शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
6
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
7
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
8
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
9
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
10
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
11
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
12
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
13
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
14
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
15
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
16
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
17
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
18
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
19
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
20
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ

वैजापूर तालुक्यात कांदा सडला

By admin | Updated: May 8, 2014 00:24 IST

गारज : वैजापूर तालुक्यातील गारज, बाभूळगाव, मनूर, भोकरगाव, पोखरी, भायगाव, पाथ्री आदी परिसरातील शेतकर्‍यांच्या मोठ्या प्रमाणावर कांद्याच्या चाळी सडत आहेत.

गारज : वैजापूर तालुक्यातील गारज, बाभूळगाव, मनूर, भोकरगाव, पोखरी, भायगाव, पाथ्री आदी परिसरातील शेतकर्‍यांच्या मोठ्या प्रमाणावर कांद्याच्या चाळी सडत आहेत. त्यामुळे ऐन शेतीच्या कामाच्या तोंडावर बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे. या अगोदार गारपीट व अवकाळी पावसाने गहू, हरभरा, ज्वारी व फळबाग हातचे गेल्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल होऊन कर्जबाजारी झाला. त्यातच या परिसरातील शेतकरी सरकारी अनुदानापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे संसाराचा गाडा कसा ओढावा, या चिंतेत शेतकरी बुडाला आहे. त्यातच काही शेतकर्‍यांच्या मुलीचे लग्न या आपत्तीमुळे संकटात आले आहे. पीक खराब होत असल्यामुळे ते नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, याचे मार्गदर्शन कृषी विभागामार्फत व्हावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. लागवडीकरिता एकरी २५ ते ३० हजार रुपये खर्च आला. लागवडीपासून ते काढणीपर्यंत ८० हजार खर्च झाले. शासनाने कांदा चाळीचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी आसाराम सरोवर, गोरख तुपे, शहादू राऊत, अण्णा तुपे, किरण सुभाष सरोवर, नारायण तुपे, शिवाजी सरोवर आदींनी केले. याबाबत कृषी अधिकारी व्ही.एल. नरवडे यांना विचारले असता ते म्हणाले की, गारपिटीने पातीला बुरशी लागली तर कांदा खराब होण्याची शक्यता असते. (वार्ताहर)