शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! "मुंबईत १० हजार कोटींचं बजेट, प्रत्येक उमेदवाराला शिंदेसेना देणार १० कोटी"
2
माजी आमदार प्रज्ञा सातव यांचा भाजपमध्ये प्रवेश! काँग्रेसचं काय चुकतंय विचारताच, म्हणाल्या...
3
Donald Trump :"टॅरिफ माझा फेव्हरीट, मी 10 महिन्यांत...!" डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा
4
"विश्वविख्यात बोलले म्हणजे त्यांचे 29 महापालिकांत पराभव पक्के", भाजपाने संजय राऊतांना डिवचलं
5
Car 360 Degree Camera: कारमध्ये ३६० डिग्री कॅमेरा असणं किती फायद्याचं? नेमकं कसं आणि काय काम करतो?
6
Mumbai: खड्ड्यात दुचाकी आदळून तरुणाचा मृत्यू, पण पोलिसांनी मृतावरच नोंदवला गुन्हा!
7
"आम्ही काही मैत्रिणी नाही आहोत...", लारा दत्तासोबत काम केल्यावर रिंकू राजगुरुची प्रतिक्रिया
8
Supriya Sule: "धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात घेतले तर...", खासदार सुप्रिया सुळेंचा इशारा!
9
मोठी बातमी! प्रज्ञा सातव यांचा काँग्रेसच्या विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा
10
अर्टिगाचे काही खरे नाही...! ७-सीटर 'ग्रॅव्हाईट' लाँच होणार, ६ लाखांत मिळणार हाय-टेक फीचर्स...
11
निष्काळजीपणाचा कळस! 'A' पॉझिटिव्ह ऐवजी 'B+' रक्त अन्...; ७५ वर्षीय रुग्णाच्या जीवाशी खेळ
12
Ola Electric च्या शेअर्समध्ये मोठी घसरण! भाविश अग्रवाल यांनी हिस्सा विकून फेडलं कर्ज; पण गुंतवणूकदारांची चिंता वाढली
13
"हा माझा शेवटचा व्हिडीओ आहे, मला रशियाने बळजबरी युद्धात..."; भारतीय तरुणाचा मृत्यू, आईवडिलांवर आघात
14
तुम्हाला क्युट वाटणारा 'सांताक्लॉज' म्हणजे कोका-कोलाचा बिझनेस मास्टरस्ट्रोक! सत्य वाचून बसेल धक्का
15
Bike Taxi: मुंबईत बाईक टॅक्सी बंद होणार? रॅपिडो, ओला, उबेरवर कारवाईची टांगती तलवार!
16
"हा माझा शेवटचा Video, मला जबरदस्तीने..."; रशिया-युक्रेन युद्धात अजयचा मृत्यू; पालकांचा टाहो
17
Success Story: आठवीपर्यंत शिक्षण ते ८,००० कोटींचे मालक! जबलपूरच्या सतीश सनपाल यांचा 'बुर्ज खलिफा'पर्यंतचा थक्क करणारा प्रवास
18
भारताच्या 'या' मित्र राष्ट्रात मुस्लीमांची संख्या वेगाने वाढतेय; २०३० पर्यंत हा आकडा जवळपास...
19
२०२६ ची गोड सुरुवात! CNG आणि घरगुती गॅसच्या किमती कमी होणार, किती पैसे वाचणार?
20
मार्गशीर्ष अमावस्या २०२५: १९ डिसेंबरला तळहातावर काढा 'फुली', नशिबाची दारं होतील खुली!
Daily Top 2Weekly Top 5

११ महिन्यांत फक्त २१ विहिरींची कामे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:06 IST

अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेंंतर्गत जिल्ह्याला दोन वर्षांकरिता देण्यात आलेल्या ४ हजार ५०० विहिरींच्या उद्दिष्टापैकी केवळ २१ विहिरीेंचेच काम गेल्या ११ महिन्यांत पूर्ण झाले असून उर्वरित १३ महिन्यांत ४ हजार ४७९ विहिरींची कामे प्रशासनाला करावी लागणार आहेत. लाल फितीच्या कारभारामुळे या विहिरींची कामे करण्यास वेळ लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.

मारोती जुंबडे ।लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेंंतर्गत जिल्ह्याला दोन वर्षांकरिता देण्यात आलेल्या ४ हजार ५०० विहिरींच्या उद्दिष्टापैकी केवळ २१ विहिरीेंचेच काम गेल्या ११ महिन्यांत पूर्ण झाले असून उर्वरित १३ महिन्यांत ४ हजार ४७९ विहिरींची कामे प्रशासनाला करावी लागणार आहेत. लाल फितीच्या कारभारामुळे या विहिरींची कामे करण्यास वेळ लागत असल्याचे चित्र जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.जिल्ह्यात सतत तीन वर्षे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे शेतकºयांकडे सिंचनासाठी पर्यायी व्यवस्था उपलब्ध नव्हती. केंद्र शासनाच्या वतीने २००८ पासून रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकºयांना सिंचनाची व्यवस्था व्हावी, यासाठी विहिरींचे काम या योजनेअंतर्गत करण्यात येत होते. परंतु, या योजनेअंतर्गत अनेक कामे ठप्प पडली होती. त्यामुळे तीन वर्षे जिल्ह्यातील शेतकºयांना दुष्काळाचा सामना करावा लागला. हे राज्य शासनाच्या लक्षात आल्यानंतर यापुढे अशी परिस्थिती शेतकºयांवर पुन्हा उद्भवू नये, यासाठी १० आॅक्टोबर २०१६ पासून समृद्ध महाराष्ट्र जनकल्याण योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत अहिल्यादेवी सिंचन विहीर, अमृतकुंड शेततळे, भूसंजीवनी व्हर्मी कंपोस्टींग, भूसंजीवनी नाडेप कंपोस्टींग, कल्पवृक्ष फळबाग लागवड, निर्मल शौचालय, निर्मल शौच खड्डे, समृद्ध गाव तलाव, अंकुर रोपवाटिका, नंदन वृक्ष लागवड, समृद्ध ग्रामयोजना या ११ कलमी कार्यक्रमाचा या योजनेत समावेश केला. हा ११ कलमी कार्यक्रम प्राधान्याने राबविण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला देण्यात आले आहेत. या योजनेत जिल्ह्याला उद्दिष्टही देण्यात आले आहे.जिल्ह्याला अहिल्यादेवी सिंचन विहीर योजनेअंतर्गत २०१६ ते २०१८ या दोन वर्षांसाठी ४५०० सिंचन विहिरीचे उद्दिष्ट देण्यात आले. त्यानंतर जिल्हाभरात ग्रामसभेतून ४ हजार ३४ लाभार्थी निवडले गेले. परंतु, यापैकी केवळ ७११ सिंचन विहिरींना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. त्यापैकी केवळ १४० कामांना प्रत्यक्षात सुरुवात करण्यात आली. त्यानंतर ११ महिन्यात केवळ २१ विहिरींची कामे पूर्ण करण्यात आली आहेत. उर्वरित १३ महिन्यांत ४ हजार ४७९ विहिरींची कामे प्रशासनाला करावी लागणार आहेत. लाल फितीच्या कारभारामुळे प्रत्यक्ष शेतकºयांना या योजनेचा फायदा मिळेनासा झाला आहे.