शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

अधिकाऱ्यांचे रडगाणे !

By admin | Updated: July 14, 2016 01:14 IST

बीड : अहमदनगर - बीड - परळी रेल्वे मार्गाच्या कामाच्या अनुषंगाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेली बैठक अधिकाऱ्यांच्या रडगाण्याभोवतीच फिरली.

बीड : अहमदनगर - बीड - परळी रेल्वे मार्गाच्या कामाच्या अनुषंगाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेली बैठक अधिकाऱ्यांच्या रडगाण्याभोवतीच फिरली. खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे मी पाहते, तुम्ही कामे वेगाने करा, असे खडसावले.आ. आर. टी. देशमुख, आ. प्रा. संगीता ठोंबरे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, रेल्वे अधिकारी धांडोरे आदींची यावेळी उपस्थिती होती. अहमदनगर - बीड - परळी रेल्वे मार्गाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याबाबत खा. मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली. अहमदनगर ते बीड दरम्यान भूसंपादनाचे काम पूर्ण झालेले आहे. रूळ टाकण्याचे कामही सुरू आहे. मात्र, दुसरीकडे बीड ते परळी दरम्यानच्या रेल्वे कामासाठी भूसंपादनही झालेले नाही, असा मुद्दा आ. देशमुख यांनी उपस्थित केला. त्यानंतर खा. मुंडे म्हणाल्या, बीड ते परळी रेल्वेमार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवा. केंद्र सरकारकडून भूसंपादनासाठी १५८ कोटी रूपये आले आहेत. हा सर्व निधी भूसंपादनासाठीच वापरावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.धानोरा रोड येथे रेल्वेस्थानक उभारण्याचे काम सुरू आहे का ? अशी विचारणा खा. मुंडे यांनी केली. त्यावर पूर्वी बार्शी नाका येथील प्रस्ताव होता. मात्र, नंतर धानोरा रोड निश्चित झाल्यानंतर तेथील भूसंपादनाचे काम सुरू आहे, असा खुलासा अधिकाऱ्यांनी दिला. त्यालाही विरोध होत असल्याचा मुद्दा एका अधिकाऱ्याने उपस्थित केला. त्यावर रेल्वेस्थानक कोठे हवे ? हे ठरेल पण त्यासाठी रेल्वे मार्गाचे काम अडकवून ठेवू नका, असे त्या म्हणाल्या.केंद्र सरकारकडून गतवर्षी १९२ कोटी रुपये भूसंपादनासाठी आले होते. त्यापैकी १३ कोटी रूपये शिल्लक आहेत. राज्य शासनाने ५० टक्के वाट्याचा निधी दोन वर्षांपासून दिला नाही, अशी कैफियतही अधिकाऱ्यांनी मांडली. मी निधी आणते, मुख्यमंत्र्यांनाही याची कल्पना देते. तुम्ही कामे वेगाने करा, अशा सूचना खा. मुंडे यांनी दिल्या.रेल्वे कामासाठी दिरंगाई करून चालणार नाही, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. (प्रतिनिधी)बीडच्या रेल्वेचा प्रश्न स्वातंत्र्यप्राप्तीपासून प्रलंबित आहे. बीडकरांच्या जिव्हाळ्याचा हा विषय असून, त्याचे नियंत्रण दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयातून सुरू आहे.४त्यामुळे पंतप्रधान रेल्वेच्या कामाबाबत केव्हाही विचारू शकतात. तेव्हा तुमच्याकडे उत्तर हवे. तुम्हाला थेट पंतप्रधानांना उत्तरे द्यावयाची आहेत, एवढे लक्षात ठेवा, अशी तंबीही यावेळी खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी दिली.४रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना बीडमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेण्यास भाग पाडण्यात येईल. त्याशिवाय कामाला गती येणार नाही, असे खा. मुंडे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.४भूसंपादनाच्या नव्या कायद्यामुळे काही ठिकाणी भूसंपादनास अडथळे येत आहेत. त्यातून मार्ग काढण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.