खात्याचे गुप्त आदेश; अनिल गोटेंचा आरोप
9
सिंधमध्ये पाकिस्तान सरकारला विरोध तीव्र, बेनझीर भुत्तोंच्या लेकीच्या ताफ्याला घेराव, लाठ्या काठ्यांनी हल्ला   
10
IND vs ENG : इंग्लंड दौऱ्यासाठी कठोर मेहनत; १० किलो वजनही कमी केलं! पण... सरफराजला ते प्रकरण भोवलं?
11
धक्कादायक! ४० हजारांसाठी देशाशी गद्दारी; गुजरातच्या कच्छमधून पाकिस्तानी गुप्तहेराला अटक
12
फायद्याची गोष्ट! रिकाम्या औषधांच्या रॅपरचा मोठा उपयोग; गृहिणी करतात किचनमध्ये क्रिएटिव्ह वापर
13
इंटरनेटची सुविधा नाही, फोनही लागत नाही; भुयारी मेट्रोचा प्रवास ठरतोय त्रासदायक!
14
Varlin Panwar : वडील आर्मी ऑफिसर, लेकही होती IAF स्क्वाड्रन लीडर; आता प्रसिद्ध बॉलिवूड स्टार्सना देतेय ट्रेनिंग
15
वडिलांची झाली हत्या, मारेकऱ्यांना शिक्षा देण्यासाठी 'तो' झाला IPS; फी भरण्यासाठी विकलं धान्य
16
IND vs ENG : तो चांगला खेळतोय; पण...श्रेयस अय्यर कसोटी संघात का नाही? अजित आगरकर यांनी असं दिलं उत्तर
17
Rohit Pawar: समविचारी पक्ष सोबत आले तर ठिक, नाही तर...; रोहित पवार स्पष्टच बोलले
18
बिपाशाच का ही? अभिनेत्रीचा व्हिडिओ पाहून नेटकरी शॉक; एकेकाळची 'फिटनेस दिवा' आता...
19
Covid-19: चिंता वाढली! कळव्यात २१ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू
20
लग्नादरम्यान भर मंडपातून वराचं अपहरण, समोर आलं धक्कादायक कारण, कुटुंबीयांच्या तोंडचं पळालं पाणी  

राजकीय पक्षांकडून फक्त शोषण

By admin | Updated: April 20, 2016 00:22 IST

औरंगाबाद : समाजात वावरणाऱ्या अत्यंत गोरगरीब नागरिकांचे अक्षरश: शोषण राजकीय पक्षांकडून सुरू आहे. आपली वोट बँक मजबूत करण्यासाठी काहीजण अत्यंत खालच्या पातळीवरही जात आहेत.

औरंगाबाद : समाजात वावरणाऱ्या अत्यंत गोरगरीब नागरिकांचे अक्षरश: शोषण राजकीय पक्षांकडून सुरू आहे. आपली वोट बँक मजबूत करण्यासाठी काहीजण अत्यंत खालच्या पातळीवरही जात आहेत. स्वातंत्र्य मिळाल्यापासून आजपर्यंत देशातील मुस्लिम बांधवांना त्यांचा हक्क देण्यात आला नाही, असे मत मौलाना अहमद हसन कासमी यांनी व्यक्त केले.आॅल इंडिया इमाम कौन्सिलतर्फे नेहरू भवन येथे नुकतेच ‘इत्तेहाद मोहीम’या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना कासमी पुढे म्हणाले की, भारतीय संविधान बदलण्याचा विचार करणाऱ्यांपासून मुस्लिम समाजाला अधिक धोका आहे. आज देशातील मुस्लिमांविरुद्ध षड्यंत्र रचण्यात येत आहे. इस्लाम धर्म शांतीचा संदेश देतो. मानवतेला कोणत्या धर्मापासून धोका नाही, राजकीय मंडळींपासूनच मोठा धोका आहे. मुस्लिम बांधवांनी वेळीच हे मनसुबे ओळखून वागायला हवे. आपला कोणी राजकीय वापर तर करून घेत नाही, हे सुद्धा बघितले पाहिजे. मौलाना इलियास फलाही यांनी इस्लामची जीवन व्यवस्था यावर मार्गदर्शन केले. सचिव मौलाना अब्दुल रहेमान नदवी, मौलाना मोईज फारुकी, मौलाना शमसोद्दीन सैफी, मौलाना अब्दुल कवी फलाही, मौलाना अब्दुल कय्युम नदवी, मौलाना सादीक नदवी, मौलाना अब्दुल समी नदवी यांनीही कार्यक्रमात मार्गदर्शन केले.