शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

मुक्कामाला येणारी बस आगारातच थांबली; प्रवाशांची गैरसोय वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:05 IST

प्रवासी संख्येवर ठरते : होल्ड ठेवून चालक व वाहकांची गैरसोय टळते - साहेबराव हिवराळे- औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर ...

प्रवासी संख्येवर ठरते : होल्ड ठेवून चालक व वाहकांची गैरसोय टळते

- साहेबराव हिवराळे-

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बससेवा सुरू झाली असून, त्यांना अपेक्षित प्रवासी संख्या मिळाली तरच बसच्या फेऱ्या अधिक वाढविल्या जातात. अन्यथा बसेस आगारात थांबत आहेत.

कोरोनामुळे प्रवाशांनी महत्त्वाच्या ठिकाणी जाण्याचे टाळले असून, नोकरी करण्यासाठी जाणारेच बसद्वारे प्रवासासाठी पसंती देत आहेत. आता अनेक नागरिक बाहेर जाण्याचे टाळत आहेत. प्रवाशांची संख्या पाहूनच गाड्या सोडल्या जात आहेत. मुक्कामी जाणाऱ्या जवळच्या गावातील गाड्या गावात नव्हे, तर त्या आगारातच मुक्कामी थांबविल्या जात आहेत. शक्यतो, बीड, गेवराई, नांदेड, उस्मानाबादसाठी गाड्या सोडल्या जात असून, त्याही प्रवासीसंख्येनुसारच चालविल्या जातात. जिल्ह्यात ५५० बसेस असून, आगारातून ४५० बसेस चालविल्या जातात. त्यात लांब पल्ल्यासाठी जाणाऱ्या १०० बसेस आहेत. उशिरा स्थानकातून प्रवासी नसतील, तर गाडी आगारातच थांबवून ठेवली जाते. कर्मचाऱ्यांचा टी. ए., डी. ए. आदी खर्च वाढत असल्याने सहसा मुक्कामी बस सोडल्या जात नाहीत.

५० टक्के बसेस आगारातच...

१) प्रवाशांची म्हणावी तसी गर्दी स्थानकात दिसत नाही.

त्यामुळे प्रवाशांच्या संख्येनुसारच बसेस चालविण्याचा निर्णय घेतला जातो.

२) जवळच्या तालुक्यात मुक्कामी जाणारी व मुक्कामी राहणारी बसदेखील आगारातच मुक्कामी थांबविली जाते. कारण गावातून तेवढे प्रवासी सध्या मिळत नाहीत.

३) अजून शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नसल्याने सकाळी विद्यार्थ्यांची गर्दीच नसते. त्यामुळे मुक्कामी बस थांबविणे शक्य नाही.

- दुसऱ्या डेपोत बसेस मुक्कामी थांबविल्या जातात. परंतु परतीच्या प्रवाशांची संख्या नसेल तर मुक्कामी बस थांबविण्यात काहीही अर्थ नसतो. सध्याच्या परिस्थितीवरून वाहकांना विनाकारण मुक्कामी ठेवणे अधिक कठीण होत आहे. प्रवासी संख्या पाहून निर्णय घेतला जातो.

- अमोल अहिरे, एस. टी .महामंडळाचे अधिकारी

रुग्ण घटले; एसटी कधी धावणार?

- तिसऱ्या लाटेच्या धाकाने प्रवासी बाहेर निघत नाहीत. परंतु मास्क, सॅनिटायझरचा वापर व सुरक्षित अंतर ठेवून प्रवास केल्यास काही परिणाम होत नाही. रुग्ण संख्या घटली असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करणे गरजेचे आहे.

- स्वरूपचंद दाभाडे (प्रवासी)

- रुग्ण घटले असले तरी धोका मात्र टळलेला नाही. परंतु येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी रातराणी, लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करून गैरसोय टाळण्याची गरज आहे. सामान्य नागरिकांना बसचा प्रवास सोयीच ठरू शकतो.

- शेख मतीन (प्रवासी)