शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC च्या मुदत ठेवींत ८ महिन्यांत २ हजार कोटींनी घट; मागील ३ वर्षात १२ हजार कोटींची घसरण
2
रशियाने भारताला SU-57 लढाऊ विमानांची ऑफर दिली, त्याचे फिचर अन् महत्त्व जाणून घ्या
3
Aadhaar App :'आधार कार्ड'मध्ये बदल करणे होणार सोपे, नवीन अ‍ॅप लाँचच्या तयारीत;मिळणार खास फीचर
4
हाय गर्मी! उष्णतेचा प्रकोप जीवघेणा; युरोपमध्ये ६२,७०० जणांचा मृत्यू, वाढत्या तापमानाचा जगाला धोका
5
९४ मिनिटांचा थरार! विमानांच्या चाकांमध्ये लपून दिल्लीत आलेल्या अफगाणी मुलासोबत पुढे काय घडलं?
6
'चॅटजीपीटी'कडून बनावट नोटा तयार करण्याचे धडे; ५०० रुपयांच्या नोटा बनवल्या आणि बाजारातही वापरल्या
7
महिंद्रा, PNB आणि L&T... दिवाळीपूर्वी मोठी कमाईची संधी! बाजारातील 'हे' ५ शेअर्स ठरू शकतात गेमचेंजर
8
Ladki Bahin Yojana: २६ लाख लाडक्या बहिणींची नावे गायब, ४९०० कोटींचा महाघोटाळा; अजित पवारांच्या बहिणीचा गंभीर आरोप 
9
International: आता अमेरिकेचा हनुमानावरही आक्षेप; म्हणाले, 'खोट्या देवांची मूर्ती....'
10
VIRAL : एका झटक्यात महिला झाली कोट्यधीश; ChatGPTने पालटलं नशीब! वाचून व्हाल हैराण
11
३५० सीसीवरील मोटरसायकलचा जीएसटी वाढला; KTM, Triumph अन् Aprilia ने मोठा निर्णय घेतला...
12
घराशेजारच्या किराणा दुकानांमध्ये ‘GST बचत उत्सवा’चा लाभ नाहीच; ग्राहकांचा झाला अपेक्षाभंग
13
"महाराष्ट्रात ओला दुष्काळ जाहीर करा, आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घ्या’ काँग्रेसची मागणी  
14
Ghaziabad Encounter: गाझियाबाद एन्काउंटरची इतिहासात नोंद, असं वेगळं काय घडलं? 
15
अर्जुन तेंडुलकर राहुल द्रविडच्या मुलाला भिडला; समित द्रविड पहिल्यांदाच खेळला, पण... 
16
मराठी माणसाचं दुकान हडपल्याचा गुन्हा; 'त्या' परप्रांतीयाला शिंदेसेनेकडून जबाबदारी, पक्षात नाराजी
17
"गरबा कार्यक्रमांच्या प्रवेशद्वारावर गोमूत्र ठेवावं, गैर-हिंदूंना..."; धीरेंद्र शास्त्रींचं मोठं विधान
18
मनसेची मान्यता रद्द करण्याची मागणी, राज ठाकरेंविरोधातील याचिकेवर उच्च न्यायालयाचे प्रश्नचिन्ह
19
दिल्लीतील रस्त्यावर मध्यरात्री चकमकीचा थरार, माया गँगच्या म्होरक्याविरोधात STF ची मोठी कारवाई
20
वयाच्या २९व्या वर्षी वेगवान गोलंदाज निवृत्त; वकील बनण्यासाठी क्रिकेटशी तोडलं नातं!

वैजापूर तालुक्यात कांदा सडला

By admin | Updated: May 8, 2014 00:24 IST

गारज : वैजापूर तालुक्यातील गारज, बाभूळगाव, मनूर, भोकरगाव, पोखरी, भायगाव, पाथ्री आदी परिसरातील शेतकर्‍यांच्या मोठ्या प्रमाणावर कांद्याच्या चाळी सडत आहेत.

गारज : वैजापूर तालुक्यातील गारज, बाभूळगाव, मनूर, भोकरगाव, पोखरी, भायगाव, पाथ्री आदी परिसरातील शेतकर्‍यांच्या मोठ्या प्रमाणावर कांद्याच्या चाळी सडत आहेत. त्यामुळे ऐन शेतीच्या कामाच्या तोंडावर बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे. या अगोदार गारपीट व अवकाळी पावसाने गहू, हरभरा, ज्वारी व फळबाग हातचे गेल्यामुळे शेतकरी पूर्णपणे हवालदिल होऊन कर्जबाजारी झाला. त्यातच या परिसरातील शेतकरी सरकारी अनुदानापासून वंचित राहिला आहे. त्यामुळे संसाराचा गाडा कसा ओढावा, या चिंतेत शेतकरी बुडाला आहे. त्यातच काही शेतकर्‍यांच्या मुलीचे लग्न या आपत्तीमुळे संकटात आले आहे. पीक खराब होत असल्यामुळे ते नियंत्रणात आणण्यासाठी काय उपाययोजना करता येईल, याचे मार्गदर्शन कृषी विभागामार्फत व्हावे, अशी मागणी शेतकर्‍यांनी केली आहे. लागवडीकरिता एकरी २५ ते ३० हजार रुपये खर्च आला. लागवडीपासून ते काढणीपर्यंत ८० हजार खर्च झाले. शासनाने कांदा चाळीचे पंचनामे करून मदत द्यावी, अशी मागणी आसाराम सरोवर, गोरख तुपे, शहादू राऊत, अण्णा तुपे, किरण सुभाष सरोवर, नारायण तुपे, शिवाजी सरोवर आदींनी केले. याबाबत कृषी अधिकारी व्ही.एल. नरवडे यांना विचारले असता ते म्हणाले की, गारपिटीने पातीला बुरशी लागली तर कांदा खराब होण्याची शक्यता असते. (वार्ताहर)