शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईची 'लाइफ'लाइन पाण्यात; रायगड, पुणे परिसराला आजही 'रेड अलर्ट', नांदेड जिल्ह्यात आठ बळी
2
पावसाची दहशत! ८००हून जास्त लोकल रद्द; २५०+ विमानांना फटका, भुयारी मेट्रो स्थानकांवर पाणीगळती
3
काच फोडून मोनोचे प्रवासी बाहेर! 'एवढेच व्हायचे बाकी होते', प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया
4
वाहतूक बंद, साचले पाणी; परिस्थितीचा गैरफायदा घेत ॲप आधारित खासगी वाहनांची मनमानी भाडेवाढ
5
मिठी नदी धोका पातळीपर्यंत; रहिवाशांचा गोंधळ; गर्दी नियंत्रित करताना यंत्रणेच्या नाकीनऊ
6
४२,८९२ कोटींची गुंतवणूक, २५,८९२ रोजगाराची निर्मिती; १० गुंतवणूक सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
7
ऑनलाइन गेमिंगला बसणार चाप! विधेयकाला केंद्राची मंजुरी; पैसे ट्रान्सफर करण्यास बँकांना मनाई
8
‘लोकमत’कडून नमामी गंगे प्रकल्पासाठी ५७.५० लाखांचा निधी; देवेंद्र दर्डा यांनी दिला धनादेश
9
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
10
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
11
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
12
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
13
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
14
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
15
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
16
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
17
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
18
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
19
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
20
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली

दीड लाख मेट्रीक टन चाऱ्याची कमतरता !

By admin | Updated: December 15, 2014 00:42 IST

उस्मानाबाद : एकोनिसाव्या पशुगणनेनुसार जिल्ह्यामध्ये लहान-मोठ्या जनावरांची संख्या ७ लाख ३७ हजार ३४७ इतकी आहे.

उस्मानाबाद : एकोनिसाव्या पशुगणनेनुसार जिल्ह्यामध्ये लहान-मोठ्या जनावरांची संख्या ७ लाख ३७ हजार ३४७ इतकी आहे. या पशुधनासाठी आॅक्टोबर ते जुलै २०१५ या कालावधीत तब्बल ९ लाख ७ हजार ५०० मे. टन इतका चारा आवश्यक आहे. मात्र, सध्या जिल्ह्यात ७ लाख ४० हजार मे. टन इतकाच चारा उपलब्ध असून १ लाख ६७ हजार ५०० मे.टन चारा कमी पडत आहे. त्यामुळे हा प्रश्न लक्षात घेवून प्रशासनाला आतापासूनच उपाययोजना कराव्या लागणार, हे निश्चित !जिल्ह्यामध्ये मोठ्या जनावरांची संख्या ४ लाख १२ हजार १४, लहान जनावरे १ लाख १३ हजार ७९१ तर शेळ्या आणि मेेंढ्यांची संख्या ही २ लाख ११ हजार ५५२ इतकी आहे. टंचाई परिस्थितीमध्ये मोठ्या जनावरला प्रतिदिन ६ किलो तर लहान जनावरला ३ किलो इतका वाळलेला चारा दिला जातो. त्यामुळे या पशुधनास दिवसाकाठी ३ हजार २५ मेट्रीक टन इतका चारा आवश्यक असून महिन्याकाठी लागणाऱ्या चाऱ्याचा आकडा हा ९० हजार ७५० मेट्रीक टन इतका आहे. त्यानुसार आॅक्टोबर २०१४ ते जुलै २०१५ या कालावधीत ९ लाख ७ हजार ५०० मे. टन इतका चारा लागणार आहे. पत्यक्षात उपलब्ध होणारा चारा ७ लाख ४० हजार मे. टन इतका आहे. त्यामुळे प्रशासनाला कमी पडणाऱ्या १ लाख ६७ हजार ५०० मे. टन चाऱ्याचे नियोजन करण्यात आले आहे.असे आहे नियोजन४कृषी विभागाकडील ७ हजार हेक्टरवरील नियोजनातून ७० हजार मे. टन, पशुसंवर्धन विभागाकडील १ हजार ६०० हेक्टरवरील नियोजनातून १ लाख ६० हजार मे. टन आणि ११ हजार हेक्टवरील उसापासून ८१ हजार ५०० मे. टन चारा उपलब्ध होवू शकतो, असे पशुसंवर्धन विभागाकडून सांगण्यात आले आहे.४जिल्ह्यात सरासरी ७६७़५ टक्के पाऊस पडणे अपेक्षित आहे़ मात्र, यंदा सरासरीच्या ४४५़८१ मिमी म्हणजे ५८़०९ टक्के पाऊस झाला आहे़ त्यात उस्मानाबाद तालुक्यात ५३़०४ टक्के, तुळजापूर तालुक्यात ६०़७० टक्के, उमरगा तालुक्यात ५५़३७ टक्के, लोहारा तालुक्यात ५५़०१ टक्के, कळंब तालुक्यात ४८़८५ टक्के, भूम तालुक्यात ४८़८१ टक्के, वाशी तालुक्यात ७६़७९ टक्के तर परंडा तालुक्यात ७०़८९ टक्के पाऊस झाला आहे़