शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

अधिकाऱ्यांनी घेतला ‘पीआरसी’चा धसका !

By admin | Updated: August 18, 2015 00:51 IST

उस्मानाबाद : तब्बल दहा वर्षानंतर पंचायत राज समिती (पीआरसी) जिल्ह्यात येत आहे. या समितीचा जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसून येत आहे.

उस्मानाबाद : तब्बल दहा वर्षानंतर पंचायत राज समिती (पीआरसी) जिल्ह्यात येत आहे. या समितीचा जिल्हा परिषद अधिकाऱ्यांनी चांगलाच धसका घेतल्याचे दिसून येत आहे. कमिटीसमोर कुठल्याही स्वरूपाच्या चुका जावू नयेत, या अनुषंगाने अर्धवट कामे, त्रुटींची पूर्तता करून घेण्याची लगबग सुरू आहे. ज्या कार्यालयांमध्ये पेंडन्सी अधिक आहे, असे असे अधिकारी, कर्मचारी तर रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबून कामे करीत आहेत. तारीख निश्चित नसली तरी सप्टेंबरअखेर अथवा आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात ही समिती येऊ शकते, असे सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी यशवंत केरूरे यांच्या कार्यकाळत म्हणजेच २००५ मध्ये जिल्ह्यात पंचायत राज समिती आली होती. यानंतर तब्बल दहा वर्षांनी समिती येत आहे. शासनाकडून जिल्हा परिषदेला तसे कळविण्यात आले आहे. त्यामुळे सर्वच अधिकारी, कर्मचारी अंग झटकून कामाला लागले आहेत. ‘आपल्या विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होणार नाही’, याची सर्वच विभाग प्रमुखांकडून दखल घेतली जात आहे. समिती कधी येणार याबाबतची तारीख निश्चित नसली तरी सप्टेंबर अखेर अथवा आॅक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात समिती येईल, असे गृहित धरून कामकाज सुरू आहे. शासनाच्या वतीने सामान्यांच्या उन्नतीसाठी राबविण्यात येत असलेल्या योजना योग्य पद्धतीने राबविल्या जातात की नाही, दिलेला निधी पूर्ण क्षमतेने खर्च होतोय की नाही, केलेली विकास कामे गुणवत्तापूर्ण आहेत का?, लेखा परीक्षण विभागाकडून काढण्यात आलेल्या आॅडीट पॅऱ्यांची पूर्तता वेळेत केली आहे का? आदी बाबींची या समितीकडून तपासणी केली जावू शकते. ही बाब लक्षात घेवूनच अधिकारी कामाला लागले आहेत. दरम्यान, दहा वर्षांपूर्वी आलेल्या समितीचा अनुभव लक्षात घेता कुठलेही प्रकरण स्वत:वर अथवा आपल्या विभागातील कर्मचाऱ्यांच्या अंगलट येवू नये, याची सर्वच विभागप्रमुखांकडून दक्षता घेतली जात आहे. जे अधिकारी स्वत:चे कॅबीन सोडत नव्हते, ते आता कर्मचाऱ्यांच्या कक्षात बसून अपूर्ण कामे, त्रुटींची पूर्तता करून घेत आहेत. ज्या विभागाचा व्याप मोठा आहे, असे कर्मचारी व अधिकारी तर रात्री उशिरापर्यंत कार्यालयात थांबून कामे करताना दिसून येत आहेत. प्रशासनाकडून जोरदार तयारी सुरू असली तरी समिती आल्यानंतर नेमके कशा पद्धतीने सामोरे जातात? हे सप्टेंबर अथवा आॅक्टोबरमध्येच दिसून येणार आहे. (प्रतिनिधी)