शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

केवळ २५ हजार मालमत्तांची वाढ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 23:52 IST

: नगरपालिका क्षेत्रातील मालमत्तांवर नवीन कर आकारणी केले जाणारे वार्षिक फेरमूल्यांकनाचे काम शहरात खाजगी एजन्सीमार्फत सुरू आहे. एजन्सीकडून दीड वर्षांपासून सुरू असलेल्या सर्वेक्षणामध्ये दहा वर्षात केवळ २५ हजार मालमत्तांची वाढ झाल्याचे अधिकारी सांगत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कजालना : नगरपालिका क्षेत्रातील मालमत्तांवर नवीन कर आकारणी केले जाणारे वार्षिक फेरमूल्यांकनाचे काम शहरात खाजगी एजन्सीमार्फत सुरू आहे. एजन्सीकडून दीड वर्षांपासून सुरू असलेल्या सर्वेक्षणामध्ये दहा वर्षात केवळ २५ हजार मालमत्तांची वाढ झाल्याचे अधिकारी सांगत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.नगरपालिका क्षेत्रातील मालमत्तांवर नवीन कर आकारणीसाठी दर चार वर्षांनी केल्या जाणाºया वार्षिक फेर मूल्यांकनाचे काम शहरात २००७-०८ पासून झालेले नाही. पालिकेकडे सध्या नोंदणीकृत असलेल्या ४५ हजार मालमत्तांवर कर आकारला जातो. गत दहा वर्षात शहराच्या हद्द व बांधकामांचे प्रमाण वाढले तरी पालिकेकडील मालमत्तांचा आकडा ४५ हजारांवरच अडकला आहे. त्यामुळे नगपालिकने मालमत्तांच्या फेरमूल्यांकनाचे काम सध्या नागपूर येथील एका एजन्सीला दिले आहे.सर्वेक्षणासाठी जीआयएस मॅपींगच्या आधारे शहराचे वेगवेगळे झोन तयार करण्यात आले आहेत. एजन्सीच्या २६ कर्मचाºयांमार्फत शहरातील प्रत्येक झोनमधील मालमत्तांच्या प्रत्यक्ष मोजणीचे काम सुरू आहे. यामध्ये मालमत्तेच्या कॉरपेट व बिल्डिअ‍ॅप एरियाचे मोजमाप केले जात असून, छायाचित्रही घेतले जात आहे. शहरातील खुल्या जागांचे मोजपाही केले जात आहे. एका मालमत्तेच्या सर्वेक्षणासाठी एजन्सीला ४८५ रुपये देण्यात येणार आहेत. आतापर्यंत पालिकेने एजन्सीला ४० लाख रुपये दिल्याचे सूत्रांनी सांगितले. सदर एजन्सीने दीड वर्षात २५ हजार मालमत्तांचे मूल्यांकन केले असून, संगणकीय नोंद घेण्याचे काम प्रगतीपथावर आहे. दरम्यान, गत काही वर्षात शहरात अनेक नवीन बांधकाम झाली आहेत.तसेच जुन्या बांधकामांमध्ये अनेक फेरबदल करण्यात आले आहेत. त्यामुळे दहा वर्षानंतर होणाºया सर्वेक्षणात केवळ २५ हजार मालमत्ता आढळून आल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, सर्वेक्षण झालेल्या मालमत्तांच्या प्रारुप याद्या तयार करण्याचे काम सध्या सुरू आहे. याद्या तयार झाल्यानंतर नगररचना विभागाची परवानगी घेऊन त्यांच्यावर कर आकारला जाईल. जुन्या व नवीन मालमत्तांची संख्या सध्या ७० हजारांपर्यत आहे. यामध्ये काही प्रमाणात वाढ होईल, असे नवीन कर आकारणी विभागाचे नेल्सन कांबळे यांनी सांगितले.