शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
2
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
3
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
4
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
5
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
6
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
7
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
8
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
11
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या
12
...तरी विभक्त पत्नीला देखभाल खर्च द्यावाच लागेल; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
Shefali Jariwala Death: शेफाली जरीवालाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीमुळे संशय वाढला
14
Bigg Boss मधील आतापर्यंत तिसऱ्या स्पर्धकाचा अचानक मृत्यू; प्रत्येक घटनेमागे कारण एकच...
15
एखाद्याला खूश करण्यासाठी मुलांचे भविष्य खराब करू नका, हिंदी सक्तीवरून सुप्रिया सुळे भडकल्या!
16
Panvel Crime News: धक्कादायक! नऊ महिने पोटात वाढवलेल्या बाळाला जन्मताच रस्त्यावर फेकलं, पनवेल येथील घटना
17
मुले पुढे जातात, मुलींना लग्न करणेही होते कठीण; लिव्ह-इन रिलेशनशिपबद्दल न्यायालयाकडून गंभीर चिंता
18
‘तशा’ किती विकासकांना अटक केली? कल्याण-डोंबिवली पालिकेला मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल
19
"मी हात जोडले, पाय धरले, पण त्या नराधमाने…’’, कोलकाता बलात्कार प्रकरणातील पीडितेचा धक्कादायक जबाब   
20
मुंबई: अस्मी चव्हाणने ३० व्या मजल्यावरून उडी मारून का केली आत्महत्या? पोलिसांच्या तपासातून समोर आली माहिती

भूमी अभिलेखमध्ये जुनेच सरकार

By admin | Updated: January 6, 2015 01:10 IST

औरंगाबाद : राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊन नवीन सरकार आले. नवीन सरकारने कारभार सुरू करून दोन महिनेही उलटले;

औरंगाबाद : राज्यात विधानसभेच्या निवडणुका होऊन नवीन सरकार आले. नवीन सरकारने कारभार सुरू करून दोन महिनेही उलटले; पण तरी भूमी अभिलेख खात्याच्या लेखी मात्र अजूनही जुनेच सरकार आहे. भूमी अभिलेखच्या उपसंचालक कार्यालयात जुन्याच सरकारातील मंत्र्यांच्या नावाच्या पाट्या झळकत आहेत. या पाट्या उतरविण्याचे भान येथील अधिकाऱ्यांना राहिलेले नाही.पंधरा वर्षांनंतर राज्यात सत्तांतर झाले. काँग्रेस आघाडीचे सरकार जाऊन भाजपा-सेनेचे सरकार आरुढ झाले. हा बदल होताच सर्वच सरकारी कार्यालयांनी त्यांच्या बेवसाईटस् अपडेट केल्या. मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नावे असलेल्या पाट्या उतरविण्यात आल्या; परंतु भूमी अभिलेख खात्याच्या लेखी मात्र अद्याप जुनेच सरकार कार्यरत आहे. भूमी अभिलेखच्या उपसंचालक कार्यालयात मागील सरकारमधील मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांची नावे असलेले मोठे फलक झळकत आहेत. भूमी अभिलेख खात्याला गतिशीलता असे मोठे मथळे असलेले हे फलक असून, त्यावर मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार आणि महसूलमंत्री म्हणून बाळासाहेब थोरात यांची नावे आहेत. विशेष म्हणजे राज्याचे नवीन महसूलमंत्री एकनाथ खडसे आतापर्यंत तीन वेळा औरंगाबाद दौऱ्यावर येऊन गेले. त्यांनी महसूल आणि भूमी अभिलेख खात्यातील अधिकाऱ्यांच्या बैठकाही घेतल्या. उपसंचालक कार्यालयात अगदी दर्शनी स्थळी हे फलक लावलेले आहेत. यापैकी एक फलक तर उपसंचालक प्रदीप पाटील यांच्या केबिनसमोरील पोर्चमध्ये लावलेला आहे. त्यांना केबिनमध्ये प्रवेश करण्यासाठी या फलकासमोरून जावे लागते. तरीही हा फलक अजून तिथे असल्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.