शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

मुक्कामाला येणारी बस आगारातच थांबली; प्रवाशांची गैरसोय वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:05 IST

प्रवासी संख्येवर ठरते : होल्ड ठेवून चालक व वाहकांची गैरसोय टळते - साहेबराव हिवराळे- औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर ...

प्रवासी संख्येवर ठरते : होल्ड ठेवून चालक व वाहकांची गैरसोय टळते

- साहेबराव हिवराळे-

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बससेवा सुरू झाली असून, त्यांना अपेक्षित प्रवासी संख्या मिळाली तरच बसच्या फेऱ्या अधिक वाढविल्या जातात. अन्यथा बसेस आगारात थांबत आहेत.

कोरोनामुळे प्रवाशांनी महत्त्वाच्या ठिकाणी जाण्याचे टाळले असून, नोकरी करण्यासाठी जाणारेच बसद्वारे प्रवासासाठी पसंती देत आहेत. आता अनेक नागरिक बाहेर जाण्याचे टाळत आहेत. प्रवाशांची संख्या पाहूनच गाड्या सोडल्या जात आहेत. मुक्कामी जाणाऱ्या जवळच्या गावातील गाड्या गावात नव्हे, तर त्या आगारातच मुक्कामी थांबविल्या जात आहेत. शक्यतो, बीड, गेवराई, नांदेड, उस्मानाबादसाठी गाड्या सोडल्या जात असून, त्याही प्रवासीसंख्येनुसारच चालविल्या जातात. जिल्ह्यात ५५० बसेस असून, आगारातून ४५० बसेस चालविल्या जातात. त्यात लांब पल्ल्यासाठी जाणाऱ्या १०० बसेस आहेत. उशिरा स्थानकातून प्रवासी नसतील, तर गाडी आगारातच थांबवून ठेवली जाते. कर्मचाऱ्यांचा टी. ए., डी. ए. आदी खर्च वाढत असल्याने सहसा मुक्कामी बस सोडल्या जात नाहीत.

५० टक्के बसेस आगारातच...

१) प्रवाशांची म्हणावी तसी गर्दी स्थानकात दिसत नाही.

त्यामुळे प्रवाशांच्या संख्येनुसारच बसेस चालविण्याचा निर्णय घेतला जातो.

२) जवळच्या तालुक्यात मुक्कामी जाणारी व मुक्कामी राहणारी बसदेखील आगारातच मुक्कामी थांबविली जाते. कारण गावातून तेवढे प्रवासी सध्या मिळत नाहीत.

३) अजून शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नसल्याने सकाळी विद्यार्थ्यांची गर्दीच नसते. त्यामुळे मुक्कामी बस थांबविणे शक्य नाही.

- दुसऱ्या डेपोत बसेस मुक्कामी थांबविल्या जातात. परंतु परतीच्या प्रवाशांची संख्या नसेल तर मुक्कामी बस थांबविण्यात काहीही अर्थ नसतो. सध्याच्या परिस्थितीवरून वाहकांना विनाकारण मुक्कामी ठेवणे अधिक कठीण होत आहे. प्रवासी संख्या पाहून निर्णय घेतला जातो.

- अमोल अहिरे, एस. टी .महामंडळाचे अधिकारी

रुग्ण घटले; एसटी कधी धावणार?

- तिसऱ्या लाटेच्या धाकाने प्रवासी बाहेर निघत नाहीत. परंतु मास्क, सॅनिटायझरचा वापर व सुरक्षित अंतर ठेवून प्रवास केल्यास काही परिणाम होत नाही. रुग्ण संख्या घटली असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करणे गरजेचे आहे.

- स्वरूपचंद दाभाडे (प्रवासी)

- रुग्ण घटले असले तरी धोका मात्र टळलेला नाही. परंतु येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी रातराणी, लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करून गैरसोय टाळण्याची गरज आहे. सामान्य नागरिकांना बसचा प्रवास सोयीच ठरू शकतो.

- शेख मतीन (प्रवासी)