शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

अधिकाऱ्यांचे रडगाणे !

By admin | Updated: July 14, 2016 01:14 IST

बीड : अहमदनगर - बीड - परळी रेल्वे मार्गाच्या कामाच्या अनुषंगाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेली बैठक अधिकाऱ्यांच्या रडगाण्याभोवतीच फिरली.

बीड : अहमदनगर - बीड - परळी रेल्वे मार्गाच्या कामाच्या अनुषंगाने बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेली बैठक अधिकाऱ्यांच्या रडगाण्याभोवतीच फिरली. खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी निधी उपलब्ध करून देण्याचे मी पाहते, तुम्ही कामे वेगाने करा, असे खडसावले.आ. आर. टी. देशमुख, आ. प्रा. संगीता ठोंबरे, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, रेल्वे अधिकारी धांडोरे आदींची यावेळी उपस्थिती होती. अहमदनगर - बीड - परळी रेल्वे मार्गाचे काम धीम्या गतीने सुरू असल्याबाबत खा. मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली. अहमदनगर ते बीड दरम्यान भूसंपादनाचे काम पूर्ण झालेले आहे. रूळ टाकण्याचे कामही सुरू आहे. मात्र, दुसरीकडे बीड ते परळी दरम्यानच्या रेल्वे कामासाठी भूसंपादनही झालेले नाही, असा मुद्दा आ. देशमुख यांनी उपस्थित केला. त्यानंतर खा. मुंडे म्हणाल्या, बीड ते परळी रेल्वेमार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यासाठी भूसंपादन प्रक्रिया राबवा. केंद्र सरकारकडून भूसंपादनासाठी १५८ कोटी रूपये आले आहेत. हा सर्व निधी भूसंपादनासाठीच वापरावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.धानोरा रोड येथे रेल्वेस्थानक उभारण्याचे काम सुरू आहे का ? अशी विचारणा खा. मुंडे यांनी केली. त्यावर पूर्वी बार्शी नाका येथील प्रस्ताव होता. मात्र, नंतर धानोरा रोड निश्चित झाल्यानंतर तेथील भूसंपादनाचे काम सुरू आहे, असा खुलासा अधिकाऱ्यांनी दिला. त्यालाही विरोध होत असल्याचा मुद्दा एका अधिकाऱ्याने उपस्थित केला. त्यावर रेल्वेस्थानक कोठे हवे ? हे ठरेल पण त्यासाठी रेल्वे मार्गाचे काम अडकवून ठेवू नका, असे त्या म्हणाल्या.केंद्र सरकारकडून गतवर्षी १९२ कोटी रुपये भूसंपादनासाठी आले होते. त्यापैकी १३ कोटी रूपये शिल्लक आहेत. राज्य शासनाने ५० टक्के वाट्याचा निधी दोन वर्षांपासून दिला नाही, अशी कैफियतही अधिकाऱ्यांनी मांडली. मी निधी आणते, मुख्यमंत्र्यांनाही याची कल्पना देते. तुम्ही कामे वेगाने करा, अशा सूचना खा. मुंडे यांनी दिल्या.रेल्वे कामासाठी दिरंगाई करून चालणार नाही, असा इशाराही त्यांनी अधिकाऱ्यांना दिला. (प्रतिनिधी)बीडच्या रेल्वेचा प्रश्न स्वातंत्र्यप्राप्तीपासून प्रलंबित आहे. बीडकरांच्या जिव्हाळ्याचा हा विषय असून, त्याचे नियंत्रण दिल्ली येथील पंतप्रधान कार्यालयातून सुरू आहे.४त्यामुळे पंतप्रधान रेल्वेच्या कामाबाबत केव्हाही विचारू शकतात. तेव्हा तुमच्याकडे उत्तर हवे. तुम्हाला थेट पंतप्रधानांना उत्तरे द्यावयाची आहेत, एवढे लक्षात ठेवा, अशी तंबीही यावेळी खा. डॉ. प्रीतम मुंडे यांनी दिली.४रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांना बीडमध्ये अधिकाऱ्यांची बैठक घेण्यास भाग पाडण्यात येईल. त्याशिवाय कामाला गती येणार नाही, असे खा. मुंडे यांनी बैठकीनंतर पत्रकारांना सांगितले.४भूसंपादनाच्या नव्या कायद्यामुळे काही ठिकाणी भूसंपादनास अडथळे येत आहेत. त्यातून मार्ग काढण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या.