शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
2
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
3
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
4
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
5
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
6
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
7
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
8
'ठाण्यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेशी युती नको'; भाजप पदाधिकाऱ्यांचा एकत्र लढण्याला विरोध, जिल्हाध्यक्षांना पत्र
9
'विकसित भारत- जी राम जी' बिल लोकसभेत मंजूर, विरोधकांनी विधेयकाची कॉपी फाडून फेकली! जाणून घ्या, योजनेसंदर्भात सविस्तर
10
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
11
'मी हिजाबच्या विरोधात, पण नितीश कुमारांनी माफी मागावी', 'त्या' घटनेवर जावेद अख्तर संतापले
12
मनगटावर 'कोटींची' माया! श्रीमंतांमध्ये का वाढतेय 'रिचर्ड मिल'ची क्रेझ? वाचा, ११ कोटींच्या घड्याळाचे गुपित
13
इन्स्टाग्रामवर मुलींशी मैत्री! तीन मैत्रिणींना घेऊन जात असताना शिर्डीत नीरजवर चॉपरने जीवघेणा हल्ला
14
Gold Silver Price Today: चांदीचा नवा विक्रम, सोन्याचे दरही गगनाला भिडले; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट किंमत
15
कर्नाटकात उडाला काँग्रेसच्या 'लाडकी बहीण' योजनेचा बोजवारा? दोन महिन्यांचे मानधन रखडले, खुद्द मंत्र्यांचीच कबुली!
16
वारंवार सांगूनही ऐकेना, शेवटी चाहत्याचा मोबाईल हिसकावला आणि...,जसप्रीत बुमराहचं धक्कादायक कृत्य  
17
Honda Vs TVS: १ लाखांपर्यंतच्या बजेटमध्ये बाईक खरेदी करायची आहे? कोणता ऑप्शन असेल बेस्ट
18
Video: भाविकांना घेऊन जाणारी कार ५० फूट खोल दरीत कोसळली, तीन जणांचा मृत्यू
19
तुमच्या बॅगेत ४० किलोहून अधिक सामान आहे?; ट्रेनमधून प्रवास करण्यापूर्वी जाणून घ्या, नवा नियम
20
अक्षय खन्नाच्या यशाचे 'गुपित': अभिनयच नाही, तर कुंडलीतील 'राजलक्षण राजयोग' बदलतोय नशीब
Daily Top 2Weekly Top 5

मुक्कामाला येणारी बस आगारातच थांबली; प्रवाशांची गैरसोय वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:05 IST

प्रवासी संख्येवर ठरते : होल्ड ठेवून चालक व वाहकांची गैरसोय टळते - साहेबराव हिवराळे- औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर ...

प्रवासी संख्येवर ठरते : होल्ड ठेवून चालक व वाहकांची गैरसोय टळते

- साहेबराव हिवराळे-

औरंगाबाद : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर बससेवा सुरू झाली असून, त्यांना अपेक्षित प्रवासी संख्या मिळाली तरच बसच्या फेऱ्या अधिक वाढविल्या जातात. अन्यथा बसेस आगारात थांबत आहेत.

कोरोनामुळे प्रवाशांनी महत्त्वाच्या ठिकाणी जाण्याचे टाळले असून, नोकरी करण्यासाठी जाणारेच बसद्वारे प्रवासासाठी पसंती देत आहेत. आता अनेक नागरिक बाहेर जाण्याचे टाळत आहेत. प्रवाशांची संख्या पाहूनच गाड्या सोडल्या जात आहेत. मुक्कामी जाणाऱ्या जवळच्या गावातील गाड्या गावात नव्हे, तर त्या आगारातच मुक्कामी थांबविल्या जात आहेत. शक्यतो, बीड, गेवराई, नांदेड, उस्मानाबादसाठी गाड्या सोडल्या जात असून, त्याही प्रवासीसंख्येनुसारच चालविल्या जातात. जिल्ह्यात ५५० बसेस असून, आगारातून ४५० बसेस चालविल्या जातात. त्यात लांब पल्ल्यासाठी जाणाऱ्या १०० बसेस आहेत. उशिरा स्थानकातून प्रवासी नसतील, तर गाडी आगारातच थांबवून ठेवली जाते. कर्मचाऱ्यांचा टी. ए., डी. ए. आदी खर्च वाढत असल्याने सहसा मुक्कामी बस सोडल्या जात नाहीत.

५० टक्के बसेस आगारातच...

१) प्रवाशांची म्हणावी तसी गर्दी स्थानकात दिसत नाही.

त्यामुळे प्रवाशांच्या संख्येनुसारच बसेस चालविण्याचा निर्णय घेतला जातो.

२) जवळच्या तालुक्यात मुक्कामी जाणारी व मुक्कामी राहणारी बसदेखील आगारातच मुक्कामी थांबविली जाते. कारण गावातून तेवढे प्रवासी सध्या मिळत नाहीत.

३) अजून शाळा पूर्ण क्षमतेने सुरू झालेल्या नसल्याने सकाळी विद्यार्थ्यांची गर्दीच नसते. त्यामुळे मुक्कामी बस थांबविणे शक्य नाही.

- दुसऱ्या डेपोत बसेस मुक्कामी थांबविल्या जातात. परंतु परतीच्या प्रवाशांची संख्या नसेल तर मुक्कामी बस थांबविण्यात काहीही अर्थ नसतो. सध्याच्या परिस्थितीवरून वाहकांना विनाकारण मुक्कामी ठेवणे अधिक कठीण होत आहे. प्रवासी संख्या पाहून निर्णय घेतला जातो.

- अमोल अहिरे, एस. टी .महामंडळाचे अधिकारी

रुग्ण घटले; एसटी कधी धावणार?

- तिसऱ्या लाटेच्या धाकाने प्रवासी बाहेर निघत नाहीत. परंतु मास्क, सॅनिटायझरचा वापर व सुरक्षित अंतर ठेवून प्रवास केल्यास काही परिणाम होत नाही. रुग्ण संख्या घटली असल्याने लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करणे गरजेचे आहे.

- स्वरूपचंद दाभाडे (प्रवासी)

- रुग्ण घटले असले तरी धोका मात्र टळलेला नाही. परंतु येणाऱ्या प्रसंगाला सामोरे जाण्यासाठी रातराणी, लांब पल्ल्याच्या गाड्या सुरू करून गैरसोय टाळण्याची गरज आहे. सामान्य नागरिकांना बसचा प्रवास सोयीच ठरू शकतो.

- शेख मतीन (प्रवासी)