शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
3
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
4
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
5
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
6
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
7
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
8
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
9
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
10
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
11
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
12
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
13
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
14
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
15
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
16
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
17
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
18
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
19
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
20
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?

भूमी अभिलेखमध्ये जुनेच सरकार

By admin | Updated: January 6, 2015 01:10 IST

औरंगाबाद : राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊन नवीन सरकार आले. नवीन सरकारने कारभार सुरू करून दोन महिनेही उलटले;

औरंगाबाद : राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊन नवीन सरकार आले. नवीन सरकारने कारभार सुरू करून दोन महिनेही उलटले; पण तरी भूमी अभिलेख खात्याच्या लेखी मात्र अजूनही जुनेच सरकार आहे. भूमी अभिलेखच्या उपसंचालक कार्यालयात जुन्याच सरकारातील मंत्र्यांच्या नावाच्या पाट्या झळकत आहेत. या पाट्या उतरविण्याचे भान येथील अधिकाऱ्यांना राहिलेले नाही.पंधरा वर्षांनंतर राज्यात सत्तांतर झाले. काँग्रेस आघाडीचे सरकार जाऊन भाजपा-सेनेचे सरकार आरुढ झाले. हा बदल होताच सर्वच सरकारी कार्यालयांनी त्यांच्या बेवसाईटस् अपडेट केल्या. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नावे असलेल्या पाट्या उतरविण्यात आल्या; परंतु भूमी अभिलेख खात्याच्या लेखी मात्र अद्याप जुनेच सरकार कार्यरत आहे. भूमी अभिलेखच्या उपसंचालक कार्यालयात मागील सरकारमधील मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नावे असलेले मोठे फलक झळकत आहेत. भूमी अभिलेख खात्याला गतिशीलता असे मोठे मथळे असलेले हे फलक असून, त्यावर मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि महसूलमंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांची नावे आहेत. विशेष म्हणजे राज्याचे नवीन महसूलमंत्री एकनाथ खडसे आतापर्यंत तीन वेळा औरंगाबाद दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनी महसूल आणि भूमी अभिलेख खात्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या. उपसंचालक कार्यालयात अगदी दर्शनी स्थळी हे फलक लावलेले आहेत. यापैकी एक फलक तर उपसंचालक प्रदीप पाटील यांच्या केबिनसमोरील पोर्चमध्ये लावलेला आहे. त्यांना केबिनमध्ये प्रवेश करण्यासाठी या फलकासमोरून जावे लागते. तरीही हा फलक अजून तिथे असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.